शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंच्या तक्रारीनंतर अमित शाहांकडून रवींद्र चव्हाणांची पाठराखण; "पक्षबांधणी सुरूच ठेवा..."
2
इंग्रज ढासळले...! ब्रिटिश इंडियन्स, उद्योजक ब्रिटन सोडू लागले! अब्जाधीश हरमन नरुला दुबईला स्थायिक होणार
3
“मनसेचा आघाडीचा प्रस्ताव नाही, आम्हाला महाराष्ट्र धर्म शिकवू नये”; काँग्रेस नेत्यांचे उत्तर
4
निवडणूक न लढताच 'जीन्स-शर्ट'मधील तरुणाने घेतली मंत्रिपदाची शपथ! कोण आहेत दीपक प्रकाश?
5
IIT दिल्लीमध्ये देशातील पहिल्या ‘Gen-Z पोस्ट ऑफिस’ची सुरुवात; Wifi, QR द्वारे पार्सल बुकिंग
6
"आता मैदान मोकळं, बघू कोण येतंय!"; संरक्षणातील पोलिसांना परत पाठवत जरांगेंचे आव्हान
7
Tesla Model Y सेफ्टी टेस्टमध्ये 'Pass' की 'Fail'? 5-स्टार रेटिंगमध्ये किती पॉइंट्स मिळाले? जाणून घ्या
8
“बिहारने जंगलराज नाकारून विकासाला मत दिले”; शिंदेंनी केले PM मोदी-नितीश कुमारांचे अभिनंदन
9
Metaचे मोठे पाऊल! WhatsApp मध्ये लवकरच येणार 'हे' जबरदस्त फीचर; वारंवार लॉग-इन करण्याची कटकट संपणार
10
मुलांच्या भविष्यासाठी सोने की SIP? 'या' दोन्ही पर्यायांचे फायदे-तोटे समजून घ्या आणि योग्य गुंतवणूक निवडा!
11
...त्यामुळे सर्व छोट्या मोठ्या कुरुबरी अमित शाह यांना जाऊन सांगितल्या जातात; काँग्रेसचा टोला
12
जम्मूमध्ये 'काश्मीर टाईम्स'च्या कार्यालयावर SIA चा मोठा छापा; AK-47 च्या गोळ्या आणि ग्रेनेडचा लिव्हर जप्त!
13
बाजारात तेजीचा डबल धमका! निफ्टी वर्षभरानंतर २६,२०० पार, गुंतवणूकदारांची ६८,००० कोटींची कमाई
14
Red Fort Blast: दिल्लीतील स्फोट प्रकरणात आणखी चार प्रमुख आरोपींना अटक, एनआयएची मोठी कारवाई
15
सप्तपदी झाले, डीजेवर नाचली, पाठवणीच्या वेळी पसार, नवरदेव म्हणतो, "जमीन गहाण ठेवून लग्न..."
16
दिल्ली दंगल सूनियोजित कट होता; उमर खालिद-शरजील इमामच्या जामिनास पोलिसांचा विरोध
17
अ‍ॅसिड हल्ल्यातील 'ममता'चा अखेर मृत्यू; फेसबुकवर वेदना मांडणाऱ्या आईची दोन मुले झाली पोरकी
18
नेपाळमध्ये पुन्हा एकदा Gen-Z रस्त्यावर उतरले, मोठा गोंधळ सुरू; कर्फ्यू लागू
19
EVM मध्ये ३६ मतांची आघाडी, पण ३६० पोस्टल मते बाद झाली आणि पारडे फिरले, बिहारमधील अजब निकाल चर्चेत
20
Supreme Court: संसद न्यायालयीन निर्णयावर कुरघोडी करू शकत नाही; लवाद सुधारणा कायद्याच्या तरतुदी सुप्रीम कोर्टाकडून रद्द
Daily Top 2Weekly Top 5

पीककर्जासाठी शेतकऱ्यांना बँकेतच प्रवेश नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:31 IST

जिल्ह्यातील बँकांना एकूण १००८ कोटी रुपयांच्या पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. यापैकी ७५५ कोटी रुपये खरिपात वाटायचे आहेत. यात जिल्हा ...

जिल्ह्यातील बँकांना एकूण १००८ कोटी रुपयांच्या पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. यापैकी ७५५ कोटी रुपये खरिपात वाटायचे आहेत. यात जिल्हा मध्यवर्ती बँकेला ११८ कोटींचे उद्दिष्ट आहे. या बँकेने आतापर्यंत १०२४ शेतकऱ्यांना ५.६१ कोटींचे वाटप केले. हे प्रमाण ४.७२ टक्के आहे. ग्रामीण बँकेेनेही गतवर्षी ७३ टक्के वाटप केेले होते. यंदा १२६ कोटींचे उद्दिष्ट असून, अजून प्रारंभ नाही. राष्ट्रीयीकृत बँकांना सर्वाधिक ५१० कोटींचे उद्दिष्ट आहे. प्रत्यक्षात ३५२ शेतकऱ्यांना ४.६६ कोटींचे वाटप केले. हे प्रमाण ०.९१ टक्के एवढे आहे. जिल्ह्यात एकंदरीत विचार केला तर १३७६ शेतकऱ्यांना १०.२८ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप झाले. हे प्रमाण १.३६ टक्के आहे. पुढच्या महिन्यात तर पेरण्यांनाच प्रारंभ होतो. शेतकऱ्यांनी मशागतीची कामे करून पेरण्यांची तयारी करायची की पीक कर्जासाठी बँकेच्या रांगेत लागायचे? हा प्रश्न आहे. त्यातच रांगा टाळण्यासाठी आतापासून बँकांनी नियोजन केले तर वेळेत पीककर्ज वाटप शक्य आहे.

गतवर्षी असे होते वाटप

गतवर्षी खरिपात जिल्हा मध्यवर्ती बँकेने २९ हजार ६३८ शेतकऱ्यांना ७६.७५ कोटींचे पीककर्ज वाटप करून ५१ टक्के उद्दिष्ट गाठले होते. व्यापारी बँकांनी ३५ हजार ३९२ शेतकऱ्यांना ३२२ कोटींचे पीककर्ज वाटप करून ३७ टक्के उद्दिष्ट गाठले होते, तर ग्रामीण बँकेने १८२४७ शेतकऱ्यांना ११७ कोटींचे वाटप करून ७३ टक्के उद्दिष्ट गाठले होते.

रब्बीत ७३ टक्के कर्जवाटप

गतवर्षी खरिपात कर्ज न दिलेल्या अनेकांना रबी हंगामात कर्ज दिल्याने ७३ टक्के उद्दिष्ट गाठले होते. मध्यवर्ती बँकेने ३५.६४ कोटी, व्यापारी बँकांनी १४६.१३ कोटी, तर ग्रामीण बँकेने १८.८७ कोटींचे वाटप केले होते. २० हजार शेतकऱ्यांना लाभ मिळाला हाेता.

कर्जमाफीत गलेलठ्ठ बँकांची मुजोरी

कर्जमाफीत राष्ट्रीयीकृत बँकांना जवळपास ५०० कोटी रुपये मिळाले आहेत. मात्र, तरीही याच बँका पीककर्ज वाटपात मागे आहेत. शिवाय शासकीय योजनांच्या ठेवीही याच बँकांमध्ये आहेत. तरीही त्यांना पीककर्ज देण्यात स्वारस्य नाही. सर्वात जास्त स्टेट बँक ऑफ इंडियाचा कारभार वाईट असून, शेतकऱ्यांना कस्पाटासमान समजणाऱ्या या बँकेला धडा शिकविणे गरजेचे आहे.

१५ एप्रिलपर्यंत बैठक

यंदा कोराेनाच्या पार्श्वभूमीवर बँकांनी पीककर्ज वाटप प्रक्रिया सुलभ करावी. शेतकऱ्यांना वेळेत कर्ज मिळावे, यासाठी १५ मे पूर्वी बैठक घेऊन याचे नियोजन केले जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिली. यामध्ये कर्जवाटपाबाबतही सक्त सूचना दिल्या जातील, असे ते म्हणाले.