शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

नाथजोगी समाजाचे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 00:35 IST

मोबाईलच्या सहाय्याने विविध व्हिडीओ क्लिप पसरवून मुले चोरून नेणारी टोळी सक्रिय झाल्याच्या अफवा पसरविल्या जात आहे. मात्र या प्रकारामुळे भटक्या जमातीतील लोकांचा नाहक बळी जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मोबाईलच्या सहाय्याने विविध व्हिडीओ क्लिप पसरवून मुले चोरून नेणारी टोळी सक्रिय झाल्याच्या अफवा पसरविल्या जात आहे. मात्र या प्रकारामुळे भटक्या जमातीतील लोकांचा नाहक बळी जात आहे. धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे भटक्या जमातीतील पाच लोकांची हत्या झाली. या घटनेच्या निषेधार्थ हिंगोली जिल्ह्यातील नाथजोगी समाजबांधवांनी ३ जुलै रोजी प्रशासनास निवेदन दिले.राईनपाडा येथील घटनेच्या निषेधार्थ हिंगोली जिल्ह्यातील विविध भटक्या जमातीतील समाजबांधव मंगळवारी एकत्र जमले होते. शिष्टमंडळाने खा. राजीव सातव यांची भेट घेऊन राज्यभरात भटक्या समाजावर होणाऱ्या अन्यायाबाबत व्यथा मांडल्या. तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयात धुळे जिल्ह्यातील घटनेच्या निषेधार्थ निवेदन सादर केले. ५ जुलै रोजी जिल्हा कचेरीवर समाजबांधवांतर्फे मोर्चा काढण्यात येणार आहे. भटके विमुक्त नाथजोगी, डवरी, नाथपंथी, गोसावी समाजावर दिवसेंदिवस अत्याचाराच्या घटना वाढत चालल्या आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाने भिक्षा मागून पोट भरणाºया व्यक्तींना ओळखपत्र द्यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनावर नारायण बाबर, आप्पा शिंदे, आप्पाजी शिंदे सावंगीकर, नाना सोळंके, रामा शिंदे, अंबादास शिंदे, भैरू सोळंके आदींच्या स्वाक्षºया आहेत.शासन दुर्लक्षाचे बळी-सातवराइनपाडा घटनेत पाच जणांचा गेलेला बळी हा शासनाच्या अक्षम्य दुर्लक्षाचा परिणाम आहे. राज्यात अनेक ठिकाणी अशा घटना घडत असताना कोणतीच जागृती नाही. समाजात तेढ निर्माण करणाºया या घटनांना शासनच जबाबदार आहे. यातील मयताच्या कुटुंबांना प्रत्येकी ५0 लाखांची मदत व्हावी, अशी मागणी खा.राजीव सातव यांनी केली. तर विविध प्रथा, परंपरांचे रक्षण करणाºया या समाजाला भविष्यात अशा घटनांना सामोरे जावे लागू नये, अशी व्यवस्था करण्याची मागणीही त्यांनी केली.

टॅग्स :HingoliहिंगोलीHingoli collector officeजिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली