शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांना मदत केलेला आरोपी सुरक्षा दलाच्या जाळ्यात; ऑपरेशन महादेवला मोठं यश
2
काश्मीर मुद्द्यावरून अमेरिकेचा पाकिस्तानला धक्का! पंतप्रधान मोदी-ट्रम्प भेटीबद्दलही केले मोठे विधान
3
'अशा' कमाईवर विशेष टॅक्स सूट नाही; कर सवलत मिळालेल्यांना थकबाकी भरावी लागणार, पण एक दिलासा...
4
एअरस्पेसमध्ये रशियाचा 'डिजिटल हल्ला'; स्पेनच्या संरक्षण मंत्र्यांच्या विमानाच्या जीपीएसमध्ये बिघाड, युरोपमध्ये खळबळ
5
इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर...
6
महाराष्ट्रातील बेस्ट पर्यटन स्थळे क्लिक करा, ५ लाख जिंका; शासनाची अनोखी स्पर्धा, काय आहेत अटी?
7
नवरात्री २०२५: शुक्रवारी ललिता पंचमी, ३ शुभ योगासह, भद्रा राजयोगात ७ राशींचा भाग्योदय
8
लडाखमधील भडकलेल्या आंदोलनाचं पाकिस्तान कनेक्शन? सोनम वांगचूक यांच्या दौऱ्याबद्दल उपस्थित होताहेत शंका
9
प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब आणि मुलावर गुन्हा दाखल; १५० हून अधिक लोकांना लाखोंचा फटका
10
Stock Market Today: सलग पाचव्या दिवशी शेअर बाजारात घसरण, निफ्टी ४० अंकांनी घसरला; Glenmark Pharma, Dixon Tech मध्ये तेजी
11
नेते गेले बांधावर! वेदनांच्या महापुरावर आश्वासनांची फुंकर; कुणी हात जोडले, कुणी व्यथा मांडल्या
12
कुलदीप यादव सुसाट! जडेजा आणि मुरलीधरनचा रेकॉर्ड ब्रेक, मलिंगाचाही 'हा' विक्रम धोक्यात
13
पाकिस्तानची स्थिती बिकट होणार! भारतीय हवाई दलाला मिळणार ९७ तेजस विमाने
14
१ ऑक्टोबरपासून बदलणार ७ नियम, सामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम; ऑनलाइन गेमिंगपासून तिकिटापर्यंत आहे यादीत
15
Asia Cup 2025: हारिस रौफ आणि साहिबजादा फरहानवर बंदीची टांगती तलवार, मैदानातील गैरवर्तन महागात पडणार?
16
Post Office च्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹४ लाख, मिळेल ₹१,७९,६३१ चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
17
या संकटात बळीराजा तू एकटा नाहीस, अख्खा महाराष्ट्र सोबत आहे; हताश शेतकरी घेतायेत मृत्यूशी गळाभेट
18
'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय?
19
बहिणीसाठी रक्षक नाही, भक्षक ठरले भाऊ; आई-वडिलांनीही पाठ फिरवली, पण होणाऱ्या नवऱ्याने साथ दिली अन्..
20
लडाखमध्ये Gen Z क्रांती, स्वतंत्र राज्यासाठी पेटून उठले; रस्त्यावर उतरली तरूणाई, मागण्या काय?

दर्जाहीन रोपांमुळे शेतकरी नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 23:11 IST

परिसरातील नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अभियानांतर्गत फळबाग लागवडीच्या कामांना सुरूवात झाली आहे. मात्र निर्माण झालेला पाणीप्रश्न आणि त्यातच शासनमान्य रोपवाटिकेद्वारे दर्जाहीन रोपाचा पुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांची निराशा होत आहे. लागवडीपूर्वीच रोपे सुकून करपत असल्याने या योजनेचा फज्जा उडण्याची चिन्हे दिसून येत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : परिसरातील नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अभियानांतर्गत फळबाग लागवडीच्या कामांना सुरूवात झाली आहे. मात्र निर्माण झालेला पाणीप्रश्न आणि त्यातच शासनमान्य रोपवाटिकेद्वारे दर्जाहीन रोपाचा पुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांची निराशा होत आहे. लागवडीपूर्वीच रोपे सुकून करपत असल्याने या योजनेचा फज्जा उडण्याची चिन्हे दिसून येत आहेत.गोरेगावसह परिसरातील निवड झालेल्या गावांमध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अभियानास सुरूवात झाली आहे. कृषी सहाय्यक जी.बी. काळे, कृषी पथकाच्या वतीने केलेल्या जनजागृृती, सूक्ष्मनियोजन प्रकियेनंतर विविध कृषी विकास कामे प्रस्तावित करून ग्रामपंचायतकडून आराखड्यास मंजुरी दिली होती. यात प्रस्ताव सादर करीत ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद दर्शविला होता.अभियानाच्या पहिल्या टप्प्यात नोव्हेंबरअखेर फळबाग लागवडीस सुरूवात झाली असून जमिनीतील पाणीपातळी खालावल्यामुळे विहिरी, बोअरवेल डबघाईस आल्याने शेती सिंचनाचा प्रश्न भेडसावत आहे. त्यामुळे लाभधारक शेतकºयांना फळबाग लागवडीसाठी मोठी कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे. कृषी विभागाच्या परमिटवर शासनमान्य रोपवाटिकेतून दर्जाहीन रोपांचा पुरवठा होत असल्याची शेतकºयांची ओरड आहे. दर्जेदार रोपे उपलब्ध नसल्याने फळबाग योजनेला खोडा बसल्याचे अनुभवयास मिळत आहे. वसमत तालुक्यातील रिधोरा येथील श्रीकृष्णा रोपवाटिकेतून रोपे दिली जात असल्याचे शेतकºयांनी सांगितले. वाढ खुंटलेली रोपे असून त्यांच्या जातीविषयी कुठलीच हमी दिली जात नसल्याने शेतकºयांमधून नाराजी व्यक्त होत आहे. दुष्काळात तेरावा महिना अशी गत होत आहे.याबाबत कृषी सहाय्यक जी.बी. काळे यांना विचारल्यावर ते म्हणाले, परभणी कृषी विद्यापीठात रोपांचा तुटवडा असून शासनमान्य नर्सरीतून रोपपुरवठा होत आहे. त्यात फसवणूक झाल्यास शेतकºयांनी रीतसर तक्रार करावी.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी