शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

अवयव विक्रीस काढणाऱ्या शेतकऱ्यांची नागपूरात विधीमंडळावर धडक, पोलिसांनी घेतले ताब्यात 

By सुमित डोळे | Updated: December 19, 2023 13:20 IST

जर राज्य सरकारकडे तोडगा निघाला नाही तर आता दिल्लीत संसद भवनासमोर अवयव विक्रीसाठी जाणार

हिंगोली : सेनगाव तालुक्यातील गोरेगाव परिसरातील शेतकऱ्यांनी अवयव विक्रीसाठी नागपूर येथील विधिमंडळ अधिवेशनावर धडक मारल्यानंतर तेथे या शेतकऱ्यांना पोलिसांनी १९ रोजी दुपारी १२ च्या सुमारास ताब्यात घेतले आहे. त्यांना सरकारकडून चर्चेसाठी निमंत्रणही मिळाले आहे.

हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मागील अनेक दिवसांपासून सरकारशी लढा सुरू आहे. सततची नापिकी, पिकांवरील रोगराईमुळे शेतीचा लागवड खर्चही निघाला नाही. त्यामुळे पीककर्ज फेडायचे तर आमचे अवयव विकत घ्या, अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली होती. २२ नोव्हेंबरला पहिल्यांदा किडनी, डोळे, लिव्हर विक्री करायचे असल्याचे निवेदन दिले होते. गजानन कावरखे, दीपक कावरखे, विजय कावरखे, दशरथ मुळे, संजय मुळे, अशोक कावरखे, रामेश्वर कावरखे, गजानन जाधव, धीरज मापारी, नामदेव पतंगे आदींचा यात समावेश आहे. त्यानंतर ३० नोव्हेंबरला जलसमाधी आंदोलनाचा प्रयत्न मुंबईत जावून केला. मात्र त्यावेळीही पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर पुन्हा गोरेगाव येथे येवून शेतकऱ्यांनी आंदोलन सुरूच ठेवले. या शेतकऱ्यांचा प्रश्न अनेकांनी विधिमंडळातही मांडला.

१९ डिसेंबर रोजी हे शेतकरी नागपूर येथे विधिमंडळ अधिवेशनावर धडकले. त्यांच्यासमवेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर व इतर शेतकरीही होते. शांततेच्या मार्गाने गळ्यात किडनी, लिव्हर व डोळ्यांचे दर लटकवलेले फलक घेवून ही मंडळी विधान भवनाकडे जात होते. ५०० मीटर अंतरावर असताना त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सध्या ही मंडळी पोलिसांच्या ताब्यात आहे. बळजबरीने त्यांना गाडीत कोंबून नेले. आता सरकारकडून चर्चेसाठी बोलावणे आल्याचे सांगण्यात आले.

...तर संसदेसमोर आंदोलनशेतकऱ्यांना सततच्या नापिकीमुळे या संकटातून बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणे आवश्यक आहे. तसे न झाल्यास शेतकरी आत्महत्या वाढण्याची भीती आहे. सरकारसोबत चर्चेत हाच प्रमुख मुद्दा राहणार आहे. जर राज्य सरकारकडे तोडगा निघाला नाही तर आता दिल्लीत संसद भवनासमोर अवयव विक्रीसाठी जाणार असल्याचे नामदेव पतंगे यांनी सांगितले.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनHingoliहिंगोलीFarmerशेतकरी