शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

हॉटेल उघडले म्हणून जिभेचे लाड नको; आला पावसाळा, पोट सांभाळा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:24 IST

हिंगोली : लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर काही नियम व अटींवर हॉटेल सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोरोनामुळे अनेक महिने ...

हिंगोली : लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर काही नियम व अटींवर हॉटेल सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोरोनामुळे अनेक महिने घरचे अन्न खाऊन कंटाळलेले नागरिक आता जिभेचे लाड पुरविण्यासाठी हॉटेलमध्ये जात असल्याचे दिसत आहेत. मात्र मसालेदार, चमचमीत पदार्थ खाल्ल्यामुळे पोटाचे विकार उद्भवू शकतात. त्यामुळे आहाराचे नियम पाळून आरोग्य सांभाळावे, असा सल्ला डॉक्टर देत आहेत.

जिल्ह्यात कोरोनामुळे काही निर्बंध घालण्यात आले होते. यात हॉटेलही बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे अनेक दिवस हॉटेल बंद होती. आता कोरोना रुग्णसंख्या घटल्याने काही नियम व अटी घालून हॉटेल सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे अनेकांची पावले आता हॉटेलकडे वळली आहेत. एकीकडे हॉटेल काही वेळ सुरू राहणार असले तरी पावसाळ्यात विविध आजाराची शक्यता असते. त्यामुळे हॉटेलातील पदार्थ खाताना आरोग्याची काळजी घेणेही गरजेचे बनले आहे. तेलकट, तुपकट, मसालेदार पदार्थ खाल्ल्याने पोटाच्या तक्रारी सुरू होतात. अपचन, ॲसिडिटी, जुलाब होणे, अतिसार यामुळे तब्येत बिघडते. पचनसंस्थेवर ताणही निर्माण होतो. पावसाळ्यातच आतड्यांशी संबधित विकार वाढणे, बद्धकोष्ठता, पाेटदुखी असे त्रास जास्त होतात. तसेच हॉटेलमधील चमचमीत पदार्थ खाल्ल्याने वजनवाढीची शक्यता निर्माण असते. त्यामुळे हॉटेलमधील चमचमीत पदार्थ खाताना आरोग्याची काळजी घ्यावी, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ देत आहेत.

पावसाळ्यात हे खायला हवे

- पावसाळ्यात घरी बनविलेले ताजे पदार्थ खावेत.

- उकडलेले, उकळलेले, भाजलेले पदार्थ खाण्यावर भर द्यावा.

-पचायला हलके पदार्थ खाल्ल्याने पोटविकार उद्भवण्याची शक्यता कमी होते.

- पावसाळ्यातही भरपूर पाणी पिण्याची सवय कायम ठेवावी.

पावसाळ्यात हे खाणे टाळयला हवे

-उघड्यावरील आणि शिळे पदार्थ खाऊ नयेत.

- फास्ट फूड, मसालेदार, तेलकट पदार्थ टाळावेत.

-पचनसंस्थेवर ताण येतील असे पदार्थ खाणे टाळावे.

- पोटात गॅस होतील असेही पदार्थ खाणे टाळावे.

रस्त्यावरचे अन्न नकोच

पावसाळ्यात रोगराई पसरण्याची शक्यता जास्त असते. उघड्यावरील पदार्थांवर मच्छर, डास, माशा बसतात त्यामुळे असे पदार्थ खाल्ल्याने संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी उघड्यावरील पदार्थ खाणे टाळलेलेच बरे.

पावसाळ्यात कीटकजन्य आजार उद्भवण्याची शक्यता असते. पावसाळ्यात हात नियमित स्वच्छ धुवावेत. पाणी उकळून प्यावे. उघड्यावरील अन्नपदार्थ खाणे टाळावे.

- डॉ. देवेंद्र जायभाये, वैद्यकीय अधिकारी

पावसाळ्यात पाणी शुद्ध प्यावे. तसेच बाहेरचे उघड्यावरील अन्न खाण्याचे टाळावे. ताजे व घरी शिजविलेल्याच अन्नपदार्थाचे सेवन करावे. फास्ट फूड खाण्याचा मोह टाळावा.

- डॉ. दीपक मोरे, बालरोगतज्ज्ञ, जिल्हा रुग्णालय, हिंगोली