शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
2
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
3
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
4
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
5
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
6
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
7
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
8
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
9
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
10
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
11
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
12
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!
13
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
14
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
15
स्वामी विवेकानंदांनी सांगितलेली 'ही' तीन ध्येय साध्य केली तर आपला पराभव होऊच शकणार नाही!
16
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
17
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
18
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
19
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले

६७५८ शेतक-यांच्या कर्जमाफी अर्जात त्रुट्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 00:22 IST

संपूर्ण कर्जमाफीसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत तालुक्यातील ३६ हजार ३११ शेतकºयांनी महा ई सेवा केंद्रामार्फत आॅनलाईन अर्ज भरले होते. त्यापैकी ६७५८ शेतकºयांच्या कर्जमाफीच्या अर्जात त्रुटी आढळून आल्या आहेत. त्या त्रुटींची पूर्तता करता करता पुन्हा शेतकºयांच्या नाकी नऊ येत आहेत.

शेख इलियास ।लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : संपूर्ण कर्जमाफीसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत तालुक्यातील ३६ हजार ३११ शेतकºयांनी महा ई सेवा केंद्रामार्फत आॅनलाईन अर्ज भरले होते. त्यापैकी ६७५८ शेतकºयांच्या कर्जमाफीच्या अर्जात त्रुटी आढळून आल्या आहेत. त्या त्रुटींची पूर्तता करता करता पुन्हा शेतकºयांच्या नाकी नऊ येत आहेत.बँकेने त्रुटींची यादी बँकेत लावली आहे. आॅनलाईन अर्जात नावात दुरूस्ती, खाते क्रमांक आधार क्रमांक नाव बदल, कर्ज नसणारे शेतकरी, मयत आदी त्रुटी आढळून आल्या आहेत. तालुकास्तरीय कर्जमाफी समिती शासनाने दिलेल्या निकषानुसार शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र की अपात्र याची छाननी करीत आहे. येथील सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेच्या कार्यालयात कर्जमाफीच्या अर्जाची आॅनलाईन छाननी सहाय्यक निबंधक एस.एल. बोलके, अनिल सुरदाम, राजेश बांडे, प्रल्हाद दाहिरे, डिगांबर शिंदे हे करीत आहेत. ३० जून २०१६ पर्यंत थकबाकीदार असलेल्या शेतकºयांनी व ज्या शेतकºयांनी ३१ जुलै २०१७ पर्यंत थकबाकी भरली नाही. अशा शेतकºयांना १ एप्रिल २००९ ते ३१ मार्च २०१६ पर्यंत कर्ज वाटप झालेल्या शेतकºयांना दीड लाखापर्यंत कर्जमाफीचा लाभ होणार आहे. प्रोत्साहनपर कर्जमाफी योजनेचा लाभ १ एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०१६ पर्यंत कर्ज घेतलेले असावे व १ एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०१७ पर्यंत सलग दोन वर्ष कर्ज घेतलेले असावे व त्या कर्जाची परतफेड केलेली असावी तरच या योजनेचा लाभ शेतकºयांना कर्ज माफीसाठी होणार आहे. या कालावधीत कर्ज घेतलेल्या शेतकºयांना कर्जाच्या २५ टक्के अथवा १५ ते २५ हजारांपर्यंत कर्जमाफी मिळणार आहे. पुनर्गठण कर्जमाफीसाठी ३१ जुलै २०१७ पर्यंत कर्ज थकीत असावे, ३१ जुन २०१६ पर्यंत अथवा त्यानंतर पुनर्गठण केलेले असावे तरच दीड लाखापर्यंत कर्ज माफ होणार आहे.निकषानुसार फक्त १० टक्केच शेतकºयांना कर्जमाफ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्रुटीतील आॅनलाईन अर्जापैकी फक्त ५ ते १० टक्केच शेतकºयांना कर्जमाफीची शक्यता आहे. कर्जमाफी व्हावी, यासाठी शेतकºयांनी जीवाचा आटापिटा करून आॅनलाईन अर्ज भरले होते. काही प्रमाणात शेतकरी शांत झाले होते. मात्र बँकेत लावलेल्या त्रुट्याच्या यादीने पुन्हा शेतकºयांमध्ये गोंधळ उडाला असून, ग्रामीण भागातील शेतकरी बँकेत धाव घेऊन त्रुटीची यादी दोन दोन वेळेस पाहत आहेत. त्यामुळे पुन्हा शेतकºयांची गर्दी होत आहे.