शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
2
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
3
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
4
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
5
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
6
घाई करू नका! नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी 'ही' आहे सर्वोत्तम वेळ; हमखास वाचतात तुमचे हजारो रुपये..
7
अरे व्वा! ऑफिसमध्ये 'सीक्रेट सँटा'साठी गिफ्ट द्यायचंय? ५०० रुपयांपर्यंतचे झक्कास पर्याय
8
IPL 2026: "मला नवं आयुष्य दिल्याबद्दल धन्यवाद" पिवळी जर्सी मिळताच मुंबईच्या पोराची इमोशनल पोस्ट!
9
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
10
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
11
पहिल्याच बैठकीत जागावाटपावरून 'मविआ'त काडीमोड, पवारांच्या नेत्यांचा बैठकीतून वॉक आऊट
12
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
13
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
14
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
15
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
16
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
17
गणवेशावरून चिडवलं, घरी येताच चौथीत शिकणाऱ्या प्रशांतने...; आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली
18
Meesho च्या शेअरला अपर सर्किट; इश्यू प्राईजच्या दुप्पट झाली किंमत, सह-संस्थापक बनले अब्जाधीश
19
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
20
विराट-अनुष्काने घेतली प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा, गळ्यात तुळशी माळ; जाणून घ्या त्याचे महत्व
Daily Top 2Weekly Top 5

वन विभागाचाच पाणवठा कोरडा; इतरांचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 12:07 IST

सध्या तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वाढत्या तापमानामुळे बहुतांश जंगलातील पानवठे कोरडेठाक झाले आहेत. त्यामुळे वन्यप्राणी पाण्याच्या शोधात भटकत आहेत. मात्र अजूनही जंगलामध्ये पाणी असल्याचा अंदाज लावत वन विभागात म्हणे १ एप्रिल पासून पानवठ्यात पाणी टकाण्यास सुरुवात करणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : सध्या तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वाढत्या तापमानामुळे बहुतांश जंगलातील पानवठे कोरडेठाक झाले आहेत. त्यामुळे वन्यप्राणी पाण्याच्या शोधात भटकत आहेत. मात्र अजूनही जंगलामध्ये पाणी असल्याचा अंदाज लावत वन विभागात म्हणे १ एप्रिल पासून पानवठ्यात पाणी टकाण्यास सुरुवात करणार आहे.हिंगोली येथील रेल्वेस्थानक रोडवरील वन विभाग कार्यालयात तयार केलेल्या पानवठ्यातही पाण्याचा एकही थेंब टाकलेला नसेल तर जंगली भागातील पानवठ्याची काय स्थिती असेल? हे यावरुनच लक्षात येते. सध्या एवढे ऊन तापत आहे. दुपारनंतर पाण्याने जिवाची लाही-लाही होत आहे. जंगलात वन्यप्राण्यांना पाणीच नसल्याने पाण्याच्या शोधात भटकंतीशिवाय पर्यायच नाही. अन् एकीकडे मात्र वन विभाग जंगलात पाणी असल्याचे सांगत सुटला आहे. वास्तविक पाहता पाण्यासाठी भटकंती करणारे अनेक प्राणी कोरड्या विहिरीत तर कधी पाण्याने भरलेल्या विहिरीत पडल्याच्याही घटना घडल्या आहेत. विशेष करुन रोहि हा प्राणी अनेकदा विहिरीत पडल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत. तर रस्त्यावरही अनेकदा वाहनाला धडकला आहे. त्यामुळे जंगली भागात वन्य प्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था करुन ठेवणे नितांत गरजेचे असतानाही वन विभागाकडून तसे मात्र अजिबात होत नाही. त्यातच जिल्ह्यात मध्ये विविध ठिकाणी असलेल्या मोठ- मोठ्या तलावातून रात्री - अपरात्री पाणी उपसा सुरु असल्याने त्याही तलावाची पाणीपातळी मोठ्या प्रमाणात खालावत चालली आहे. तेथे पाणी पिण्यासाठी गेलेले वन्यप्राणी गाळात रुतून मृत पावत आहेत.सध्यास्थितीत जंगली भागातील पानवठे पूर्णत: कोरडे झाल्याने पाण्याच्या शोधात भटकंती करणारे प्राणी कधी अपघातात तर कधी विहिरीत पडून मृत झाले आहेत. शिवाय, रस्ता ओलांडताना अनेकदा दुचाकीची धडक वन्य प्राण्यांना बसत आहेत. त्यामुळे वनविभागाने पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी वन्यप्रेमीतून होत आहे. तर यासंदर्भात विभागीय वन अधिकारी केशव वाबळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, सध्या तरी जंगली भागातील पाणीसाठे कोरडे झालेले नाहीत. आम्ही नियमित पाहणी करत आहोत. मात्र १ एप्रिलपासून पानवठ्यात पाणी सोडले जाणार आहे.

टॅग्स :forest departmentवनविभागWaterपाणीTemperatureतापमान