शहरं
Join us  
Trending Stories
1
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
2
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
3
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
7
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
8
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
9
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
10
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
11
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
12
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
13
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
14
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
15
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
16
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
17
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
18
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
19
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
20
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

नाथजोगी समाजाचे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 00:35 IST

मोबाईलच्या सहाय्याने विविध व्हिडीओ क्लिप पसरवून मुले चोरून नेणारी टोळी सक्रिय झाल्याच्या अफवा पसरविल्या जात आहे. मात्र या प्रकारामुळे भटक्या जमातीतील लोकांचा नाहक बळी जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मोबाईलच्या सहाय्याने विविध व्हिडीओ क्लिप पसरवून मुले चोरून नेणारी टोळी सक्रिय झाल्याच्या अफवा पसरविल्या जात आहे. मात्र या प्रकारामुळे भटक्या जमातीतील लोकांचा नाहक बळी जात आहे. धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे भटक्या जमातीतील पाच लोकांची हत्या झाली. या घटनेच्या निषेधार्थ हिंगोली जिल्ह्यातील नाथजोगी समाजबांधवांनी ३ जुलै रोजी प्रशासनास निवेदन दिले.राईनपाडा येथील घटनेच्या निषेधार्थ हिंगोली जिल्ह्यातील विविध भटक्या जमातीतील समाजबांधव मंगळवारी एकत्र जमले होते. शिष्टमंडळाने खा. राजीव सातव यांची भेट घेऊन राज्यभरात भटक्या समाजावर होणाऱ्या अन्यायाबाबत व्यथा मांडल्या. तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयात धुळे जिल्ह्यातील घटनेच्या निषेधार्थ निवेदन सादर केले. ५ जुलै रोजी जिल्हा कचेरीवर समाजबांधवांतर्फे मोर्चा काढण्यात येणार आहे. भटके विमुक्त नाथजोगी, डवरी, नाथपंथी, गोसावी समाजावर दिवसेंदिवस अत्याचाराच्या घटना वाढत चालल्या आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाने भिक्षा मागून पोट भरणाºया व्यक्तींना ओळखपत्र द्यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनावर नारायण बाबर, आप्पा शिंदे, आप्पाजी शिंदे सावंगीकर, नाना सोळंके, रामा शिंदे, अंबादास शिंदे, भैरू सोळंके आदींच्या स्वाक्षºया आहेत.शासन दुर्लक्षाचे बळी-सातवराइनपाडा घटनेत पाच जणांचा गेलेला बळी हा शासनाच्या अक्षम्य दुर्लक्षाचा परिणाम आहे. राज्यात अनेक ठिकाणी अशा घटना घडत असताना कोणतीच जागृती नाही. समाजात तेढ निर्माण करणाºया या घटनांना शासनच जबाबदार आहे. यातील मयताच्या कुटुंबांना प्रत्येकी ५0 लाखांची मदत व्हावी, अशी मागणी खा.राजीव सातव यांनी केली. तर विविध प्रथा, परंपरांचे रक्षण करणाºया या समाजाला भविष्यात अशा घटनांना सामोरे जावे लागू नये, अशी व्यवस्था करण्याची मागणीही त्यांनी केली.

टॅग्स :HingoliहिंगोलीHingoli collector officeजिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली