शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
2
लग्न होत नसेल, नोकरी मिळत नसेल तर 'राम' नामाचा जप करा; भाजपा खासदारानं संसदेत सांगितला उपाय
3
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
4
प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू अन् दुबई एअरलाइन्सच्या माजी मालकाची पत्नी स्टेशवर सापडली; भीषण अवस्था, व्हिडीओ व्हायरल, नेमकं सत्य काय?
5
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
6
Rakhi Sawant : Video - "माफी मागा, मी तुमचं धोतर खेचलं तर...", नितीश कुमारांवर भडकली राखी सावंत
7
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! सेबीने एक्सपेन्स रेशोचे नियम बदलले, कमाईवर थेट परिणाम
8
खळबळजनक! घर मालकिणीने भाडं मागितलं, कपलने तिलाच संपवलं; मृतदेहाचे तुकडे केले अन्...
9
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
10
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
11
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
12
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
13
५ राजयोगात मार्गशीर्ष अमावास्या २०२५: ९ राशींवर लक्ष्मी कुबेर कृपा, कल्पनेपलीकडे यश-पैसा-लाभ!
14
Creta ला टक्कर देण्यासाठी येतेय Mahindra ची नवी 'मिड-साईज' SUV; असे असेल डिझाईन अन् खासियत
15
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: वर्षातली शेवटची आणि प्रभावशाली रात्र; आठवणीने करा 'हे' ५ उपाय!
16
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
17
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
18
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
19
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
20
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
Daily Top 2Weekly Top 5

६७५८ शेतक-यांच्या कर्जमाफी अर्जात त्रुट्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 00:22 IST

संपूर्ण कर्जमाफीसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत तालुक्यातील ३६ हजार ३११ शेतकºयांनी महा ई सेवा केंद्रामार्फत आॅनलाईन अर्ज भरले होते. त्यापैकी ६७५८ शेतकºयांच्या कर्जमाफीच्या अर्जात त्रुटी आढळून आल्या आहेत. त्या त्रुटींची पूर्तता करता करता पुन्हा शेतकºयांच्या नाकी नऊ येत आहेत.

शेख इलियास ।लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : संपूर्ण कर्जमाफीसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत तालुक्यातील ३६ हजार ३११ शेतकºयांनी महा ई सेवा केंद्रामार्फत आॅनलाईन अर्ज भरले होते. त्यापैकी ६७५८ शेतकºयांच्या कर्जमाफीच्या अर्जात त्रुटी आढळून आल्या आहेत. त्या त्रुटींची पूर्तता करता करता पुन्हा शेतकºयांच्या नाकी नऊ येत आहेत.बँकेने त्रुटींची यादी बँकेत लावली आहे. आॅनलाईन अर्जात नावात दुरूस्ती, खाते क्रमांक आधार क्रमांक नाव बदल, कर्ज नसणारे शेतकरी, मयत आदी त्रुटी आढळून आल्या आहेत. तालुकास्तरीय कर्जमाफी समिती शासनाने दिलेल्या निकषानुसार शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र की अपात्र याची छाननी करीत आहे. येथील सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेच्या कार्यालयात कर्जमाफीच्या अर्जाची आॅनलाईन छाननी सहाय्यक निबंधक एस.एल. बोलके, अनिल सुरदाम, राजेश बांडे, प्रल्हाद दाहिरे, डिगांबर शिंदे हे करीत आहेत. ३० जून २०१६ पर्यंत थकबाकीदार असलेल्या शेतकºयांनी व ज्या शेतकºयांनी ३१ जुलै २०१७ पर्यंत थकबाकी भरली नाही. अशा शेतकºयांना १ एप्रिल २००९ ते ३१ मार्च २०१६ पर्यंत कर्ज वाटप झालेल्या शेतकºयांना दीड लाखापर्यंत कर्जमाफीचा लाभ होणार आहे. प्रोत्साहनपर कर्जमाफी योजनेचा लाभ १ एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०१६ पर्यंत कर्ज घेतलेले असावे व १ एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०१७ पर्यंत सलग दोन वर्ष कर्ज घेतलेले असावे व त्या कर्जाची परतफेड केलेली असावी तरच या योजनेचा लाभ शेतकºयांना कर्ज माफीसाठी होणार आहे. या कालावधीत कर्ज घेतलेल्या शेतकºयांना कर्जाच्या २५ टक्के अथवा १५ ते २५ हजारांपर्यंत कर्जमाफी मिळणार आहे. पुनर्गठण कर्जमाफीसाठी ३१ जुलै २०१७ पर्यंत कर्ज थकीत असावे, ३१ जुन २०१६ पर्यंत अथवा त्यानंतर पुनर्गठण केलेले असावे तरच दीड लाखापर्यंत कर्ज माफ होणार आहे.निकषानुसार फक्त १० टक्केच शेतकºयांना कर्जमाफ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्रुटीतील आॅनलाईन अर्जापैकी फक्त ५ ते १० टक्केच शेतकºयांना कर्जमाफीची शक्यता आहे. कर्जमाफी व्हावी, यासाठी शेतकºयांनी जीवाचा आटापिटा करून आॅनलाईन अर्ज भरले होते. काही प्रमाणात शेतकरी शांत झाले होते. मात्र बँकेत लावलेल्या त्रुट्याच्या यादीने पुन्हा शेतकºयांमध्ये गोंधळ उडाला असून, ग्रामीण भागातील शेतकरी बँकेत धाव घेऊन त्रुटीची यादी दोन दोन वेळेस पाहत आहेत. त्यामुळे पुन्हा शेतकºयांची गर्दी होत आहे.