शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

विस्थापित शिक्षकांनी दिले प्रशासनास निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 00:13 IST

जिल्ह्यातील १४५२ शिक्षकांच्या सोमवारी बदल्या झाल्या असून बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात आले. मात्र विस्थापीत ३७० शिक्षकांच्या बदल्यांचा प्रश्न कायम आहे. अनियमिततेमुळेच बदली न झाल्याचे या शिक्षकांचे म्हणणे आहे. त्यामुळे या ३७० शिक्षकांनी मंगळवारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मुकीम देशमुख यांना निवेदन दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यातील १४५२ शिक्षकांच्या सोमवारी बदल्या झाल्या असून बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात आले. मात्र विस्थापीत ३७० शिक्षकांच्या बदल्यांचा प्रश्न कायम आहे. अनियमिततेमुळेच बदली न झाल्याचे या शिक्षकांचे म्हणणे आहे. त्यामुळे या ३७० शिक्षकांनी मंगळवारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मुकीम देशमुख यांना निवेदन दिले.शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्यांची आॅनलाईन प्रक्रिया पार पडली. २८ मे रोजी जिल्ह्यातील १४५२ शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. परंतु ३३३ प्राथमिक शिक्षक, २२ विषय शिक्षक व १५ उच्चश्रेणी मुख्याध्यापक असे एकूण ३७० जण विस्थापित झाले आहेत. जि. प. शिक्षकांच्या आॅनलाईन जिल्हा अंतर्गत बदल्यांमध्ये अनियमिततेमुळेच या शिक्षकांच्या बदल्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे बदल्यांची समस्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सोडवावी, अशी मागणी या शिक्षकांनी केली आहे. याबाबत जि.प. प्रशासनास निवेदन सादर करण्यात आले आहे. जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रियेमध्ये विस्थापित झालेल्या ३७० शिक्षकांना विषय शिक्षक व निव्वळ रिक्त पदाच्या उपलब्ध जागा पोर्टलमधून भरण्याची परवानगी देऊन रॅण्डम राऊंड सुरू होण्यापूर्वी २० गावांचा पसंतीक्रमांक देण्यासाठी रिक्त पदांची व विषय शिक्षकांच्या रिक्त जागांची यादी उपलब्ध करून देण्यात यावी, २७फेबु्रवारी २०१७ च्या शासन निर्णयानुसार अवघडक्षेत्र निश्चितीनंतर प्रत्यक्ष बदली कार्यवाही पूर्वी किमान १ महिन्यापुर्वी सामानीकरणाने रिक्त ठेवायच्या जागा घोषित करणे आवश्यक असतानाही जि.प.ने त्या घोषित केल्या नाहीत. आॅनलाईन प्रक्रिया सुरू झाल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅपद्वासरे संवर्ग ४ चे आॅनलाईन पसंती क्रमांक देण्याची मुदत संपण्याच्या कालावधीच्या दोन दिवस अगोदर याद्या जाहीर केल्या. परंतु अधिकृत प्रसिद्ध केल्या नाहीत. त्यामुळे पसंतीक्रमांकाची गावे निवडताना गोंधळ होऊन अधिक शिक्षक विस्थापित झाले.३७० पैकी एकत्र असलेल्या शिक्षक पती-पत्नी यांच्यामधून १७० शिक्षिका विस्थापित झाल्याने गैरसोय होणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. यासह विविध समस्यांमुळे जास्तीत जास्त शिक्षक विस्थापित राहिले आहेत. त्यामुळे बदली न झालेल्या शिक्षकांच्या समस्या सोडवावी, तसेच यावर प्रशासन स्तरावर उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही निवेदनाद्वारे शिक्षकांनी केली आहे. ३१ मेपर्यंत विस्थापित सर्व शिक्षकांना आॅनलाईन अर्ज करावे लागणार आहेत.

टॅग्स :Hingoli z pहिंगोली जिल्हा परिषदTeacherशिक्षक