शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

प्रत्येकाला अधिकारांची जाणीव झाली पाहिजे -विशेष पोलीस महानिरीक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 00:27 IST

प्रत्येकाला आपल्या अधिकारांची जाणीव झाली पाहिजे, महिला व शालेय विद्यार्थिनींनी निर्भय बनावे, त्यांच्या संरक्षणार्थ पोलीस दल सदैव पाठीशी खंबीर राहील, असे प्रतिपादन नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद यांनी केले. हिंगोली शहर ठाण्यात ६ मार्च रोजी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : प्रत्येकाला आपल्या अधिकारांची जाणीव झाली पाहिजे, महिला व शालेय विद्यार्थिनींनी निर्भय बनावे, त्यांच्या संरक्षणार्थ पोलीस दल सदैव पाठीशी खंबीर राहील, असे प्रतिपादन नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद यांनी केले. हिंगोली शहर ठाण्यात ६ मार्च रोजी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, पोलीस उपधीक्षक गृह सुजाता पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, पोनि अशोक मैराळ, पोनि जगदीश भंडरवार, स्थागुशाचे पोनि मारोती थोरात यांच्यासह पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी हजर होते. पुढे बोलताना चिरंजीव प्रसाद म्हणाले, गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस दलात नव-नवीन बदल केले जात आहेत. विशेष म्हणजे आॅनलाईन तक्रार पद्धतीमुळे घर बसल्या तक्रार नोंदविणे शक्य झाले आहे. महिलांनी व शालेय विद्यार्थिनींनी निर्भय बनावे, अत्याचार होत असल्यास पोलिसांना कळवावे, असे त्यांनी सांगितले. चिरंजीव प्रसाद यांच्या हस्ते फिरती व्हॅन, महिला विश्रांतीगृह तसेच कम्युनिटी हॉलचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी निर्भया पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने निर्भया समितीच्या सदस्या, विद्यार्थिनी तसेच महिलांची उपस्थिती होती.पोलीस आपल्या दारी’पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्या सूचनेनुसार पोनि जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि सुप्रिया केंद्रे, राजेश ठोके, अशोक धामणे, ज्योती खिल्लारे, प्रतिभा घुगे, संतोष बंडे यांची नियुक्ती फिरते पोलीस ठाण्यासाठी करण्यात आली. पोलीस ठाण्यापासून लांब अंतरावरावरील फाळेगाव येथे प्रथम भेट देऊन तेथील नागरिकांच्या तक्रारी समजावून घेतल्या.