शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

दुष्काळाने उसापेक्षा वाढ्यालाच जास्त गोडी; चाराटंचाईमुळे पेंढीचे भाव वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 14:26 IST

शेतातील जलसाठे कोरडे पडल्यामुळे कुणाच्याच शेतात हिरवळ दिसत नाही.

वसमत (जि. हिंगोली) : दुष्काळामुळे तालुक्यातील भूजल पातळी प्रचंड खालावली असून जलसाठे कोरडे पडल्याने सिंचन क्षेत्र घटले. त्यामुळे जनावरांच्या पाण्यासह चाराटंचाई निर्माण झाली आहे. चाऱ्यासाठी केवळ उसाच्या वाढ्यांचाच पर्याय शिल्लक असल्यामुळे वाढ्याच्या पेंढीचे भाव गगनाला भिडले आहेत. दहा रुपयांना पाच वाढ्यांची पेंढी येत आहे.

वसमत व औंढा तालुक्यात दुष्काळाची दाहकता वाढल्याने अनेक गावांमध्ये पाणीटंचाई जाणवत आहे . त्यातच शेतातील जलसाठे कोरडे पडल्यामुळे कुणाच्याच शेतात हिरवळ दिसत नाही. हायब्रीड ज्वारीचा पेरा घटल्यामुळे चाऱ्याची समस्या गंभीर बनली आहे. गतवर्षी कमीअधिक पाण्यामुळे सर्व शेतकरी आपल्या शेतात चारा पेरत असत. यंदा प्यायलाच पाणी नसल्याने शेतीसाठी पाण्याचा विचारही डोक्यात घेणे चुकीचे ठरत आहे. त्यामुळे यंदा चाऱ्याची समस्या अतिशय तीव्र बनली असून जवळपास दिवाळीपासूनच चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.  ऊस तोडणीचा हंगाम असल्यामुळे ऊसतोड कामगार शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस तोडून वाढे सहजपणे घेऊन बाजारात विकत आहेत. तेच वाढे पंधरा रुपये पेंढी या दराने खरेदी करण्याची वेळ पशुपालकांवर आल्याने उसापेक्षाही वाढ्यांची गोडी वाढली आहे.

वसमत शहरातून विक्री होणारे वाढे पूर्णा सहकारी साखर कारखाना, बाराशिव हनुमान सहकारी साखर कारखाना आणि भाऊराव सहकारी साखर कारखाना या तिन्ही कारखाने अंतर्गत होणाऱ्या ऊस तोडीतून येत आहेत. दररोज आठशे ते नऊशे वाढ्यांच्या पेढ्यांचे चार ते पाच टेम्पो दाखल होत आहेत. याशिवाय बैलगाडीत जवळपास दररोज ७00 ते ८00 पेंढ्या वाढे विक्रीसाठी येतात.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीMarketबाजार