शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

‘आद्रतेच्या’ नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 00:38 IST

येथील बाजारपेठेत सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. सोयाबीनला शासनाने ३ हजार ३९९ रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केला, तरीही व्यापारी २ हजार ३०० ते २ हजार ७०० रुपये प्रतिक्वंटल दराने खुलेआम खरेदी करत असल्याचे चित्र दिसत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवसमत : येथील बाजारपेठेत सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. सोयाबीनला शासनाने ३ हजार ३९९ रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केला, तरीही व्यापारी २ हजार ३०० ते २ हजार ७०० रुपये प्रतिक्वंटल दराने खुलेआम खरेदी करत असल्याचे चित्र दिसत आहे.हमीभावामध्ये चांगल्या दर्जाच्या सोयाबीनला ३ हजार ३९९ रुपये दर आहे. मात्र व्यापारी हमीभावापेक्षा एक हजार रुपये कमी दराने खरेदी करत असल्याने शेतकºयांची फसवणूक होत असल्याचा प्रकार वसमत बाजारपेठेत सर्रासपणे घडत आहे. तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने नुकसानीच्या भितीपोटी सोयाबीन काढणीला वेग आला आहे. शेतकरी सोयाबीन काढणीनंतर सरळ बाजारात आणत असल्याने व्यापारी आद्रतेच्या नावाखाली शेतकºयांची लूट करत आहेत. शेतमाल परत नेण्यास वाहतूकीचा खर्च अंगावर पडत असल्याने शेतकरी मिळेल त्या भावात सोयाबीन विक्री करत आहेत. विक्रीसाठी आणलेल्या सोयाबीनची आद्रता किमान दहा पर्यंत असावी. अशी शासनाची अट आहे. मात्र व्यापारी आद्रता जास्त असल्याच्या नावाखाली कवडीमोल भावाने सोयाबीन खरेदी करत आहेत. सद्यस्थितीत येथील नाफेडचे हमीभाव खरेदी केंद्र सुरू नाही. अल्पभूधारक शेतकºयांना शेतमाल वेळेवर विकल्याशिवाय पर्याय नसतो. त्यातच हमीभाव खरेदी केंद्रावर चूकाºयाची वर्षवर्ष वाट पहावी लागते. अशा अनंत अडचणींमुळे शेतकºयांचे आर्थिक गणित बिघडते त्यामुळे शेतकºयांना व्यापाºयांना शेतमाल विकल्याशिवाय पर्याय उपलब्ध नसल्याची अडचण शेतकरी व्यक्त करत आहेत.बाजार समितीचे सचिव सोपान शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता सध्या सोयाबीनला कमी दर मिळत असेल तर बाजार समितीच्या शेतमाल तारण योजनेअंतर्गत शेतमाल ठेऊन त्याचा लाभ घ्यावा, वसमत येथे नाफेडचे हमीभाव खरेदी केंद्र लवकरच सुरू होणार आहे. त्यासाठी सोयाबीनची आॅनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन त्यांनी केले.केंद्र सरकारने जाहीर केलेल्या हमी भावात व्यापाºयांनी शेतमाल खरेदी करावा. हमी भावाच्या कमी दराने जर शेतमालाची खरेदी करणाºया व्यापाºयांवर गुन्हे दाखल करू, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. आज बाजारात हमीभावापेक्षा एक हजार रुपये कमी किंमतीने सर्रास सोयाबीनची खरेदी होत आहे. तरी अद्याप तालुक्यात एकाही व्यापाºयावर गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करणाºया व्यापाºयांवर गुन्हे दाखल करण्याच्या घोषणेचे काय? असाही प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत.शासन व्यापाºयांचीच बाजू घेतेसोयाबीन कितीही वाळवले तरी आद्रता कमी होत नाही. व्यापारी मनमानी पध्दतीने आद्रता ठरवून कवडीमोल दामात सोयाबीन खरेदी करत आहेत. शासनाने मोठ्या थाटात हमीभाव जाहीर केला. मात्र शासन व्यापाºयांची बाजू घेत असल्याने शेतकºयांची फसवणूक होत आहे.- पांडूरंग सोळंके, शेतकरी रा. लिंगी ता. वसमत

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती