शहरं
Join us  
Trending Stories
1
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
2
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
3
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
4
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
8
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
9
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
10
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
11
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
12
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
13
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
14
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
15
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
16
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
17
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
18
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
19
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
20
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला

‘मशरुम’ च्या शेतीचा शेतकऱ्याला आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 23:35 IST

सध्या शेतकरी आस्मानी संकटासह सुलतानी संकटात सापडला आहे. अशातच कृषी विभागाने मागील पाच वर्षापासून राबविण्यात येणा-या ‘मशरुम’ च्या शेतीमुळे शेतक-यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. मागील वर्षी या कार्यक्रमाचा जवळपास २०० शेतक-यांनी लाभ घेतल्याचे सांगितले जात असून, यंदा १३२ शेतक-यांची आॅनलाईन नोंदणी झाल्याचीही माहिती कृषी विभागाकडून मिळाली आहे.

ठळक मुद्देहिंगोली : जिल्ह्याला १ कोटी २५ लाखांचे उद्दिष्ट

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : सध्या शेतकरी आस्मानी संकटासह सुलतानी संकटात सापडला आहे. अशातच कृषी विभागाने मागील पाच वर्षापासून राबविण्यात येणा-या ‘मशरुम’ च्या शेतीमुळे शेतक-यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. मागील वर्षी या कार्यक्रमाचा जवळपास २०० शेतक-यांनी लाभ घेतल्याचे सांगितले जात असून, यंदा १३२ शेतक-यांची आॅनलाईन नोंदणी झाल्याचीही माहिती कृषी विभागाकडून मिळाली आहे.मागील चार ते पाच वर्षापासून शेतक-यांवर निसर्गाची अवकृपा दिसून येते, ती यंदाही कायम आहे. महागडे बी- बियाणे शेतीत टाकून कधी- कधी त्याचा प्रवास सुरु होण्यापूर्वीच नायनाट होतो तर कधी प्रवासादरम्यान नायनाट होतो. शेवटच्या टप्यापर्यंत मिळणा-या उत्पन्नातून मात्र शेतक-यांचा भांडवली खर्चही निघणे कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे शेतकरी शेतीला जोडधंदा करण्याच्या तयारी दाखवित आहेत. त्या अनुषंगाने कृषी विभागाकडे शेतीला जोड व्यवसाय करण्यासाठी अनेक योजना राबविल्याजातात. आता मागील पाच वर्षापासून अनुदान तत्वावर शेतक-यांसाठी ‘मशरुम’ हा कार्यक्रम राबविला जात आहे. याचबरोबर शेतक-यांना शेत तळे, विविध शेतीची अवजारे इ. प्रकारचे साहित्यही या कार्यक्रमांतर्गत उपलब्ध करुन दिले जातात. यंदाही १ कोटी २५ लाख रुपयाचे उद्दिष्ट असून, ते दर वर्षी पुर्ण होत असल्याचे कृषी विभागाच्यावतीने सांगितले जाते. मात्र पाहिजे तशी जनजागृतीच होत नसल्याने हा कार्यक्रम खरोखरच शेतक-यांपर्यंत पोहोचत असेल का, हा एक प्रश्नच आहे. कार्यक्रमात १ कोटी २५ लाख रुपयाचे उद्दिष्ट असून, लाभार्थ्याच्या मागणीनुसार साहित्य पुरविले जाते. तर ‘मशरुम’ साठीही पूर्ण साहित्य उपब्लध करुन दिले जाते. तर मशरुमला मुंबई, हैदराबाद या ठिकाणी सर्वाधिक जास्त मागणी असते.साडेतीनशे ते चारशे रुपये प्रति किलाने प्रमाणे ओल्या मशरुमची तर वाळवलेल्या मशरुमला ८०० रुपये प्रति किलो पर्यंत भाव मिळतो.---दिलासा : आॅनलाईन नोंदणीचे आवाहनआजघडीला अर्ध्याउबार खरिपाच्या पेरण्या आटोपल्या आहेत. मात्र पाऊसच नसल्याने, जमिनीबाहेर निघालेली पिके सुकून जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पुन्हा शेतक-यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. अशा परिस्थितीत मात्र ही मशरुमची शेती शेतक-यांना फायद्याची ठरणार आहे. योजनेंतर्गत २० जून पर्यंत अर्ज दाखल करुन घेण्यात येणार आहेत. पावसामुळे हैराण झालेल्या शेतक-यांसाठी ‘मशरुम’ ची शेती खरोखर उत्पन्न देणारी ठणार हे मात्र निश्चित. सध्या वलाना येथील एक शेतकरी मशरुम पासून हजारो रुपयाचे उत्पन्न घेत आहे.---कार्यक्रमास मंजुरी नाहीदर वर्षीही योजना राबविण्यात येत असली तरीही अद्याप या कार्यक्रमास मंजुरी मिळालेली नाही. अर्ज प्रक्रिया दाखल झाल्यानंतर या कार्यक्रमाला मंजुरी मिळणार असल्याचे कृषी विभागातर्फे सांगितले.

टॅग्स :HingoliहिंगोलीFarmerशेतकरी