शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

हॉटेल उघडले म्हणून जिभेचे लाड नको; आला पावसाळा, पोट सांभाळा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:24 IST

हिंगोली : लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर काही नियम व अटींवर हॉटेल सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोरोनामुळे अनेक महिने ...

हिंगोली : लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर काही नियम व अटींवर हॉटेल सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोरोनामुळे अनेक महिने घरचे अन्न खाऊन कंटाळलेले नागरिक आता जिभेचे लाड पुरविण्यासाठी हॉटेलमध्ये जात असल्याचे दिसत आहेत. मात्र मसालेदार, चमचमीत पदार्थ खाल्ल्यामुळे पोटाचे विकार उद्भवू शकतात. त्यामुळे आहाराचे नियम पाळून आरोग्य सांभाळावे, असा सल्ला डॉक्टर देत आहेत.

जिल्ह्यात कोरोनामुळे काही निर्बंध घालण्यात आले होते. यात हॉटेलही बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे अनेक दिवस हॉटेल बंद होती. आता कोरोना रुग्णसंख्या घटल्याने काही नियम व अटी घालून हॉटेल सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे अनेकांची पावले आता हॉटेलकडे वळली आहेत. एकीकडे हॉटेल काही वेळ सुरू राहणार असले तरी पावसाळ्यात विविध आजाराची शक्यता असते. त्यामुळे हॉटेलातील पदार्थ खाताना आरोग्याची काळजी घेणेही गरजेचे बनले आहे. तेलकट, तुपकट, मसालेदार पदार्थ खाल्ल्याने पोटाच्या तक्रारी सुरू होतात. अपचन, ॲसिडिटी, जुलाब होणे, अतिसार यामुळे तब्येत बिघडते. पचनसंस्थेवर ताणही निर्माण होतो. पावसाळ्यातच आतड्यांशी संबधित विकार वाढणे, बद्धकोष्ठता, पाेटदुखी असे त्रास जास्त होतात. तसेच हॉटेलमधील चमचमीत पदार्थ खाल्ल्याने वजनवाढीची शक्यता निर्माण असते. त्यामुळे हॉटेलमधील चमचमीत पदार्थ खाताना आरोग्याची काळजी घ्यावी, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ देत आहेत.

पावसाळ्यात हे खायला हवे

- पावसाळ्यात घरी बनविलेले ताजे पदार्थ खावेत.

- उकडलेले, उकळलेले, भाजलेले पदार्थ खाण्यावर भर द्यावा.

-पचायला हलके पदार्थ खाल्ल्याने पोटविकार उद्भवण्याची शक्यता कमी होते.

- पावसाळ्यातही भरपूर पाणी पिण्याची सवय कायम ठेवावी.

पावसाळ्यात हे खाणे टाळयला हवे

-उघड्यावरील आणि शिळे पदार्थ खाऊ नयेत.

- फास्ट फूड, मसालेदार, तेलकट पदार्थ टाळावेत.

-पचनसंस्थेवर ताण येतील असे पदार्थ खाणे टाळावे.

- पोटात गॅस होतील असेही पदार्थ खाणे टाळावे.

रस्त्यावरचे अन्न नकोच

पावसाळ्यात रोगराई पसरण्याची शक्यता जास्त असते. उघड्यावरील पदार्थांवर मच्छर, डास, माशा बसतात त्यामुळे असे पदार्थ खाल्ल्याने संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी उघड्यावरील पदार्थ खाणे टाळलेलेच बरे.

पावसाळ्यात कीटकजन्य आजार उद्भवण्याची शक्यता असते. पावसाळ्यात हात नियमित स्वच्छ धुवावेत. पाणी उकळून प्यावे. उघड्यावरील अन्नपदार्थ खाणे टाळावे.

- डॉ. देवेंद्र जायभाये, वैद्यकीय अधिकारी

पावसाळ्यात पाणी शुद्ध प्यावे. तसेच बाहेरचे उघड्यावरील अन्न खाण्याचे टाळावे. ताजे व घरी शिजविलेल्याच अन्नपदार्थाचे सेवन करावे. फास्ट फूड खाण्याचा मोह टाळावा.

- डॉ. दीपक मोरे, बालरोगतज्ज्ञ, जिल्हा रुग्णालय, हिंगोली