शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

वन विभागाचाच पाणवठा कोरडा; इतरांचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 12:07 IST

सध्या तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वाढत्या तापमानामुळे बहुतांश जंगलातील पानवठे कोरडेठाक झाले आहेत. त्यामुळे वन्यप्राणी पाण्याच्या शोधात भटकत आहेत. मात्र अजूनही जंगलामध्ये पाणी असल्याचा अंदाज लावत वन विभागात म्हणे १ एप्रिल पासून पानवठ्यात पाणी टकाण्यास सुरुवात करणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : सध्या तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वाढत्या तापमानामुळे बहुतांश जंगलातील पानवठे कोरडेठाक झाले आहेत. त्यामुळे वन्यप्राणी पाण्याच्या शोधात भटकत आहेत. मात्र अजूनही जंगलामध्ये पाणी असल्याचा अंदाज लावत वन विभागात म्हणे १ एप्रिल पासून पानवठ्यात पाणी टकाण्यास सुरुवात करणार आहे.हिंगोली येथील रेल्वेस्थानक रोडवरील वन विभाग कार्यालयात तयार केलेल्या पानवठ्यातही पाण्याचा एकही थेंब टाकलेला नसेल तर जंगली भागातील पानवठ्याची काय स्थिती असेल? हे यावरुनच लक्षात येते. सध्या एवढे ऊन तापत आहे. दुपारनंतर पाण्याने जिवाची लाही-लाही होत आहे. जंगलात वन्यप्राण्यांना पाणीच नसल्याने पाण्याच्या शोधात भटकंतीशिवाय पर्यायच नाही. अन् एकीकडे मात्र वन विभाग जंगलात पाणी असल्याचे सांगत सुटला आहे. वास्तविक पाहता पाण्यासाठी भटकंती करणारे अनेक प्राणी कोरड्या विहिरीत तर कधी पाण्याने भरलेल्या विहिरीत पडल्याच्याही घटना घडल्या आहेत. विशेष करुन रोहि हा प्राणी अनेकदा विहिरीत पडल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत. तर रस्त्यावरही अनेकदा वाहनाला धडकला आहे. त्यामुळे जंगली भागात वन्य प्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था करुन ठेवणे नितांत गरजेचे असतानाही वन विभागाकडून तसे मात्र अजिबात होत नाही. त्यातच जिल्ह्यात मध्ये विविध ठिकाणी असलेल्या मोठ- मोठ्या तलावातून रात्री - अपरात्री पाणी उपसा सुरु असल्याने त्याही तलावाची पाणीपातळी मोठ्या प्रमाणात खालावत चालली आहे. तेथे पाणी पिण्यासाठी गेलेले वन्यप्राणी गाळात रुतून मृत पावत आहेत.सध्यास्थितीत जंगली भागातील पानवठे पूर्णत: कोरडे झाल्याने पाण्याच्या शोधात भटकंती करणारे प्राणी कधी अपघातात तर कधी विहिरीत पडून मृत झाले आहेत. शिवाय, रस्ता ओलांडताना अनेकदा दुचाकीची धडक वन्य प्राण्यांना बसत आहेत. त्यामुळे वनविभागाने पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी वन्यप्रेमीतून होत आहे. तर यासंदर्भात विभागीय वन अधिकारी केशव वाबळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, सध्या तरी जंगली भागातील पाणीसाठे कोरडे झालेले नाहीत. आम्ही नियमित पाहणी करत आहोत. मात्र १ एप्रिलपासून पानवठ्यात पाणी सोडले जाणार आहे.

टॅग्स :forest departmentवनविभागWaterपाणीTemperatureतापमान