शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

हॉटेल उघडले म्हणून जिभेचे लाड नको; आला पावसाळा, पोट सांभाळा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:24 IST

हिंगोली : लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर काही नियम व अटींवर हॉटेल सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोरोनामुळे अनेक महिने ...

हिंगोली : लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर काही नियम व अटींवर हॉटेल सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोरोनामुळे अनेक महिने घरचे अन्न खाऊन कंटाळलेले नागरिक आता जिभेचे लाड पुरविण्यासाठी हॉटेलमध्ये जात असल्याचे दिसत आहेत. मात्र मसालेदार, चमचमीत पदार्थ खाल्ल्यामुळे पोटाचे विकार उद्भवू शकतात. त्यामुळे आहाराचे नियम पाळून आरोग्य सांभाळावे, असा सल्ला डॉक्टर देत आहेत.

जिल्ह्यात कोरोनामुळे काही निर्बंध घालण्यात आले होते. यात हॉटेलही बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे अनेक दिवस हॉटेल बंद होती. आता कोरोना रुग्णसंख्या घटल्याने काही नियम व अटी घालून हॉटेल सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे अनेकांची पावले आता हॉटेलकडे वळली आहेत. एकीकडे हॉटेल काही वेळ सुरू राहणार असले तरी पावसाळ्यात विविध आजाराची शक्यता असते. त्यामुळे हॉटेलातील पदार्थ खाताना आरोग्याची काळजी घेणेही गरजेचे बनले आहे. तेलकट, तुपकट, मसालेदार पदार्थ खाल्ल्याने पोटाच्या तक्रारी सुरू होतात. अपचन, ॲसिडिटी, जुलाब होणे, अतिसार यामुळे तब्येत बिघडते. पचनसंस्थेवर ताणही निर्माण होतो. पावसाळ्यातच आतड्यांशी संबधित विकार वाढणे, बद्धकोष्ठता, पाेटदुखी असे त्रास जास्त होतात. तसेच हॉटेलमधील चमचमीत पदार्थ खाल्ल्याने वजनवाढीची शक्यता निर्माण असते. त्यामुळे हॉटेलमधील चमचमीत पदार्थ खाताना आरोग्याची काळजी घ्यावी, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ देत आहेत.

पावसाळ्यात हे खायला हवे

- पावसाळ्यात घरी बनविलेले ताजे पदार्थ खावेत.

- उकडलेले, उकळलेले, भाजलेले पदार्थ खाण्यावर भर द्यावा.

-पचायला हलके पदार्थ खाल्ल्याने पोटविकार उद्भवण्याची शक्यता कमी होते.

- पावसाळ्यातही भरपूर पाणी पिण्याची सवय कायम ठेवावी.

पावसाळ्यात हे खाणे टाळयला हवे

-उघड्यावरील आणि शिळे पदार्थ खाऊ नयेत.

- फास्ट फूड, मसालेदार, तेलकट पदार्थ टाळावेत.

-पचनसंस्थेवर ताण येतील असे पदार्थ खाणे टाळावे.

- पोटात गॅस होतील असेही पदार्थ खाणे टाळावे.

रस्त्यावरचे अन्न नकोच

पावसाळ्यात रोगराई पसरण्याची शक्यता जास्त असते. उघड्यावरील पदार्थांवर मच्छर, डास, माशा बसतात त्यामुळे असे पदार्थ खाल्ल्याने संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी उघड्यावरील पदार्थ खाणे टाळलेलेच बरे.

पावसाळ्यात कीटकजन्य आजार उद्भवण्याची शक्यता असते. पावसाळ्यात हात नियमित स्वच्छ धुवावेत. पाणी उकळून प्यावे. उघड्यावरील अन्नपदार्थ खाणे टाळावे.

- डॉ. देवेंद्र जायभाये, वैद्यकीय अधिकारी

पावसाळ्यात पाणी शुद्ध प्यावे. तसेच बाहेरचे उघड्यावरील अन्न खाण्याचे टाळावे. ताजे व घरी शिजविलेल्याच अन्नपदार्थाचे सेवन करावे. फास्ट फूड खाण्याचा मोह टाळावा.

- डॉ. दीपक मोरे, बालरोगतज्ज्ञ, जिल्हा रुग्णालय, हिंगोली