शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारताकडे निघालेला रशियन तेलाचा टँकर समुद्रातून अचानक माघारी वळला; रिफायनरींची चिंता वाढली...
2
आजोबांच्या संपत्तीवर नातवंडांचा जन्मसिद्ध हक्क नाही; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय, प्रकरण काय?
3
Mutual Funds मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचा होणार फायदा; सेबीचा नवा प्रस्ताव, गुंतवणूकदारांना काय मिळणार?
4
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
5
पाकिस्तान करणार हमासचा खात्मा? अमेरिकेची 'चलाख' खेळी; असीम मुनीर २० हजार सैन्य उतरवणार
6
इथं १ ग्रॅम घेताना घाम फुटतोय! मग ७ महिन्यात ६४००० किलो सोनं भारतात कोणी आणलं?
7
फक्त १० वर्षांच्या फरकाने तुमच्या SIP रिटर्न्समध्ये ४७ लाखांचा मोठा फरक; तोटा होण्याआधी गणित पाहा
8
Viral News: रस्त्यावरून खरेदी केले जुने बूट; ब्रँडचं नाव पाहिलं आणि किंमत तपासली; महिला झाली शॉक!
9
Guru Upasna: गुरु उच्च राशीत असेल तर उपासना कोणती करावी किंवा कशी वाढवावी? वाचा 
10
Shreyas Iyer : श्रेयस लवकर बरा व्हावा! सूर्याच्या आईची देवासमोर प्रार्थना; व्हिडिओ व्हायरल
11
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
12
भारत-अमेरिका टॅरिफ वॉर थांबणार, US सोबत खास डील होणार? ट्रम्प यांचे मोठे संकेत
13
सरकार पुन्हा विकणार LIC चे शेअर्स! केव्हा आणि कसं? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
14
Indian Currency Facts : भारतीय चलनी नोटांच्या मध्यभागी खरंच चांदीची तार असते का? जाणून घ्या...
15
PPF Vs NPS Investment: पैशांची गुंतवणूक करायची आहे, एनपीएस निवडू की पीपीएफ? नक्की काय करावं
16
शाब्बास पोरा! ना कॉलेज, ना कोचिंग... UPSC सह क्रॅक केल्या १२ सरकारी नोकऱ्या, झाला IPS
17
"बंगल्यात झालेल्या चोरीतून सीडी, पेनड्राईव्ह, कागदपत्रे लांबवली", एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
18
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 
19
अदानी ग्रुपचे शेअर्स पुन्हा रॉकेट! 'या' स्टॉकमध्ये १३% ची छप्परफाड वाढ; नेमकं काय घडलं?
20
बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस

दुष्काळाने उसापेक्षा वाढ्यालाच जास्त गोडी; चाराटंचाईमुळे पेंढीचे भाव वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 14:26 IST

शेतातील जलसाठे कोरडे पडल्यामुळे कुणाच्याच शेतात हिरवळ दिसत नाही.

वसमत (जि. हिंगोली) : दुष्काळामुळे तालुक्यातील भूजल पातळी प्रचंड खालावली असून जलसाठे कोरडे पडल्याने सिंचन क्षेत्र घटले. त्यामुळे जनावरांच्या पाण्यासह चाराटंचाई निर्माण झाली आहे. चाऱ्यासाठी केवळ उसाच्या वाढ्यांचाच पर्याय शिल्लक असल्यामुळे वाढ्याच्या पेंढीचे भाव गगनाला भिडले आहेत. दहा रुपयांना पाच वाढ्यांची पेंढी येत आहे.

वसमत व औंढा तालुक्यात दुष्काळाची दाहकता वाढल्याने अनेक गावांमध्ये पाणीटंचाई जाणवत आहे . त्यातच शेतातील जलसाठे कोरडे पडल्यामुळे कुणाच्याच शेतात हिरवळ दिसत नाही. हायब्रीड ज्वारीचा पेरा घटल्यामुळे चाऱ्याची समस्या गंभीर बनली आहे. गतवर्षी कमीअधिक पाण्यामुळे सर्व शेतकरी आपल्या शेतात चारा पेरत असत. यंदा प्यायलाच पाणी नसल्याने शेतीसाठी पाण्याचा विचारही डोक्यात घेणे चुकीचे ठरत आहे. त्यामुळे यंदा चाऱ्याची समस्या अतिशय तीव्र बनली असून जवळपास दिवाळीपासूनच चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.  ऊस तोडणीचा हंगाम असल्यामुळे ऊसतोड कामगार शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस तोडून वाढे सहजपणे घेऊन बाजारात विकत आहेत. तेच वाढे पंधरा रुपये पेंढी या दराने खरेदी करण्याची वेळ पशुपालकांवर आल्याने उसापेक्षाही वाढ्यांची गोडी वाढली आहे.

वसमत शहरातून विक्री होणारे वाढे पूर्णा सहकारी साखर कारखाना, बाराशिव हनुमान सहकारी साखर कारखाना आणि भाऊराव सहकारी साखर कारखाना या तिन्ही कारखाने अंतर्गत होणाऱ्या ऊस तोडीतून येत आहेत. दररोज आठशे ते नऊशे वाढ्यांच्या पेढ्यांचे चार ते पाच टेम्पो दाखल होत आहेत. याशिवाय बैलगाडीत जवळपास दररोज ७00 ते ८00 पेंढ्या वाढे विक्रीसाठी येतात.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीMarketबाजार