शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

भूजल सर्वेक्षण यंत्रणेच्या वर्धापन दिनी कयाधूवर जनजागरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 01:04 IST

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा वर्धापनदिनानिमत्त १६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता कळमनुरी तालुक्यातील सोडेगाव येथे कयाधू नदी पुन:रूजीवन चळवळ व ग्रामस्तरीय भूजल संवाद या विषयावर कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात पार पडला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा वर्धापनदिनानिमत्त १६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता कळमनुरी तालुक्यातील सोडेगाव येथे कयाधू नदी पुन:रूजीवन चळवळ व ग्रामस्तरीय भूजल संवाद या विषयावर कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात पार पडला.कार्यक्रमाचे उदघाटन मुख्यकार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वरिष्ठ भूवैज्ञानिक सी. डी. चव्हाण, सरपंच सुवर्णमाला गव्हाणे, कनिष्ठ भूवैज्ञानिक पी. पी. घडेकर, डॉ. नाकाडे, उगमचे जयाजी पाईकराव, डॉ. किशन लखमावार, प्रा. भगवान गुठ्ठे, डॉ. के. बी. देशपांडे, जलनायक जि. प. सदस्य डॉ. सतिश पाचपुते, डॉ. अवधूत शिंदे, डॉ. पुंजाजी गाडे, प्रा. सुरेश धूत आदी उपस्थित होते. कयाधू नदी पुन:रूजीवन चळवळीत जास्तीत जास्त ग्रामस्थांनी सहभागी होण्याच्या व ग्रामस्तरीय भूजल संवादतून जनजागृतीसाठी हा कार्यक्रम सोडेगाव येथे ठेवण्यात आला होता. कयाधू पुन:रूजीवितसाठी काढण्यात आलेल्या जलदिंडीचा याच गावात समारोप झाला. यात सोडेगाव येथील ग्रामस्थांचा मोठा सहभाग होता. नदी पुनरूजीवितसाठी अधिक जनजागृती होऊन लोकचळवळ उभी राहावी या दृष्टिकोणातून हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड यांनी मार्गदर्शन केले. भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडे अपूरे मनुष्यबळ असूनही, कामे मात्र यंत्रनेने पूर्ण केली आहेत, असे ते म्हणाले. पाणी टंचाईबाबतही यंत्रणा नेहमी सक्रीय असून कयाधू पुन:रूजिवीतसाठी यंत्रणेचे मार्गदर्शनासाठी मोठा हातभार असल्याचे तुम्मोड यांनी यावेळी सांगितले.भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणाकार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी वरिष्ठ भूवैज्ञानिक सी.डी.चव्हाण यांनी केले. यावेळी त्यांनी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचा १९७१ ते आजपर्यंतचा इतिहास यावर प्रकाश टाकला. ते म्हणाले हे कार्यालय शासनाच्या कृषि विभागातून भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा विभागाची स्थापना व सुरूवातीला शेतकऱ्यांच्या सिंचन विहिरींचे खोलीकरण करणे, भूजलाचे विस्तृत सर्वेक्षण आणि विकास करणे. तसेच पिण्याच्या पाण्याची टंचाई हाताळणे, विंधन विहिर कार्यक्रम, स्त्रौत बळकटीकरणासाठी पारंपारी, अपारंपारिक उपाय-योजना राबविणे आदी कामांची माहिती यावेळी चव्हाण यांनी दिली. कार्यक्रमात जलनायकांचा सत्कार करण्यात आला. यशस्वीतेसाठी ध. ना. कांकरीया, भिमराव शेळके, पी. पी. घडेकर, सिद्धार्थ रणवीर तसेच सोडेगाव शाळेतील केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व शिक्षकांनी परिश्रम घेतले. जलनायकांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

टॅग्स :Hingoliहिंगोलीriverनदी