शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

आयोगासमोर निवेदनकर्त्यांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 00:32 IST

मराठा आरक्षणाबाबत राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांना निवेदने देण्यासाठी विविध पक्ष, संघटनांसह मराठा समाजातील नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. आयोगाला हजारो निवेदने, विविध संस्थांचे ठराव सादर करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मराठा आरक्षणाबाबत राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांना निवेदने देण्यासाठी विविध पक्ष, संघटनांसह मराठा समाजातील नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. आयोगाला हजारो निवेदने, विविध संस्थांचे ठराव सादर करण्यात आले.मराठा आरक्षणासंदर्भातील जनसुनावणीसाठी आज हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहात राज्य मागास आयोगाचे सदस्य आले होते. त्यामुळे जिल्ह्यातील विविध भागातून आलेल्या नागरिकांनी निवेदने देण्यासाठी एकच गर्दी केली होती. यात मराठा समाजाला आरक्षणाची का गरज आहे, याबाबतच्या निवेदनांचा समावेश होता. तर काहींनी विदर्भातील मराठा कुणबींशी असलेल्या रोटी-बेटीच्या व्यवहाराचा दाखला दिला. या आयोगासमोर निवेदने देण्यासाठी काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी या प्रमुख पक्षांसह इतरही अनेक पक्षांची मंडळी आल्याचे दिसून येत होते. मराठा समाजातील विविध संघटनासह इतरही अनेक संघटनांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शविण्यासाठी निवेदने सादर केली. या ठिकाणी ग्रामीण भागातून अनेक ग्रामपंचायतींनीही ठराव आणले होते. त्याचबरोबर विविध सामाजिक संस्था, संघटना, सेवाभावी संघटनांनीही निवेदने दिली.मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी अनेकांनी संघटनांसह वैयक्तिक पातळीवरही निवेदने दिली. त्यामुळे हजारो निवेदने आल्याचे दिसून येत होते. यात जि.प.सदस्य, नगरसेवक, रिपाइं आठवले गट, भीमशक्ती, मराठा शिवसैनिक सेना, रासप यांच्या वतीनेही शिष्टमंडळाद्वारे निवेदने दिली जातअसल्याचे दिसून आले. तर संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, मराठा महासंघ, युवा प्रतिष्ठान आदींनी निवेदने तर दिलीच; शिवाय पदाधिकारी, कार्यकर्तेही निवेदकर्त्यांना नोंदणीसाठी मार्गदर्शन करताना दिसत होते. दिवसभर ही मंडळी कार्यरत होती.आयोगाचे सदस्य डॉ.सर्जेराव निमसे, डॉ.राजाभाऊ करपे यांच्यासमक्ष अनेक महिलांनीही आपली मते मांडून निवेदने सादर केली. अनेक ग्रामपंचायतींतर्फेही ठराव आले होते.