शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

६७५८ शेतक-यांच्या कर्जमाफी अर्जात त्रुट्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 00:22 IST

संपूर्ण कर्जमाफीसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत तालुक्यातील ३६ हजार ३११ शेतकºयांनी महा ई सेवा केंद्रामार्फत आॅनलाईन अर्ज भरले होते. त्यापैकी ६७५८ शेतकºयांच्या कर्जमाफीच्या अर्जात त्रुटी आढळून आल्या आहेत. त्या त्रुटींची पूर्तता करता करता पुन्हा शेतकºयांच्या नाकी नऊ येत आहेत.

शेख इलियास ।लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : संपूर्ण कर्जमाफीसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत तालुक्यातील ३६ हजार ३११ शेतकºयांनी महा ई सेवा केंद्रामार्फत आॅनलाईन अर्ज भरले होते. त्यापैकी ६७५८ शेतकºयांच्या कर्जमाफीच्या अर्जात त्रुटी आढळून आल्या आहेत. त्या त्रुटींची पूर्तता करता करता पुन्हा शेतकºयांच्या नाकी नऊ येत आहेत.बँकेने त्रुटींची यादी बँकेत लावली आहे. आॅनलाईन अर्जात नावात दुरूस्ती, खाते क्रमांक आधार क्रमांक नाव बदल, कर्ज नसणारे शेतकरी, मयत आदी त्रुटी आढळून आल्या आहेत. तालुकास्तरीय कर्जमाफी समिती शासनाने दिलेल्या निकषानुसार शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र की अपात्र याची छाननी करीत आहे. येथील सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेच्या कार्यालयात कर्जमाफीच्या अर्जाची आॅनलाईन छाननी सहाय्यक निबंधक एस.एल. बोलके, अनिल सुरदाम, राजेश बांडे, प्रल्हाद दाहिरे, डिगांबर शिंदे हे करीत आहेत. ३० जून २०१६ पर्यंत थकबाकीदार असलेल्या शेतकºयांनी व ज्या शेतकºयांनी ३१ जुलै २०१७ पर्यंत थकबाकी भरली नाही. अशा शेतकºयांना १ एप्रिल २००९ ते ३१ मार्च २०१६ पर्यंत कर्ज वाटप झालेल्या शेतकºयांना दीड लाखापर्यंत कर्जमाफीचा लाभ होणार आहे. प्रोत्साहनपर कर्जमाफी योजनेचा लाभ १ एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०१६ पर्यंत कर्ज घेतलेले असावे व १ एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०१७ पर्यंत सलग दोन वर्ष कर्ज घेतलेले असावे व त्या कर्जाची परतफेड केलेली असावी तरच या योजनेचा लाभ शेतकºयांना कर्ज माफीसाठी होणार आहे. या कालावधीत कर्ज घेतलेल्या शेतकºयांना कर्जाच्या २५ टक्के अथवा १५ ते २५ हजारांपर्यंत कर्जमाफी मिळणार आहे. पुनर्गठण कर्जमाफीसाठी ३१ जुलै २०१७ पर्यंत कर्ज थकीत असावे, ३१ जुन २०१६ पर्यंत अथवा त्यानंतर पुनर्गठण केलेले असावे तरच दीड लाखापर्यंत कर्ज माफ होणार आहे.निकषानुसार फक्त १० टक्केच शेतकºयांना कर्जमाफ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्रुटीतील आॅनलाईन अर्जापैकी फक्त ५ ते १० टक्केच शेतकºयांना कर्जमाफीची शक्यता आहे. कर्जमाफी व्हावी, यासाठी शेतकºयांनी जीवाचा आटापिटा करून आॅनलाईन अर्ज भरले होते. काही प्रमाणात शेतकरी शांत झाले होते. मात्र बँकेत लावलेल्या त्रुट्याच्या यादीने पुन्हा शेतकºयांमध्ये गोंधळ उडाला असून, ग्रामीण भागातील शेतकरी बँकेत धाव घेऊन त्रुटीची यादी दोन दोन वेळेस पाहत आहेत. त्यामुळे पुन्हा शेतकºयांची गर्दी होत आहे.