शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
3
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
4
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
5
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
6
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
7
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
8
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
9
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
10
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
11
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
13
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
14
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
15
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
16
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
17
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
18
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
19
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
20
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली

‘आद्रतेच्या’ नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 00:38 IST

येथील बाजारपेठेत सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. सोयाबीनला शासनाने ३ हजार ३९९ रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केला, तरीही व्यापारी २ हजार ३०० ते २ हजार ७०० रुपये प्रतिक्वंटल दराने खुलेआम खरेदी करत असल्याचे चित्र दिसत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवसमत : येथील बाजारपेठेत सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. सोयाबीनला शासनाने ३ हजार ३९९ रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केला, तरीही व्यापारी २ हजार ३०० ते २ हजार ७०० रुपये प्रतिक्वंटल दराने खुलेआम खरेदी करत असल्याचे चित्र दिसत आहे.हमीभावामध्ये चांगल्या दर्जाच्या सोयाबीनला ३ हजार ३९९ रुपये दर आहे. मात्र व्यापारी हमीभावापेक्षा एक हजार रुपये कमी दराने खरेदी करत असल्याने शेतकºयांची फसवणूक होत असल्याचा प्रकार वसमत बाजारपेठेत सर्रासपणे घडत आहे. तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने नुकसानीच्या भितीपोटी सोयाबीन काढणीला वेग आला आहे. शेतकरी सोयाबीन काढणीनंतर सरळ बाजारात आणत असल्याने व्यापारी आद्रतेच्या नावाखाली शेतकºयांची लूट करत आहेत. शेतमाल परत नेण्यास वाहतूकीचा खर्च अंगावर पडत असल्याने शेतकरी मिळेल त्या भावात सोयाबीन विक्री करत आहेत. विक्रीसाठी आणलेल्या सोयाबीनची आद्रता किमान दहा पर्यंत असावी. अशी शासनाची अट आहे. मात्र व्यापारी आद्रता जास्त असल्याच्या नावाखाली कवडीमोल भावाने सोयाबीन खरेदी करत आहेत. सद्यस्थितीत येथील नाफेडचे हमीभाव खरेदी केंद्र सुरू नाही. अल्पभूधारक शेतकºयांना शेतमाल वेळेवर विकल्याशिवाय पर्याय नसतो. त्यातच हमीभाव खरेदी केंद्रावर चूकाºयाची वर्षवर्ष वाट पहावी लागते. अशा अनंत अडचणींमुळे शेतकºयांचे आर्थिक गणित बिघडते त्यामुळे शेतकºयांना व्यापाºयांना शेतमाल विकल्याशिवाय पर्याय उपलब्ध नसल्याची अडचण शेतकरी व्यक्त करत आहेत.बाजार समितीचे सचिव सोपान शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता सध्या सोयाबीनला कमी दर मिळत असेल तर बाजार समितीच्या शेतमाल तारण योजनेअंतर्गत शेतमाल ठेऊन त्याचा लाभ घ्यावा, वसमत येथे नाफेडचे हमीभाव खरेदी केंद्र लवकरच सुरू होणार आहे. त्यासाठी सोयाबीनची आॅनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन त्यांनी केले.केंद्र सरकारने जाहीर केलेल्या हमी भावात व्यापाºयांनी शेतमाल खरेदी करावा. हमी भावाच्या कमी दराने जर शेतमालाची खरेदी करणाºया व्यापाºयांवर गुन्हे दाखल करू, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. आज बाजारात हमीभावापेक्षा एक हजार रुपये कमी किंमतीने सर्रास सोयाबीनची खरेदी होत आहे. तरी अद्याप तालुक्यात एकाही व्यापाºयावर गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करणाºया व्यापाºयांवर गुन्हे दाखल करण्याच्या घोषणेचे काय? असाही प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत.शासन व्यापाºयांचीच बाजू घेतेसोयाबीन कितीही वाळवले तरी आद्रता कमी होत नाही. व्यापारी मनमानी पध्दतीने आद्रता ठरवून कवडीमोल दामात सोयाबीन खरेदी करत आहेत. शासनाने मोठ्या थाटात हमीभाव जाहीर केला. मात्र शासन व्यापाºयांची बाजू घेत असल्याने शेतकºयांची फसवणूक होत आहे.- पांडूरंग सोळंके, शेतकरी रा. लिंगी ता. वसमत

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती