शहरं
Join us  
Trending Stories
1
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
2
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
3
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
4
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
5
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
6
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
7
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
8
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
9
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
10
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
11
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
12
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
13
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
14
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
15
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
16
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
17
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
18
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
19
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
20
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?

‘आॅफ सिजन’मध्ये फुलविली खरबुजाची बाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 11:43 IST

यशकथा :  पानकनेरगाव येथील शेतकरी संतोष शिंदे यांनी ‘आॅफ सिजन’मध्ये दोन एकर क्षेत्रात खरबुजाची शेती फुलवली आहे.

- के.के. ठाकूर (पानकनेरगाव)

मागास तालुका म्हणून ओळख असलेल्या सेनगाव (जि. हिंगोली) तालुक्यातील शेतकरी आता आधुनिक पद्धतीने शेती करून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवू लागले आहेत. तालुक्यातील पानकनेरगाव येथील शेतकरी संतोष शिंदे यांनी ‘आॅफ सिजन’मध्ये दोन एकर क्षेत्रात खरबुजाची शेती फुलवली आहे.

शिंदे यांनी २ एकर शेतात ११ हजार पाचशे खरबुजांच्या रोपांची चार बाय दीड फूट अंतरावर मल्चिंग पेपर व ठिबकवर लागवड केली. खरबुजाचे पीक ७० दिवसांत येते. त्यामुळे पाण्याचे योग्य नियोजन असेल. उत्पन्नही चांगले मिळते. यंदा दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने ठिबक व मल्चिंगमुळे कमी पाण्यात खरबुजाची शेती फुलवली आहे. खरबुजाचे पीक कमी पाण्यात आणि कमी दिवसांत येत असल्याने या पिकाची निवड केल्याचे शिंदे यांनी सांगितले. निर्यातक्षम खरबूज उत्पादनासाठी त्यांनी प्रतिवेलावर ५ फळे ठेवून बाकीची फळे तोडून टाकली. काटेकोर नियोजन आणि संगोपन हेच त्यांच्या यशाचे गमक असल्याचे ते म्हणाले. मातीपरीक्षणातून खत व पाण्याचे योग्य व्यवस्थापन ठेवले. 

मल्चिंग आच्छादनामुळे पाण्याचे बाष्पीभवन न होता योग्य वापर झाला. पिकांना आवश्यक असलेली सूक्ष्म पोषकद्रव्ये, पाण्यात विरघळणारी खते ठिबकमधून सोडली. लागवडीपासून फळ काढणीस येण्याचा कालावधी ७० दिवसांचा असतो. १५ नोव्हेंबरपर्यंत खरबूज तोडणीस येणार आहे. ५५ टन उत्पन्नाची अपेक्षा शिंदे यांनी व्यक्त केली आहे. ‘आॅफ सिजन’ पीक घेतल्याने किमान २० रुपये किलोचा दर मिळाल्यास १५ ते २० लाखांचे उत्पन्न मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. नियोजनबद्ध पीक पद्धतीमुळे त्यांना शेतीतून चांगला नफा मिळत गेला.

आज संपूर्ण १८ एकर शेती वहितीखाली आहे. त्यामध्ये ३० गुंठे जमिनीत त्यांनी शेडनेट उभारले असून, यावर्षी एक एकर शेडनेट मंजूर झाल्याचे त्यांनी सांगितले. शेडनेटमध्ये भाजीपाला व फळझाडांच्या रोपांची त्यांची नर्सरी आहे. नर्सरीमधून वर्षाकाठी १५ ते २० लाखांचे उत्पन्न मिळत असल्याचे शिंदे यांनी सांगितले. नर्सरीत भाजीपाल्याच्या रोपामध्ये ते मिरची, कांदा, टोमॅटो, वांगी, शेवगा, झेंडू, खरबूज, कलिंगड, सिमला या भाजीपाला पिकांची रोपे, तर फळझाडांमध्ये आंबा, लिंबू, जांभूळ, पपई, जांब, केळी, संत्रा या फळझाडांची रोपे ते तयार करतात.

दरवर्षी ते वेगवेगळ्या वाणांची निवड करून ‘आॅफ सिजन’ पीक घेतात. त्याचा फायदा हा की, बाजारात स्पर्धक कमी मिळून दर अधिक मिळतो. दोडका, सिमला, कलिंगड, पपई, शेवगा अशा वेगवेगळ्या पिकांची ते दरवर्षी निवड करतात. विशेष म्हणजे १९९४ ते २००१ पर्यंत, ही आठ वर्षे शिंदे यांनी दुसऱ्याच्या शेतात सालगडी म्हणून काम केले. त्यांना वडिलोपार्जित एकूण १८ एकर शेती आहे.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी