शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
3
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
4
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
5
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
6
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
7
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
8
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
9
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
10
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
11
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
12
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
13
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
14
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
15
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
16
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
17
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
18
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
19
"गेल्या कुंभमेळ्यात पालकमंत्री, यावेळी नाही; पण पुढे बघू...'; गिरीश महाजनांनी मनातील इच्छा केली व्यक्त
20
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा

संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 00:59 IST

जिल्ह्यात संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून मागील दहा ते बारा दिवसांपासून रोजच पडणाऱ्या पावसामुळे शेतात तण वाढत चालले आहे. शिवाय इतरही कामे होत नसल्याचे चित्र आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून मागील दहा ते बारा दिवसांपासून रोजच पडणाऱ्या पावसामुळे शेतात तण वाढत चालले आहे. शिवाय इतरही कामे होत नसल्याचे चित्र आहे.मागील काही दिवसांपासून रोजच होणाºया पावसामुळे शेतीची कामे एकीकडे ठप्प असताना व्यापारावरही त्याचा परिणाम होत आहे. पावसामुळे ग्रामीण भागातील लोकांचा कामानिमित्त शहराकडे येण्याचा ओघ मंदावत असल्याने दुपारी पावसामुळे रस्ते निर्मनुष्य होत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. या संततधार पावसामुळे आता पिकांना धोका उद्भवतो की काय, अशी भीती शेतकºयांना लागली आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी जमिनी चिभाडण्याच्या मार्गावर आहेत. कायम पाणी साचून राहणाºया ठिकाणी शेतात पिके पिवळी पडली आहेत. शिवाय कोळपणीसह निंदणीही करता येत नसल्याने काही ठिकाणी पिकांपेक्षा तणच जास्त वाढल्याचे चित्र आहे. ज्यांची पहिल्या टप्प्यात निंदणी अथवा कोळपणी झाली, अशा शेतकºयांची पिके मात्र चांगलीच तरारली. त्यांनाही आता अतिपावसाचा फटका बसण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.हिंगोली तालुक्यातील कनेरगाव नाका येथे सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली होती. यामुळे पैनगंगा दुथडी भरून वाहत होती. नर्सी नामदेव, बासंबा, भांडेगाव येथेही पावसाने हजेरी लावली. सेनगाव तालुक्यातील कडोळी येथे दुपारी मुसळधार पाऊस झाला. सेनगाव, सवना, वरूड चक्रपान या भागातही या पावसाचा जोर होता. केंद्रा बु.औंढा नागनाथ तालुक्यात औंढ्यासह जवळा बाजार परिसरात दमदार पावसाने हजेरी लावली. दुपारी पावसाचा जोर जास्त होता.कळमनुरीसह बाळापूर, नांदापूर परिसरात दिवसभर कधी रिमझिम तर कधी रिपरिप पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. जवळा पांचाळ, डोंगरकडा परिसरात मात्र नुसतेच ढगाळ वातावरण होते.वसमत तालुक्यात वसमतसह कौठा, हट्टा, आडगाव रंजे आदी परिसरात पावसाने हजेरी लावली.पोत्र्यात कामे खोळंबलीपोत्रा : कळमनुरी तालुक्यातील पोत्रा परिसरात सततधार पाऊस पडण्याचा आजचा हा बारा वा दिवस असल्याने शेतीतील अनेक कामे खोळंबली आहेत. ५ जुलैपासून पोत्रा भागात रिमझीम पडत आहे. या रिमझिम संततधार पावसामुळे सुरुवातीला खरीप पिकांना जीवदान मिळाले होते, पण या पावसामुळे मूग, उडीद, कापूस, ज्वारी यासारखी पिके पिवळी पडत असुन, बहुतांश शेतात आता पाणी साचत आहे .काही शेतांना आता डबक्याचे रूप प्राप्त झाले आहे. या सततधार पावसायुळे पिकांची अवस्था बिकट होत चालली आहे.कळमनुरी : शहर व परिसरात १६ जुलै रोजी सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू होती. दुपारी ३ ते ५ वाजेदरम्यान जोरदार पाऊस झाल्याने आठवडी बाजारावर याचा चांगलाच परिणाम झाला. कळमनुरीत सोमवारी आठवडी बाजार भरतो. पावसाची रिपरिप सुरू असल्याने व्यापाºयांनी कमी दुकानेथाटली होती. ग्राहकही कमी प्रमाणात आले. दुपारी पडलेल्या पावसामुळे बाजार उठल्यातच जमा होते. बाजारात जाण्यापेक्षा नागरिकांनी घरी बसणेच पसंद केले. बाजारपेठेवरही या पावसाचा परिणाम झाला. दुकानदार नुसतेच ग्राहकांची वाट पाहत बसले होते.विदर्भ सीमेवरील पैनगंगा नदी दुथडी भरून वाहात असल्याचे चित्र आज दुपारनंतर होते. त्याचप्रमाणे हिंगोलीनजीक वाहणारी कयाधूही दुथडी वाहू लागली होती.

टॅग्स :HingoliहिंगोलीRainपाऊस