शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

दर्जाहीन रोपांमुळे शेतकरी नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 23:11 IST

परिसरातील नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अभियानांतर्गत फळबाग लागवडीच्या कामांना सुरूवात झाली आहे. मात्र निर्माण झालेला पाणीप्रश्न आणि त्यातच शासनमान्य रोपवाटिकेद्वारे दर्जाहीन रोपाचा पुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांची निराशा होत आहे. लागवडीपूर्वीच रोपे सुकून करपत असल्याने या योजनेचा फज्जा उडण्याची चिन्हे दिसून येत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : परिसरातील नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अभियानांतर्गत फळबाग लागवडीच्या कामांना सुरूवात झाली आहे. मात्र निर्माण झालेला पाणीप्रश्न आणि त्यातच शासनमान्य रोपवाटिकेद्वारे दर्जाहीन रोपाचा पुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांची निराशा होत आहे. लागवडीपूर्वीच रोपे सुकून करपत असल्याने या योजनेचा फज्जा उडण्याची चिन्हे दिसून येत आहेत.गोरेगावसह परिसरातील निवड झालेल्या गावांमध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अभियानास सुरूवात झाली आहे. कृषी सहाय्यक जी.बी. काळे, कृषी पथकाच्या वतीने केलेल्या जनजागृृती, सूक्ष्मनियोजन प्रकियेनंतर विविध कृषी विकास कामे प्रस्तावित करून ग्रामपंचायतकडून आराखड्यास मंजुरी दिली होती. यात प्रस्ताव सादर करीत ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद दर्शविला होता.अभियानाच्या पहिल्या टप्प्यात नोव्हेंबरअखेर फळबाग लागवडीस सुरूवात झाली असून जमिनीतील पाणीपातळी खालावल्यामुळे विहिरी, बोअरवेल डबघाईस आल्याने शेती सिंचनाचा प्रश्न भेडसावत आहे. त्यामुळे लाभधारक शेतकºयांना फळबाग लागवडीसाठी मोठी कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे. कृषी विभागाच्या परमिटवर शासनमान्य रोपवाटिकेतून दर्जाहीन रोपांचा पुरवठा होत असल्याची शेतकºयांची ओरड आहे. दर्जेदार रोपे उपलब्ध नसल्याने फळबाग योजनेला खोडा बसल्याचे अनुभवयास मिळत आहे. वसमत तालुक्यातील रिधोरा येथील श्रीकृष्णा रोपवाटिकेतून रोपे दिली जात असल्याचे शेतकºयांनी सांगितले. वाढ खुंटलेली रोपे असून त्यांच्या जातीविषयी कुठलीच हमी दिली जात नसल्याने शेतकºयांमधून नाराजी व्यक्त होत आहे. दुष्काळात तेरावा महिना अशी गत होत आहे.याबाबत कृषी सहाय्यक जी.बी. काळे यांना विचारल्यावर ते म्हणाले, परभणी कृषी विद्यापीठात रोपांचा तुटवडा असून शासनमान्य नर्सरीतून रोपपुरवठा होत आहे. त्यात फसवणूक झाल्यास शेतकºयांनी रीतसर तक्रार करावी.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी