शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

जि.प.ला लागली वादाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 23:37 IST

जिल्हा परिषदेत विविध कारणांनी वाद उभे राहण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. मात्र त्यामुळे थेट अधिकाऱ्यांच्या अंगावर जाण्याच्या किंवा धमकावण्याच्या प्रकारामुळे वरिष्ठ अधिकारी नाराजी व्यक्त करीत आहेत. पदाधिकारी यावर मार्ग काढण्यासाठी आता बैठक घेण्याची तयारी करीत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा परिषदेत विविध कारणांनी वाद उभे राहण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. मात्र त्यामुळे थेट अधिकाऱ्यांच्या अंगावर जाण्याच्या किंवा धमकावण्याच्या प्रकारामुळे वरिष्ठ अधिकारी नाराजी व्यक्त करीत आहेत. पदाधिकारी यावर मार्ग काढण्यासाठी आता बैठक घेण्याची तयारी करीत आहेत.जिल्हा परिषदेत यापूर्वी कधी नव्हे, एवढे वादाचे प्रकार घडू लागले आहेत. गत दोन वर्षांपासून विविध कारणांनी कामे ठप्प राहात गेली. त्याचा परिणाम म्हणून सदस्य आता प्रत्येक कामात घाई करू लागले आहेत. आमदार, खासदार एवढेच काय तर मंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर जर्जर झालेले सदस्य आता किरकोळ कामांसाठीही आक्रमक होत आहेत. मात्र त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर धावून जाण्याचे प्रकारही घडू लागल्याने बिघडणाºया शिस्तीला लगाम घालण्याची गरज निर्माण झाली आहे.स्थायीच्या समितीत सभापतींनीच अधिकाºयाला चुकीच्या भाषेत खडसावले. त्यानंतर लागलीच दुसºया दिवशी एका जि.प.सदस्याने प्रभारी उपअभियंत्यावर हात उगारला. ही दोन्ही प्रकरणे समोपचारामुळे जागीच विरली. तर यामुळे जि.प. सदस्यांचे मनोबल वाढत चालले म्हणून की काय, आणखी एका पट्टेदार ‘वाघ’ाने वित्त विभागातच जावून धमकावले. त्यामुळे सदर अधिकारी नाराजीने निघून गेले. ते रजा टाकण्याच्या तयारीत आहेत. मात्र सायंकाळी उशिरा हा वाद पदाधिकाऱ्यांपर्यंत गेला. चुकीचे काम आणून त्यावर स्वाक्षºया कशा द्यायच्या? यात चौकशी झाली तर आमची नोकरी जाईल, मग अशा ठिकाणी कामच कशाला करायचे? अशी या विभागातील कर्मचाºयांची भावना आहे. त्यामुळे संबंधित अधिकाºयांना परत बोलावून पदाधिकारी व गटनेत्यांची बैठक घेण्याची तयारी चालू आहे.समोपचाराची गरजआजचा प्रकार चुकीचे काम रेटण्यामुळे घडल्याने त्याचे कुणीच समर्थन करीत नव्हते. मात्र बºयाच ठिकाणी योग्य संचिकाही अडत असल्याचा मुद्दा काही सदस्य मांडत होते. त्यासाठी वरिष्ठ अधिकारी व पदाधिकाºयांकडून सूचनांची अपेक्षा आहे. मात्र ही समोपचाराची भूमिका न घेता थेट अधिकाºयांच्या अंगावर जाणे हे कोणत्याच प्रकारे संयुक्तिक व समर्थनीय नाही.जिल्हा परिषदेची १३ विभागाची यंत्रणा चालविताना त्यातील अडी-अडीचणी सोडविण्यासाठीच पदाधिकारी आहेत. मात्र अनेकजण पदाधिकाºयांचा दरवाजा न ठोठावता थेट अधिकाºयांशी भिडत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेला वादाची लागण लागली आहे. दररोज एक प्रकरण घडू लागल्याने अधिकारीही आणखीच दिरंगाईची भूमिका घेतात. त्यामुळे अडचणीच्या वेळी पदाधिकाºयांकडे बंद दाराआड रास्त प्रश्न सोडविणे शक्य आहे. मात्र सार्वजनिक ठिकाणी होणाºया गोंधळाचे वाईट परिणाम होत आहेत. यात मार्च एण्डच्या तोंडावर कोट्यवधीच्या निविदा अडकून पडण्यासह जि.प.ची प्रतिमाही डागाळत आहे.

टॅग्स :Hingoli z pहिंगोली जिल्हा परिषदzpजिल्हा परिषद