शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
2
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
3
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
4
Stock Market Today: विक्रमी तेजीनंतर शेअर बाजारात घसरण; ५०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला, तरीही फार्मा सेक्टरमध्ये तेजी का?
5
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
6
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
7
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
8
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
9
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
10
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
11
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
12
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
14
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
15
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
16
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
17
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
18
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
19
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
20
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय

कळमनुरी तालुक्यातील ७९ शाळांत एकाचवेळी ५८२० विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्रांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:40 IST

आखाडा बाळापूर : एकाच दिवशी, एकाच वेळी तब्बल ५ हजार ८२० विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्राचे वाटप घरपोच करून महाराजस्व अभियानाचा ...

आखाडा बाळापूर : एकाच दिवशी, एकाच वेळी तब्बल ५ हजार ८२० विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्राचे वाटप घरपोच करून महाराजस्व अभियानाचा उद्देश यशस्वी झाला आहे. ‘प्रशासन आपल्या दारी’ हे ब्रीद कळमनुरी उपविभागाने सत्यात उतरविले असल्याचे जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी सांगितले.

कळमनुरी तालुक्यातील शेवाळा येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत महाराजस्व अभियानांतर्गत जातप्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम पार पडला. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी होते तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, माजी जि. प. अध्यक्ष शिवरानी नरवाडे, उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर, तहसीलदार मयूर खेंगळे, आ. संतोष बांगर, डॉ. अरुण सावंत, रावसाहेब पाटील सावंत, महेश गोविंदवार, माधव सावंत, चंद्रकांत सूर्यवंशी, मोहम्मद अजहरूद्दिन यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात जात प्रमाणपत्राचा दाखला वितरित करण्यात आला. प्रशासनाच्या लालफितीतून प्रमाणपत्र काढण्याची प्रक्रिया खूप किचकट आहे. विद्यार्थी व पालकांना हे प्रमाणपत्र काढण्यासाठी सरकारी कचेऱ्यांना चकरा माराव्या लागतात. त्याशिवाय त्यांना आर्थिक झळही सहन करावी लागते परंतु महाराजस्व अभियानांतर्गत उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांच्या पुढाकाराने एकाच दिवशी ७९ शाळांतील जवळपास सहा हजार विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्रांचे दाखले घरपोच मिळत असल्याने महाराजस्व अभियानाचा उद्देश खऱ्या अर्थाने सफल झाल्याचे जिल्हाधिकारी जयवंशी म्हणाले. या कार्यक्रमाला कोरोनाबाबतचे सर्व नियम पाळून साजरा करण्यात आला. जिल्हा परिषद शाळा शेवाळाचे मुख्याध्यापक एस. के. जंजाळ, सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. फोटो नं. ११