शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

‘प्रत्येकास वाहतूक नियमांची माहिती हवी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 00:32 IST

जेव्हा तुम्ही एखादे वाहन रस्त्यावर चालविण्यासाठी घेऊन जाता. तेव्हा तर तुम्हाला रस्त्यावरील नियमांची माहिती असणे गरजेचे आहे. जेणेकरुन आपल्याला माहिती असलेल्या नियमामुळे अपघात टळेल आणि मौल्यवान जीव वाचेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जेव्हा तुम्ही एखादे वाहन रस्त्यावर चालविण्यासाठी घेऊन जाता. तेव्हा तर तुम्हाला रस्त्यावरील नियमांची माहिती असणे गरजेचे आहे. जेणेकरुन आपल्याला माहिती असलेल्या नियमामुळे अपघात टळेल आणि मौल्यवान जीव वाचेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी केले.शहर वाहतूक शाखा व उपप्रादेशिक वाहतूक शाखेच्या वतीने सोमवारपासून रस्ता सुरक्षा पंधरवड्याचे आयोजन केले आहे. मंगळवारी त्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या हस्ते केले. याप्रसंगी ते बोलत होते. त्यांनी जिल्ह्यातीलच नव्हे, तर देशातील अपघाताची स्थिती सांगितली. त्यातच अतिमहत्त्वाचे म्हणजे अपघाताला रस्ते कारणीभूत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने दक्ष राहणे गरजेचे आहे. तसेच वाहने चालविताना वाहनाची गतीही कमी असणे तेवढेच गरजेचे आहे. जिल्ह्यात तीन वर्षांमध्ये झालेल्या अपघातांचा आढावा घेतला असता दिवसाकाठी एक ते दोन व्यक्ती अपघातात मृत्युमुखी पडल्याची आकडेवारी समोर आली. त्यामुळे वाहने काळजीपूर्वक चालविल्यास अपघाताच्या घटना टळण्यास मदत होऊन आपले मौल्यवान जीवन वाचण्यास मदत होऊ शकते, असे जिल्हाधिकारी भंडारी म्हणाले.यावेळी पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, सीईओ मुकीम देशमुख, सा.बां.चे कार्यकारी अभियंता सुरेश देशपांडे, प्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक पवार, डॉ. गोपाल कदम, विभाग नियंत्रक जे. एन. सिरसाट, उपाधीक्षक राहुल मदने, सिद्धेश्वर भोरे, बी. आर. बंदखडके, अशोक जाधव, नितीन जाधव आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Hingoli policeहिंगोली पोलीसtraffic policeवाहतूक पोलीस