शहरं
Join us  
Trending Stories
1
थर्टी फर्स्टचा जल्लोष पहाटेपर्यंत! हॉटेल आणि बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
2
Solapur Municipal Corporation Election 2025 : सोलापूरात मोठी राजकीय खेळी! ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाने ऐनवेळेला भाजपाकडून भरला फॉर्म
3
Stock Market Holiday 2026 List: NSE-BSE नं जारी केली २०२६ ची सुट्ट्यांची यादी; पाहा किती आहेत लाँग वीकेंड्स?
4
Panvel Municipal Election 2026: पनवेलमध्ये 'मविआ'ला झटका! भाजपाचे नितीन पाटील बिनविरोध, मतदानाआधीच तीन ठिकाणी फुललं 'कमळ'
5
संतापजनक! चालत्या कारमध्ये दोन तास लैंगिक अत्याचार, तरुणीला मारहाण; मध्यरात्री रस्त्यावर फेकून दिले
6
“काँग्रेसमुक्त भारतची वल्गना करणारा भाजपा ‘कार्यकर्ता मुक्त भाजपा’ झाला”: हर्षवर्धन सपकाळ
7
लालू यादवांचा मुलगा तेज प्रताप यादव यांची तब्येत अचानक बिघडली, रुग्णालयात दाखल, काय झालं?
8
इंदूरमध्ये दूषित पाण्याचा कहर, विषारी पाण्यामुळे आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू, हजारो जण बाधित
9
DSP संतोष पटेल यांनी 26 वर्षांनंतर फेडले ‘रक्ताचे ऋण’; संतु मास्टरच्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली
10
आईशी भांडली, रागाने घराबाहेर पडली, नराधमाच्या तावडीत सापडली; तरुणीसोबत घडलं भयंकर
11
ऐन मनपा निवडणुकीत मनसेला मोठा धक्का! माजी नगरसेवकांचा पक्षाला रामराम, शिंदे गटात प्रवेश
12
भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था कधी बनणार; पाकिस्तानचा समावेश टॉप १० मध्ये आहे का?
13
आता कितीही धुके असू दे, वेगवान वंदे भारत ट्रेन थांबणार नाही; भारतीय रेल्वेने उचलले मोठे पाऊल!
14
कोण होती तातियाना श्लॉसबर्ग? अमेरिकन माजी राष्ट्राध्यक्षांच्या नातीचा ३५व्या वर्षी मृत्यू
15
वाजत-गाजत आघाडी केली, आता काँग्रेसला डोक्यावर हात मारायची वेळ आली; ‘वंचित’मुळे मोठा धक्का!
16
"अहंकार दुखावल्याने त्याने मलाच सिनेमातून काढून टाकलं...", बॉलिवूड दिग्दर्शकाकडून अक्षय खन्नाची पोलखोल
17
शिंदेसेनेत उफाळली नाराजी; ५०० हून अधिक होते इच्छुक
18
Video: मराठी तरुणाला २ तास डांबल्याचा आरोप, भाईंदर रेल्वेस्टेशनवरील प्रकार, नेमकं काय घडलं?
19
मुंबईत मतदानापूर्वीच दोन प्रभागातून महायुती बाद, प्रभाग क्र. २११ आणि २१२ मध्ये काय घडलं?
20
'मुस्लीम मुंबई' करण्याचं षडयंत्र हिंदू हाणून पाडेल; किरीट सोमय्यांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 00:59 IST

जिल्ह्यात संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून मागील दहा ते बारा दिवसांपासून रोजच पडणाऱ्या पावसामुळे शेतात तण वाढत चालले आहे. शिवाय इतरही कामे होत नसल्याचे चित्र आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून मागील दहा ते बारा दिवसांपासून रोजच पडणाऱ्या पावसामुळे शेतात तण वाढत चालले आहे. शिवाय इतरही कामे होत नसल्याचे चित्र आहे.मागील काही दिवसांपासून रोजच होणाºया पावसामुळे शेतीची कामे एकीकडे ठप्प असताना व्यापारावरही त्याचा परिणाम होत आहे. पावसामुळे ग्रामीण भागातील लोकांचा कामानिमित्त शहराकडे येण्याचा ओघ मंदावत असल्याने दुपारी पावसामुळे रस्ते निर्मनुष्य होत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. या संततधार पावसामुळे आता पिकांना धोका उद्भवतो की काय, अशी भीती शेतकºयांना लागली आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी जमिनी चिभाडण्याच्या मार्गावर आहेत. कायम पाणी साचून राहणाºया ठिकाणी शेतात पिके पिवळी पडली आहेत. शिवाय कोळपणीसह निंदणीही करता येत नसल्याने काही ठिकाणी पिकांपेक्षा तणच जास्त वाढल्याचे चित्र आहे. ज्यांची पहिल्या टप्प्यात निंदणी अथवा कोळपणी झाली, अशा शेतकºयांची पिके मात्र चांगलीच तरारली. त्यांनाही आता अतिपावसाचा फटका बसण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.हिंगोली तालुक्यातील कनेरगाव नाका येथे सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली होती. यामुळे पैनगंगा दुथडी भरून वाहत होती. नर्सी नामदेव, बासंबा, भांडेगाव येथेही पावसाने हजेरी लावली. सेनगाव तालुक्यातील कडोळी येथे दुपारी मुसळधार पाऊस झाला. सेनगाव, सवना, वरूड चक्रपान या भागातही या पावसाचा जोर होता. केंद्रा बु.औंढा नागनाथ तालुक्यात औंढ्यासह जवळा बाजार परिसरात दमदार पावसाने हजेरी लावली. दुपारी पावसाचा जोर जास्त होता.कळमनुरीसह बाळापूर, नांदापूर परिसरात दिवसभर कधी रिमझिम तर कधी रिपरिप पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. जवळा पांचाळ, डोंगरकडा परिसरात मात्र नुसतेच ढगाळ वातावरण होते.वसमत तालुक्यात वसमतसह कौठा, हट्टा, आडगाव रंजे आदी परिसरात पावसाने हजेरी लावली.पोत्र्यात कामे खोळंबलीपोत्रा : कळमनुरी तालुक्यातील पोत्रा परिसरात सततधार पाऊस पडण्याचा आजचा हा बारा वा दिवस असल्याने शेतीतील अनेक कामे खोळंबली आहेत. ५ जुलैपासून पोत्रा भागात रिमझीम पडत आहे. या रिमझिम संततधार पावसामुळे सुरुवातीला खरीप पिकांना जीवदान मिळाले होते, पण या पावसामुळे मूग, उडीद, कापूस, ज्वारी यासारखी पिके पिवळी पडत असुन, बहुतांश शेतात आता पाणी साचत आहे .काही शेतांना आता डबक्याचे रूप प्राप्त झाले आहे. या सततधार पावसायुळे पिकांची अवस्था बिकट होत चालली आहे.कळमनुरी : शहर व परिसरात १६ जुलै रोजी सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू होती. दुपारी ३ ते ५ वाजेदरम्यान जोरदार पाऊस झाल्याने आठवडी बाजारावर याचा चांगलाच परिणाम झाला. कळमनुरीत सोमवारी आठवडी बाजार भरतो. पावसाची रिपरिप सुरू असल्याने व्यापाºयांनी कमी दुकानेथाटली होती. ग्राहकही कमी प्रमाणात आले. दुपारी पडलेल्या पावसामुळे बाजार उठल्यातच जमा होते. बाजारात जाण्यापेक्षा नागरिकांनी घरी बसणेच पसंद केले. बाजारपेठेवरही या पावसाचा परिणाम झाला. दुकानदार नुसतेच ग्राहकांची वाट पाहत बसले होते.विदर्भ सीमेवरील पैनगंगा नदी दुथडी भरून वाहात असल्याचे चित्र आज दुपारनंतर होते. त्याचप्रमाणे हिंगोलीनजीक वाहणारी कयाधूही दुथडी वाहू लागली होती.

टॅग्स :HingoliहिंगोलीRainपाऊस