शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

२१ फेब्रुवारीनंतर ‘जलेश्वर’वरील अतिक्रमणे हटणार; विस्थापितांचा जागेचा शोध सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 17:53 IST

अतिक्रमणावर थेट कारवाई होणार 

ठळक मुद्देभूमिअभिलेख कार्यालयाने केले रेखांकन विस्थापितांचा जागेचा शोध सुरू

हिंगोली : शहरातील जलेश्वर तलावाकाठावरील अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईला अधिक गती आली असून महसूल प्रशासनाने थेट कारवाईच्या सूचना संबंधित यंत्रणेस दिल्या आहेत. त्यामुळे २१ फेब्रुवारीनंतर येथील अतिक्रमण कोणतीही पूर्वसूचना न देता हटविण्यात येणार आहे. 

जलेश्वर तलावाकाठावरील १९५ अतिक्रमणधारकांना महसूल प्रशासनाच्या वतीने अतिक्रमण स्वत:हून काढून घेण्यासंदर्भात वेळोवेळी नोटिसीद्वारे कळविले होते; परंतु संबंधित अतिक्रमणधारकांनी अतिक्रमण काढून घेतले नाही. त्यामुळे हिंगोली शहरातील जलेश्वर तलावासमोरील सर्व्हे नं. ०३ मधील अतिक्रमण भागाचे १५ फेब्रुवारी रोजी तालुका निरीक्षक भूमिअभिलेख यांच्यामार्फत रेखांकित करण्यात आले. तसेच अतिक्रमणधारकांना पुन्हा रीतसर नोटिसांद्वारे अतिक्रमण काढून घेण्याबाबत सूचनाही दिल्या. त्यामुळे आता २१ फेब्रुवारीनंतर सदरील अतिक्रमण केव्हाही व कोणतीही पूर्वसूचना न देता महसूल प्रशासनाच्या वतीने काढून टाकण्यात येणार आहे. त्यानंतर अतिक्रमणासाठी प्रशासनाने केलेला सर्व खर्च अतिक्रमणधारकांकडून वसूल केला जाणार आहे. त्यामुळे यापूर्वीच अतिक्रमण स्वत:हून काढून घ्यावेत व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

दरम्यान, या ठिकाणच्या अतिक्रमणधारकांना मागील वर्षभरापासून प्रशासन वारंवार सूचना देत आहे. यासाठी अतिक्रमणाधारकही निवेदने देताना आढळत होते. मात्र अतिक्रमणे काही हटली नाहीत. त्यामुळे इतरांनीही तलावात गाळ टाकून अतिक्रमण करण्याचा सपाटा चालविला होता. आता या सर्व बाबींना चाप बसणार आहे. नुकत्याच झालेल्या एका अतिक्रमणानंतर या कारवाईला वेग आला होता. या अतिक्रमणात या तलावाचे आऊटलेटही बुजले आहे. त्यामुळे या तलावाचे हाल जास्त प्रमाणात झाले. तलावातून दुर्गंधीयुक्त पाणी बाहेर पडलेच नाही. शिवाय शहरातही पाणी येण्याचे मार्ग अनेक ठिकाणी बंद झाले आहेत.

मंदिर संस्थान धर्मदाय आयुक्तांची परवानगी आवश्यकश्री जलेश्वर संस्थनच्या सर्व विश्वस्त समिती सदस्यांनी दोन एकर जमिन अधिग्रहण करण्यास सहमती दर्शवली आहे. परंतु सदर बाबीकरीता संस्थानला महाराष्ट्र पब्लीक ट्रस्ट अधिनियमचे कलम ३६ अन्वये धर्मदाय आयुक्तांची परवानगी घेणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. मुख्याधिकाऱ्यांकडून भुसंपादन कायद्यान्वये मोबदलाची रक्कम कळविणे बाबत माहिती मागविली आहे. जेणेकरून हस्तांतरणासाठीचा अवरोध दूर करण्यासाठी मदत होईल. श्री जलेश्वर संस्थान हिगोली नोंदणी क्र. ए- ६०६ या संस्थानची मालकी व ताब्यामध्ये मौजे मल्हारवाडी येथील जमिन गट क्र. २१ व २२ ही जमिन आहे. शासकीय व निमशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या स्तरावर जलेश्वर तलाव शुशोभिकरण व तेथील अतिक्रमण काढून अतिक्रमणधारकांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. न. प. मुख्याधिकारी यांनी जलेश्वर संस्थान यांना पत्राद्वारे श्री जलेश्वर संस्थानची उपरोक्त मल्हारवाडी येथील एकूण जमिनीपैकी २.५ एकर जमीन पूनर्वसन कामासाठी मागणी केली. संस्थानचे विश्वस्तांनी वरिल बाबीवर चर्चा करून मुख्याधिकाऱ्यांना जवाबपत्र दिले आहे.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणHingoliहिंगोली