शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्याने दहा गुंठ्यांत फुलवली गुलाबशेती; दोन लाखांचे मिळते उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 20:00 IST

पारंपरिक शेतीला मिळवला चांगला पर्याय

- गंगाधर भोसले

वसमत : तालुक्यातील पांगरा बोखारे येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्याने गेल्या सात वर्षांपासून शेतीला जोडव्यवसाय म्हणून भाजीपाला व फूलशेती सुरू केली आहे. गत सहा वर्षांपासुन फूलशेतीचा व्यवसाय करत दरवर्षी १० गुंठ्याच्या गुलाबाच्या शेतीमधून सव्वा ते दीड लाख रूपयांपर्यंत उत्पन्न मिळवले आहे.

तालुक्यातील पांगरा बोखारे येथील गणेश बोखारे हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. पाच-सहा वर्षापूर्वीपर्यंत ते  पारंपरिक पद्धतीने शेती करत होते. यामध्ये समाधानकारक उत्पन्न मिळत नसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणे कठीण होत होते. त्यामुळे ते भाजीपाला शेतीकडे वळले. दोन वर्षे वीस गुंठे शेतीमध्ये त्यांनी भाजीपाल्याचे उत्पन्न घेतले. यातही बऱ्याच वेळा नुकसान होत होते. त्यामुळे त्यांनी फूलशेतीचा पर्याय शोधला. जून २०१३ मध्ये त्यांनी  १० गुंठे  शेतात ५०० गुलाबांच्या झाडांची लागवड केली. त्यावेळी त्यांना २७ हजार रूपये खर्च आला. यानंतर ठिबक व्यवस्था केली. गुलाबासाठी मुबलक प्रमाणात पाणी लागते. गुलाबाचा हंगाम वर्षातुन दहा महिने असतो तर दोन महिने उत्पन्नात खंड पडतो. लागवडीनंतर पहिल्या वर्षी त्यांना अल्प प्रमाणात उत्पन्न मिळाले. परंतु बाजारभाव चांगला असल्याने त्यावर्षी १ लाख ९ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. एका गुलाबाला पहिल्या हंगामात साधारणत: ६० ते ७० फुले लागतात. 

वर्षभरात एका झाडाला साडेतीनशे ते चारशे फुले निघतात. हंगामानुसार दररोज कमी-अधिक प्रमाणात फुले निघतात. त्याप्रमाणे बाजार भाव देखील ५० रूपयांपासून ते ५०० रुपये किलो पर्यंत असतो. १० महिन्यांचा अंदाज लावल्यास सरासरी दररोज दीड ते दोन हजारांची फुले विकतात. लग्नसराईत गुलाबाला चांगला भाव मिळतो. गत पाच वर्षांपासन दहा गुंठे शेतीमधून दरवर्षी दीड ते दोन लाखांचे निव्वळ उत्पन्न मिळते. दररोज सकाळी फुले तोडावी लागतात. ते स्वत: फुले तोडून नांदेडच्या बाजारात विकतात. दहा गुंठ्यात दररोज १० ते १२ किलो फुले निघतात. 

गुलाबाच्या फुलांना मिळतोय चांगला दर...सध्या गुलाबाच्या फुलाचा भाव १५० रुपयांपासून ते २०० पर्यंत असल्याचे ते सांगतात. गुलाब फूलशेतीसाठी फारसे व्यवस्थापन करण्याची गरज नाही. खते व कीटकनाशकेही फारशी लागत नाहीत. केवळ पावसाळ्याच्या सुरुवातीला त्यांची छाटणी करावी लागते. पाऊस पडताच गुलाब बहारदार बनतो. छाटणी उत्पादन वाढीसाठी फायदेशीर ठरते. झेंडू उत्पादनाचाही त्यांनी अनुभव घेतला आहे. पारंपरिक शेतीसोबतच पूरक व्यवसाय करावा, असे ते सांगतात. 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीHingoliहिंगोली