शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.ला लागली वादाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 23:37 IST

जिल्हा परिषदेत विविध कारणांनी वाद उभे राहण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. मात्र त्यामुळे थेट अधिकाऱ्यांच्या अंगावर जाण्याच्या किंवा धमकावण्याच्या प्रकारामुळे वरिष्ठ अधिकारी नाराजी व्यक्त करीत आहेत. पदाधिकारी यावर मार्ग काढण्यासाठी आता बैठक घेण्याची तयारी करीत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा परिषदेत विविध कारणांनी वाद उभे राहण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. मात्र त्यामुळे थेट अधिकाऱ्यांच्या अंगावर जाण्याच्या किंवा धमकावण्याच्या प्रकारामुळे वरिष्ठ अधिकारी नाराजी व्यक्त करीत आहेत. पदाधिकारी यावर मार्ग काढण्यासाठी आता बैठक घेण्याची तयारी करीत आहेत.जिल्हा परिषदेत यापूर्वी कधी नव्हे, एवढे वादाचे प्रकार घडू लागले आहेत. गत दोन वर्षांपासून विविध कारणांनी कामे ठप्प राहात गेली. त्याचा परिणाम म्हणून सदस्य आता प्रत्येक कामात घाई करू लागले आहेत. आमदार, खासदार एवढेच काय तर मंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर जर्जर झालेले सदस्य आता किरकोळ कामांसाठीही आक्रमक होत आहेत. मात्र त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर धावून जाण्याचे प्रकारही घडू लागल्याने बिघडणाºया शिस्तीला लगाम घालण्याची गरज निर्माण झाली आहे.स्थायीच्या समितीत सभापतींनीच अधिकाºयाला चुकीच्या भाषेत खडसावले. त्यानंतर लागलीच दुसºया दिवशी एका जि.प.सदस्याने प्रभारी उपअभियंत्यावर हात उगारला. ही दोन्ही प्रकरणे समोपचारामुळे जागीच विरली. तर यामुळे जि.प. सदस्यांचे मनोबल वाढत चालले म्हणून की काय, आणखी एका पट्टेदार ‘वाघ’ाने वित्त विभागातच जावून धमकावले. त्यामुळे सदर अधिकारी नाराजीने निघून गेले. ते रजा टाकण्याच्या तयारीत आहेत. मात्र सायंकाळी उशिरा हा वाद पदाधिकाऱ्यांपर्यंत गेला. चुकीचे काम आणून त्यावर स्वाक्षºया कशा द्यायच्या? यात चौकशी झाली तर आमची नोकरी जाईल, मग अशा ठिकाणी कामच कशाला करायचे? अशी या विभागातील कर्मचाºयांची भावना आहे. त्यामुळे संबंधित अधिकाºयांना परत बोलावून पदाधिकारी व गटनेत्यांची बैठक घेण्याची तयारी चालू आहे.समोपचाराची गरजआजचा प्रकार चुकीचे काम रेटण्यामुळे घडल्याने त्याचे कुणीच समर्थन करीत नव्हते. मात्र बºयाच ठिकाणी योग्य संचिकाही अडत असल्याचा मुद्दा काही सदस्य मांडत होते. त्यासाठी वरिष्ठ अधिकारी व पदाधिकाºयांकडून सूचनांची अपेक्षा आहे. मात्र ही समोपचाराची भूमिका न घेता थेट अधिकाºयांच्या अंगावर जाणे हे कोणत्याच प्रकारे संयुक्तिक व समर्थनीय नाही.जिल्हा परिषदेची १३ विभागाची यंत्रणा चालविताना त्यातील अडी-अडीचणी सोडविण्यासाठीच पदाधिकारी आहेत. मात्र अनेकजण पदाधिकाºयांचा दरवाजा न ठोठावता थेट अधिकाºयांशी भिडत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेला वादाची लागण लागली आहे. दररोज एक प्रकरण घडू लागल्याने अधिकारीही आणखीच दिरंगाईची भूमिका घेतात. त्यामुळे अडचणीच्या वेळी पदाधिकाºयांकडे बंद दाराआड रास्त प्रश्न सोडविणे शक्य आहे. मात्र सार्वजनिक ठिकाणी होणाºया गोंधळाचे वाईट परिणाम होत आहेत. यात मार्च एण्डच्या तोंडावर कोट्यवधीच्या निविदा अडकून पडण्यासह जि.प.ची प्रतिमाही डागाळत आहे.

टॅग्स :Hingoli z pहिंगोली जिल्हा परिषदzpजिल्हा परिषद