शहरं
Join us  
Trending Stories
1
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
2
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
3
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
4
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
5
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
6
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
7
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
8
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
9
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
10
युद्धविराममध्ये कधीही व्यापाराचा उल्लेख नव्हता; भारताने ट्रम्प यांच्या टॅरिफ दाव्यांना पुन्हा एकदा नाकारले
11
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
12
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
13
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
14
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
15
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश
16
Covid-19 च्या डेल्टा व्हेरिएंटमुळे सायलेंट हॉर्ट अटॅक वाढले, आयआयटी इंदूरच्या अहवालात खुलासा
17
Ola Electric Q4 results: 'ओला'चे डोळे ओले! तोटा वाढून ₹८६० कोटींवर, महसुलातही ५९% ची घसरण
18
पाकिस्तानात गेलेल्या महिलेने हेरगिरी केल्याचा संशय, नागपुरात गुन्हा दाखल
19
राज्यसभेच्या ८ जागांसाठी १९ जूनला मतदान; मतांचे गणित जुळवणं सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान

दुष्काळाने उसापेक्षा वाढ्यालाच जास्त गोडी; चाराटंचाईमुळे पेंढीचे भाव वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 14:26 IST

शेतातील जलसाठे कोरडे पडल्यामुळे कुणाच्याच शेतात हिरवळ दिसत नाही.

वसमत (जि. हिंगोली) : दुष्काळामुळे तालुक्यातील भूजल पातळी प्रचंड खालावली असून जलसाठे कोरडे पडल्याने सिंचन क्षेत्र घटले. त्यामुळे जनावरांच्या पाण्यासह चाराटंचाई निर्माण झाली आहे. चाऱ्यासाठी केवळ उसाच्या वाढ्यांचाच पर्याय शिल्लक असल्यामुळे वाढ्याच्या पेंढीचे भाव गगनाला भिडले आहेत. दहा रुपयांना पाच वाढ्यांची पेंढी येत आहे.

वसमत व औंढा तालुक्यात दुष्काळाची दाहकता वाढल्याने अनेक गावांमध्ये पाणीटंचाई जाणवत आहे . त्यातच शेतातील जलसाठे कोरडे पडल्यामुळे कुणाच्याच शेतात हिरवळ दिसत नाही. हायब्रीड ज्वारीचा पेरा घटल्यामुळे चाऱ्याची समस्या गंभीर बनली आहे. गतवर्षी कमीअधिक पाण्यामुळे सर्व शेतकरी आपल्या शेतात चारा पेरत असत. यंदा प्यायलाच पाणी नसल्याने शेतीसाठी पाण्याचा विचारही डोक्यात घेणे चुकीचे ठरत आहे. त्यामुळे यंदा चाऱ्याची समस्या अतिशय तीव्र बनली असून जवळपास दिवाळीपासूनच चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.  ऊस तोडणीचा हंगाम असल्यामुळे ऊसतोड कामगार शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस तोडून वाढे सहजपणे घेऊन बाजारात विकत आहेत. तेच वाढे पंधरा रुपये पेंढी या दराने खरेदी करण्याची वेळ पशुपालकांवर आल्याने उसापेक्षाही वाढ्यांची गोडी वाढली आहे.

वसमत शहरातून विक्री होणारे वाढे पूर्णा सहकारी साखर कारखाना, बाराशिव हनुमान सहकारी साखर कारखाना आणि भाऊराव सहकारी साखर कारखाना या तिन्ही कारखाने अंतर्गत होणाऱ्या ऊस तोडीतून येत आहेत. दररोज आठशे ते नऊशे वाढ्यांच्या पेढ्यांचे चार ते पाच टेम्पो दाखल होत आहेत. याशिवाय बैलगाडीत जवळपास दररोज ७00 ते ८00 पेंढ्या वाढे विक्रीसाठी येतात.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीMarketबाजार