शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अवयव विक्रीस काढणाऱ्या शेतकऱ्यांची नागपूरात विधीमंडळावर धडक, पोलिसांनी घेतले ताब्यात 

By सुमित डोळे | Updated: December 19, 2023 13:20 IST

जर राज्य सरकारकडे तोडगा निघाला नाही तर आता दिल्लीत संसद भवनासमोर अवयव विक्रीसाठी जाणार

हिंगोली : सेनगाव तालुक्यातील गोरेगाव परिसरातील शेतकऱ्यांनी अवयव विक्रीसाठी नागपूर येथील विधिमंडळ अधिवेशनावर धडक मारल्यानंतर तेथे या शेतकऱ्यांना पोलिसांनी १९ रोजी दुपारी १२ च्या सुमारास ताब्यात घेतले आहे. त्यांना सरकारकडून चर्चेसाठी निमंत्रणही मिळाले आहे.

हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मागील अनेक दिवसांपासून सरकारशी लढा सुरू आहे. सततची नापिकी, पिकांवरील रोगराईमुळे शेतीचा लागवड खर्चही निघाला नाही. त्यामुळे पीककर्ज फेडायचे तर आमचे अवयव विकत घ्या, अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली होती. २२ नोव्हेंबरला पहिल्यांदा किडनी, डोळे, लिव्हर विक्री करायचे असल्याचे निवेदन दिले होते. गजानन कावरखे, दीपक कावरखे, विजय कावरखे, दशरथ मुळे, संजय मुळे, अशोक कावरखे, रामेश्वर कावरखे, गजानन जाधव, धीरज मापारी, नामदेव पतंगे आदींचा यात समावेश आहे. त्यानंतर ३० नोव्हेंबरला जलसमाधी आंदोलनाचा प्रयत्न मुंबईत जावून केला. मात्र त्यावेळीही पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर पुन्हा गोरेगाव येथे येवून शेतकऱ्यांनी आंदोलन सुरूच ठेवले. या शेतकऱ्यांचा प्रश्न अनेकांनी विधिमंडळातही मांडला.

१९ डिसेंबर रोजी हे शेतकरी नागपूर येथे विधिमंडळ अधिवेशनावर धडकले. त्यांच्यासमवेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर व इतर शेतकरीही होते. शांततेच्या मार्गाने गळ्यात किडनी, लिव्हर व डोळ्यांचे दर लटकवलेले फलक घेवून ही मंडळी विधान भवनाकडे जात होते. ५०० मीटर अंतरावर असताना त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सध्या ही मंडळी पोलिसांच्या ताब्यात आहे. बळजबरीने त्यांना गाडीत कोंबून नेले. आता सरकारकडून चर्चेसाठी बोलावणे आल्याचे सांगण्यात आले.

...तर संसदेसमोर आंदोलनशेतकऱ्यांना सततच्या नापिकीमुळे या संकटातून बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणे आवश्यक आहे. तसे न झाल्यास शेतकरी आत्महत्या वाढण्याची भीती आहे. सरकारसोबत चर्चेत हाच प्रमुख मुद्दा राहणार आहे. जर राज्य सरकारकडे तोडगा निघाला नाही तर आता दिल्लीत संसद भवनासमोर अवयव विक्रीसाठी जाणार असल्याचे नामदेव पतंगे यांनी सांगितले.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनHingoliहिंगोलीFarmerशेतकरी