शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

निरीक्षणगृहाविना बालकांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 23:59 IST

जिल्ह्यात मुलांचे निरीक्षणगृह नसल्याने विधीसंघर्षग्रस्त बालकांना परभणी येथे घेऊन जावे लागत आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी स्वतंत्र मुला-मुलींचे निरीक्षणगृह असणे आवश्यक आहे. मात्र निरीक्षणगृहाची व्यवस्था नसल्याने या बालकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत असून त्यांची गैरसोय होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात मुलांचे निरीक्षणगृह नसल्याने विधीसंघर्षग्रस्त बालकांना परभणी येथे घेऊन जावे लागत आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी स्वतंत्र मुला-मुलींचे निरीक्षणगृह असणे आवश्यक आहे. मात्र निरीक्षणगृहाची व्यवस्था नसल्याने या बालकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत असून त्यांची गैरसोय होत आहे.हरविलेले मुले-मुली तसेच अनाथ व विधीसंघर्षग्रस्त बालकांना काळजी व संरक्षणाच्या दृष्टिकोणातून निरीक्षणगृहात ठेवले जाते. हिंगोली येथे मुलींचे निरीक्षणगृह असले तरी, मागील अनेक वर्षांपासून मुलांचे निरीक्षणगृहच नाही. त्यामुळे हिंगोली येथील विधीसंघर्षग्रस्त बालकांना परभणी येथील निरीक्षणगृहात ठेवले जात आहे. निरीक्षणगृह नसल्याने नाईलाजाने परभणीपर्यंतचा प्रवास करावा लागत आहे. तर परभणी येथे मुलींचे निरीक्षणगृह नसल्याने तेथील मुलींना हिंगोली येथे आणावे लागत आहे. या कारणामुळे मात्र मुलींची गैरसोय होत आहे. त्यामुळे हिंगोली व परभणी जिल्ह्यात मुला-मुलींसाठी स्वतंत्र निरीक्षणगृहाची आवश्यकता आहे.बालगुन्हेगारी रोखण्यासाठी प्रयत्न केले जात असले तरी, प्रत्येक्षात मात्र दिवसेंदिवस बालगुन्हेगारीचे प्रमाण वाढतच चालले आहे. परंतु कायद्याने बालगुन्हेगार हा शब्दच हद्दपार केला आहे. एखाद्या परिस्थितीत बालकांनी गुन्ह्याचे कृत्य केले असेल तर या बालकांना कायद्याच्या प्रकियेतून जाव लागते. यासाठी कायदा त्याला विधिसंघर्षग्रस्त मूल असे संबोधतो. या मुलांना निरीक्षणगृहात ठेऊन संरक्षण व सुधारण्याची संधी दिली जाते.समूपदेशन व मार्गदर्शन-निरीक्षणगृहातील बालकांचे समूपदेशन केले जाते. त्यांना शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मार्गदर्शन केले जाते. तसेच विधीसंघर्षग्रस्त बालकांची काळजी व त्यांना संरक्षणात ठेवण्यात येते. विशेष म्हणजे विधीसंघर्षतग्रस्त बालकांचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी प्रयत्न केले जातात. अशी माहिती परभणी येथील संदीप बेंडसुरे यांनी दिली. तसेच हिंगोली व परभणी येथे मुला-मुलींचे स्वतंत्र निरीक्षणगृह असल्यास बालकांची गैरसोय टळेल.हिंगोली येथे मुलींचे निरीक्षण गृह आहे. बालकांची काळजी व संरक्षणाची गरज असलेली मुलींना येथे ठेवण्यात आले आहे. समितीकडे १६ मुलींची जबाबदारी आहे. यामध्ये १ विधीसंघर्षग्रस्त मुलीचा समावेश असून सदर मुलीस पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.मागील तीन महिन्यात बाल न्यायमंडळाकडील प्राप्त झालेल्या २८ प्रकरणापैंकी २१ प्रकरणे निकाली लागली आहेत. तर ७ प्रकरणे प्रलंबित असल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विठ्ठल शिंदे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.हिंगोली व परभणी येथील निरीक्षणगृहातील मुला-मुलींच्या आकडेवारीवरून मागील तीन वर्षांत विधीसंघर्षग्रस्त मुलींचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीHealth Tipsहेल्थ टिप्स