शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकरी मदतीचा मुद्दा गाजला; कृषिमंत्री आधी म्हणाले, ‘नाही’ नंतर म्हणाले, ‘हो, प्रस्ताव आला’
2
आजचे राशीभविष्य, ४ डिसेंबर २०२५: अचानक धनप्राप्ती अन् विविध फायदे होतील, ज्याने आनंदित व्हाल
3
Orange Gate Tunnel: सोळा मजली उंच इमारतीइतक्या खोल, ७०० इमारतींखालून जाणार ऑरेंज गेट बोगदा
4
लंकादहन: भाजप-शिंदेसेनेतील वाद गाजला, सत्तापक्षांतील वादांचे निवडणुकीत झाले प्रदर्शन
5
Indigo Flights Issue: ...म्हणून इंडिगोची सेवा ढेपाळली; १०० पेक्षा जास्त विमाने झाली रद्द
6
राज्यात सरासरी ६७.६३% मतदान; तळेगाव दाभाडे तळात, तर कोल्हापुरातील मुरगूड अव्वल 
7
नवी मुंबईतील शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश
8
मुंबईसह देशभर विमानतळांवर गोंधळ, २०० विमाने झाली रद्द; बोर्डिंग पास हाताने लिहिण्याची आली वेळ 
9
महामुंबईतील १९ आरएमसी प्लांट बंद, तीन उद्योगांची प्रत्येकी पाच लाखांची बँकहमी जप्त
10
महाडमध्ये दोन गटांतील राड्याप्रकरणी विकास गोगावलेंसह २० जणांवर गुन्हा, परस्परविरोधी तक्रारी दाखल
11
इंडिगोची दोन्ही विमाने रद्द; १२ तास ताटकळले संभाजीनगरकर
12
IND vs SA : मार्करमच्या सेंच्युरीच्या जोरावर द.आफ्रिकेचा मोठा पराक्रम; ऐतिहासिक विजयासह साधला बरोबरीचा डाव
13
“माझ्या भावाला BJPशी मैत्री हवी, पण मुनीर भारताशी युद्ध…”; इम्रान खानची बहीण नेमके काय म्हणाली?
14
IND vs SA Turning Point Of The Match : ती एक चूक नडली! यशस्वीमुळे टीम इंडिया ठरली अपयशी
15
दिल्ली पोटनिवडणुकीत भाजपाला धक्का, काँग्रेसने खाते उघडले; आम आदमी पक्षाचे काय झाले?
16
२० वर्षांनी राज ठाकरे घरी गेले, सक्रीय होताच संजय राऊतांना भेटले; अर्धा तास चर्चा, काय घडले?
17
IND vs SA : पंचांनी चेंडू बदलून दिला, पण... KL राहुलनं कोणावर फोडलं पराभवाचं खापर?   
18
नगर पंचायत-परिषदा निवडणुकीचा मुद्दा संसदेत; सुप्रिया सुळेंचे सरकारवर टीकास्त्र, म्हणाल्या...
19
शतकातील सर्वात दीर्घ सूर्यग्रहण, ६ मिनिटे २३ सेकंदांपर्यंत पसरेल अंधकार, कोणकोणत्या देशांत दिसणार? भारतात कुठे-कुठे दिसणार? जाणून घ्या
20
अजय देवगनकडे या कंपनीचे १०००००० शेअर, आता कंपनीने  घेतला मोठा निर्णय; दिलाय 6000% चा बंपर परतावा!
Daily Top 2Weekly Top 5

खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांनाही कोरोनाची भीती; मास्क, सॅनिटायझर केला बंधनकारक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:28 IST

हिंगोली : कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनासह सर्वच विभागातील अधिकारी, कर्मचारी पुढाकार घेत आहेत. यात खायगी ट्रॅव्हल्सवालेही मागे ...

हिंगोली : कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनासह सर्वच विभागातील अधिकारी, कर्मचारी पुढाकार घेत आहेत. यात खायगी ट्रॅव्हल्सवालेही मागे राहिले नाहीत. प्रवाशांना मास्क व सॅनिटायझर बंधनकारक केला असून त्यानंतरच ट्रॅव्हल्समध्ये प्रवेश दिला जात आहे.

कोरोनामुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. अनेकांच्या हातचे काम गेले आहे. याची झळ खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांनाही बसली आहे. कोरोनामुळे प्रवासी संख्या घटली आहे. त्यामुळे ट्रॅव्हल्स मालकांनी लांबपल्ल्याच्या फेऱ्यामध्ये घट केली आहे. कोरोनापूर्वी हिंगोली जिल्ह्यातून १२ ट्रॅव्हल्स धावत होत्या. तसेच तेवढ्याच परत येत होत्या. हिंगोली ते नांदेड मार्गावर धावणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्स तर मागील दोन महिन्यापासून बंदच आहेत. परिणामी कोरोनामुळे हा व्यवसायच डबघाईला आला आहे. आता प्रवासी मिळाल्यास केवळ तीन ते चारच खासगी ट्रॅव्हल्सच्या फेऱ्या होत आहेत. यातही मोजकेच प्रवासी प्रवास करताना दिसत आहेत. त्यामुळे चालक, क्लीनरचा पगार कसा करायचा असा प्रश्न दर महिन्याला ट्रॅव्हल्स मालकांना पडत आहे. दरम्यान, प्रवास करताना प्रवासीही स्वत:ची काळजी घेत मास्क व सॅनिटायझरचा वापर करीत आहेत. हिंगोली शहरातून जाणाऱ्या एका ट्रॅव्हल्समध्ये पाहणी केली असता यामध्ये मोजकेच प्रवासी आढळून आले. तसेच प्रवाशांनी मास्क वापरल्याचे दिसत होते.

मास्क, सॅनिटायझरचा वापर

शहरातून लांबपल्ल्याच्या धावणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सची पाहणी केली असता यामध्ये प्रवाशांनी मास्कचा वापर केल्याचे पहावयास मिळाले. तसेच एका सीटवर एकच प्रवासी बसलेला होता. कोराेनामुळे प्रत्येकजण आपआपल्या आरोग्याची काळजी घेत असल्याचे यावेळी दिसून आले.

कारवाईसाठी नेमले पथक

खासगी ट्रॅव्हल्समध्ये कोरोना नियमांचे पालन होते की नाही, याची पाहणी करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने एका पथकाची नियुक्ती केली आहे. या महिन्यात एकाही ट्रॅव्हल्सवर कारवाई झाली नसली तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पथक लक्ष ठेवून असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी यांनी सांगितले.

ई-पास असणे बंधनकारक

परजिल्ह्यात प्रवासी वाहतूक करावयाची झाल्यास ई-पास आवश्यक करण्यात आला आहे. ई-पास असल्यासच दुसऱ्या जिल्ह्यात प्रवासाची परवानगी दिली जात आहे. पोलीस प्रशासन यासाठी पुढाकार घेत असले तरी खासगी ट्रॅव्हल्सच्या वाहतुकीची परवानगी जिल्हाधिकारी कार्यालयातून दिली जात असल्याचेही सूत्रांनी सांगितले.