शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
2
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
3
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
4
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
5
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
6
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
7
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
8
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार
9
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
10
७ महिन्यातील सर्वात मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे ६.६५ लाख कोटी पाण्यात, तब्बल १५४ शेअर्स नीचांकीवर
11
'क्रू २' ची तयारी सुरू! करीना कपूर-क्रिती सनॉन-तब्बू सुपरहिट त्रिकुट पुन्हा दिसणार का?, जाणून घ्या याबद्दल
12
Latur: 'मला वाचवा', आयुष्य संपवायचं म्हणून तरुणीने पाण्यात उडी मारली अन् पुन्हा जगण्याची इच्छा झाली
13
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
14
मुंबईत बेकायदेशीर भाडे आकारणाऱ्या अ‍ॅप-आधारित टॅक्सी, रिक्षा आणि वाहनांवर कारवाईचा बडगा
15
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
16
सिमेंटची गोणी ४२५ वरून ३७५ रुपयांवर! पण, कंपन्या करू शकतात चलाखी? ग्राहकांना लाभ मिळणार का?
17
"तो काय बोलतो तुम्हाला तरी कळतं का?", भार्गवला हिणावणाऱ्यांना भावाचं सणसणीत उत्तर, म्हणाला...
18
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
19
कार, आयफोन आणि विदेशवारीचे आमिष देऊन करत होता विद्यार्थिनींची निवड! चैतन्यानंदवर आणखी गंभीर आरोप
20
"दुर्गा मातेला प्रार्थना करतो की, निवडणुकीनंतर असे सरकार बनावे जे..."; बंगालमध्ये नेमकं काय म्हणले अमित शाह?

तुटपुंजे मानधनही मिळेना वेळेवर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 23:57 IST

मागील सात ते आठ महिन्यांपासून मध्यान भोजन शिजविणाऱ्या स्वयंपाकी मदतनिसांना अद्याप मानधन वाटप करण्यात आले नाही. त्यामुळे स्वयंपाकी मदतनिसांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. शासनाकडून तुटपुंजे मानधनही वेळेत दिले जात नाही हे विशेष.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मागील सात ते आठ महिन्यांपासून मध्यान भोजन शिजविणाऱ्या स्वयंपाकी मदतनिसांना अद्याप मानधन वाटप करण्यात आले नाही. त्यामुळे स्वयंपाकी मदतनिसांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. शासनाकडून तुटपुंजे मानधनही वेळेत दिले जात नाही हे विशेष.जिल्ह्यातील हजारो स्वयंपाकी मदतनिसांचे मानधन अद्याप रखडलेलेच आहे. जिल्हा परिषद शाळेत मध्यान्ह भोजन शिजविणाºया मदतनिसांच्या मानधनाचा प्रश्न अद्याप मार्गी लागला नसल्याने सध्या उसणवारीवरच व्यवहार सुरू आहेत. तेही बंद होण्याच्या मार्गावर आहेत. शिवाय इंधन व भाजीपाल्याची रक्कमही मिळाली नाही. त्यामुळे मदतनिसांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत असून जिल्हाभरातील मदतनिसांच्या मानधनाचा प्रश्न कायम आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शालेय पोषण आहार योजना राबविली जाते. योजना प्रभावीपणे राबविण्याच्या शासनाच्या सूचना आहेत, शिवाय या योजनेवर कोट्यावधी रुपयांचा खर्च करण्यात येतो. परंतु शासनाची ही महत्त्वपूर्ण योजना प्रभावीपणे राबविली जात नाही. कधी शाळेत तांदुळाचा पुरवठा वेळेत होत नाही, तर कधी धान्यादी मालच नसतो. या विविध कारणांमुळे मात्र शाळकरी मुलांना पोषण आहार मिळत नाही. त्यात स्वयंपाकी मदतनिसांनाच्या मानधनाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. मानधन देण्याची मागणी मागील अनेक महिन्यांपासून आहे. परंतु याबाबत संबधित यंत्रणा लक्ष देण्यास तयार नसल्याचे मतदनिसांतून सांगितले जात आहे. मध्यान्ह भोजन म्हणून दिल्या जाणाºया पोषण आहार योजनेतून नेमके कोणाचे पोषण होत आहे असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.पुणे येथील शालेय पोषण आहारच्या स्वतंत्र विभागास म. रा. प्रा. शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष सुभाष जिरवणकर यांनी २०१६-१७ ते २०१७-१८ या वर्षातील मदतनिसांच्या मानधनाबाबत लेखी तक्रार केली होती. याबाबत संबधित विभागाने चौकशी करण्याचे पत्रही शिक्षण विभागास पाठविले आहे.जिल्हा परिषदेच्या १ हजार शाळांमधून दीड लाखाच्या वर पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जातो. सकस आहारापासून विद्यार्थी वंचित राहू नये, याची शासनाकडून खबरदारी घेतली जात असली तरी संबधित यंत्रणेच्या ढिसाळ कारभारामुळे शाळकरी मुलांना पोषण आहारापासून वंचित राहण्याची वेळ येते. याकडे वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष देणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे मदनिसांचे मानधन नियमित करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. परंतु मानधनाच्या समस्येकडे दुर्लक्ष केले जाते.शिक्षण विभागातील संबधित यंत्रणाही मतदनिसांच्या मानधनाबाबत काही बोलण्यास तयार नाहीत. त्यामुळे नेमके मानधन न अदा करण्याचे कारण समजण्यास मार्ग नाही.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रSchoolशाळा