शहरं
Join us  
Trending Stories
1
योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा...; उद्धवसेना आक्रमक, अनिल परबांचे गंभीर आरोप
2
Conversion Law: राजस्थानात धर्मांतरण कायदा लागू, राज्यपाल हरीभाऊ बागडे यांची मंजुरी, उल्लंघन केल्यास किती शिक्षा होणार? जाणून घ्या
3
टाटा कॅपिटलच्या आयपीओचे शेअर्स मिळाले की नाही? कसं चेक कराल स्टेटस, जीएमपीची स्थिती काय? जाणून घ्या
4
रोहित शर्माने विकत घेतली नवीन आलिशान Tesla Model Y कार, त्याची खासियत काय आणि किंमत किती?
5
श्रीमंतांच्या यादीत मोठी उलथापालथ! एअरटेलचे मित्तल यांची मोठी झेप, शिव नादरांची घसरण, पहिलं कोण?
6
"चाकू हल्ल्यात जेह झालेला जखमी..."; ८ महिन्यांनी सैफने सांगितलं 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?
7
"अजित आगरकरसाठी शेवट खूप विचित्र असेल", रोहित शर्मा वादावर इंग्लंडच्या माजी खेळाडूचं विधान
8
“योगेश कदमांनी अधिकाराचा गैरवापर करत गुंडाला अभय दिले, राजीनामा द्यावा”; ठाकरे गटाची मागणी
9
“शेतकऱ्यांना भरीव मदतीची दानत नाही, तीन आठवड्यांचे अधिवेशन घ्यावे”; शरद पवार गटाची मागणी
10
या एका कारणामुळे 'कांतारा चॅप्टर १' बनला ब्लॉकबस्टर; ऋषभ शेट्टीने सांगितलं सिनेमाच्या यशामागचं सीक्रेट
11
इराण युद्ध अमेरिकाच नाही, तर 'या' देशानेही इस्रायलला दिला होता मोठा पाठिंबा!४ महिन्यांनंतर झाला खुलासा
12
संकष्ट चतुर्थी: भारतातील एकमेव १८ हातांच्या गणपतीचे मंदिर पाहिले का? आपल्या महाराष्ट्रातच आहे!
13
भारत-तालिबान मैत्रीनं पाकिस्तानचं टेन्शन वाढणार; अफगाणिस्तान भारतासाठी इतकं महत्त्वाचं का?
14
Cough Syrup : "पप्पा, मला मोबाईल द्या ना...", वेदांशचे शेवटचे शब्द; १२ लाख खर्च करूनही वाचला नाही जीव
15
मृत सासूला चितेवर ठेवताना शरीरावर दिसल्या जखमा; संशय येताच तपास झाला अन् समोर आलं विदारक सत्य!
16
"WhatsApp वर नोट आणि वरिष्ठांची नाव..."; IAS पत्नीने केले १५ कॉल, लेकीलाही पाठवलं पण...
17
Ratan Tata Death Anniversary: असे होते रतन टाटा... ज्या व्यवसायात हात घातला सोनं केलं, १० पॉईंट्समध्ये पाहा त्यांचा प्रवास
18
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: गणपतीसह लक्ष्मी देवीचेही करा पूजन, मंत्राचे जप ठरतील उपयुक्त!
19
शून्य बँक शिल्लक असतानाही होईल UPI पेमेंट? 'भीम ॲप'चं 'हे' खास फीचर जाणून घ्या!
20
भ्रष्टाचारामध्ये महाराष्ट्र आघाडीवर; ७८५ शासकीय कर्मचारी, खासगी व्यक्तींना अटक; देशभरात २,८७५ ठिकाणी कारवाई

खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांनाही कोरोनाची भीती; मास्क, सॅनिटायझर केला बंधनकारक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:28 IST

हिंगोली : कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनासह सर्वच विभागातील अधिकारी, कर्मचारी पुढाकार घेत आहेत. यात खायगी ट्रॅव्हल्सवालेही मागे ...

हिंगोली : कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनासह सर्वच विभागातील अधिकारी, कर्मचारी पुढाकार घेत आहेत. यात खायगी ट्रॅव्हल्सवालेही मागे राहिले नाहीत. प्रवाशांना मास्क व सॅनिटायझर बंधनकारक केला असून त्यानंतरच ट्रॅव्हल्समध्ये प्रवेश दिला जात आहे.

कोरोनामुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. अनेकांच्या हातचे काम गेले आहे. याची झळ खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांनाही बसली आहे. कोरोनामुळे प्रवासी संख्या घटली आहे. त्यामुळे ट्रॅव्हल्स मालकांनी लांबपल्ल्याच्या फेऱ्यामध्ये घट केली आहे. कोरोनापूर्वी हिंगोली जिल्ह्यातून १२ ट्रॅव्हल्स धावत होत्या. तसेच तेवढ्याच परत येत होत्या. हिंगोली ते नांदेड मार्गावर धावणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्स तर मागील दोन महिन्यापासून बंदच आहेत. परिणामी कोरोनामुळे हा व्यवसायच डबघाईला आला आहे. आता प्रवासी मिळाल्यास केवळ तीन ते चारच खासगी ट्रॅव्हल्सच्या फेऱ्या होत आहेत. यातही मोजकेच प्रवासी प्रवास करताना दिसत आहेत. त्यामुळे चालक, क्लीनरचा पगार कसा करायचा असा प्रश्न दर महिन्याला ट्रॅव्हल्स मालकांना पडत आहे. दरम्यान, प्रवास करताना प्रवासीही स्वत:ची काळजी घेत मास्क व सॅनिटायझरचा वापर करीत आहेत. हिंगोली शहरातून जाणाऱ्या एका ट्रॅव्हल्समध्ये पाहणी केली असता यामध्ये मोजकेच प्रवासी आढळून आले. तसेच प्रवाशांनी मास्क वापरल्याचे दिसत होते.

मास्क, सॅनिटायझरचा वापर

शहरातून लांबपल्ल्याच्या धावणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सची पाहणी केली असता यामध्ये प्रवाशांनी मास्कचा वापर केल्याचे पहावयास मिळाले. तसेच एका सीटवर एकच प्रवासी बसलेला होता. कोराेनामुळे प्रत्येकजण आपआपल्या आरोग्याची काळजी घेत असल्याचे यावेळी दिसून आले.

कारवाईसाठी नेमले पथक

खासगी ट्रॅव्हल्समध्ये कोरोना नियमांचे पालन होते की नाही, याची पाहणी करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने एका पथकाची नियुक्ती केली आहे. या महिन्यात एकाही ट्रॅव्हल्सवर कारवाई झाली नसली तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पथक लक्ष ठेवून असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी यांनी सांगितले.

ई-पास असणे बंधनकारक

परजिल्ह्यात प्रवासी वाहतूक करावयाची झाल्यास ई-पास आवश्यक करण्यात आला आहे. ई-पास असल्यासच दुसऱ्या जिल्ह्यात प्रवासाची परवानगी दिली जात आहे. पोलीस प्रशासन यासाठी पुढाकार घेत असले तरी खासगी ट्रॅव्हल्सच्या वाहतुकीची परवानगी जिल्हाधिकारी कार्यालयातून दिली जात असल्याचेही सूत्रांनी सांगितले.