शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
6
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
7
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
8
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
9
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
10
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
11
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
12
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
13
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
14
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
15
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
16
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
17
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
18
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
19
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
20
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा

‘तो’ जीवघेणा खड्डा बनला धोबीघाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 00:31 IST

जिल्हा रुग्णालयात पाणी नसल्याने तेथील बाळंतणीसह इतर अनेक रुग्णांचे कपडे धुण्यासाठी चक्क जिवघेण्या खड्ड्यातील साचलेल्या पाण्यात महिला उतरत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. त्याहून धक्कादायक म्हणजे याच खड्ड्यात पडून दोन महिन्यांपूर्वी एका बालकाचा मृत्यू झाला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा रुग्णालयात पाणी नसल्याने तेथील बाळंतणीसह इतर अनेक रुग्णांचे कपडे धुण्यासाठी चक्क जिवघेण्या खड्ड्यातील साचलेल्या पाण्यात महिला उतरत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. त्याहून धक्कादायक म्हणजे याच खड्ड्यात पडून दोन महिन्यांपूर्वी एका बालकाचा मृत्यू झाला होता.हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालय असुविधांचे माहेरघर आहे. केवळ नाईलाज म्हणून रुग्ण तेथे येतात. गोरगरिबांना तर खिशात पैसे नसल्याने या रुग्णालयाशिवाय पर्याय नाही. येथे पिण्याच्या पाण्यासह स्वच्छतागृहातही पाण्याची सोय नाही. गेल्या अनेक वर्षांपासूनचा हा प्रश्न आहे. केवळ मलमपट्टी करून प्रशासन दिवस काढते.डॉक्टरांसाठीच्या स्वच्छतागृहातही पाणी नसते. विशेष म्हणजे वैद्यकीय अधिकारीही कधी याबाबत कुरबूर करीत नाहीत. पाण्यासाठी टाक्या आहेत. स्वच्छतागृहे आहेत. पाईपलाईन आहे, दुष्काळी चित्र नाही. मात्र तरीही रुग्णालयात पाणीप्रश्न असेल तर हे कोडे ब्रह्मदेवही सोडवू शकणार नाही. अधिकाऱ्यांनाच ही बाब मनावर घ्यावी लागणार आहे.रुग्णालयासमोरील रस्त्यावर भूमिगत गटार योजनेसाठी खोदलेला खड्डा २५ ते ३0 फूट खोल आहे. यात एक बालक पडून मृत्यू पावल्यानंतर दोन्ही बाजूंनी पत्रा लावून हा रस्ता बंद केला. मात्र तरीही त्यात जावून रुग्णालयात आलेल्या ग्रामीण भागातील महिलांनी बाळ व बाळंतणीचे कपडे धुण्यासाठी या पाण्याचा उपयोग सुरू केला आहे. येथे इतरही रुग्णांच्या नातेवाईकांच्या रांगा लागतात. वाळू घातलेल्या कपड्यांवरून ते लक्षात येते. मात्र त्यांना कुणीच अडवत नाही. या खड्ड्याच्या खोलीबाबतही त्यांना काहीच कल्पना नाही. रुग्णालयात पाणी नाही व येथे चांगले पाणी दिसते म्हणून आम्ही येथे आल्याचे या महिला सांगतात.रुग्णालयात पाणी नाही, हा प्रश्न गेल्या अनेक वर्षांचा आहे. तो सुटत नाही याला जबाबदार कोण? या साध्या व सोप्या प्रश्नाचे उत्तर मिळाले तर हा पाणीप्रश्न नक्कीच सुटू शकेल. मात्र हे विचारायची जबाबदारीच स्वीकारणारा खांदा या संपूर्ण जिल्ह्यात कुणाचाच नसल्याने हा प्रश्न खितपत पडला आहे.एका बालकाचा बळी गेल्यानंतर त्यावरून मोठे काहूर माजले होते. कंत्राटदार, जीवन प्राधिकरण व नगरपालिका यापैकी कुणीही त्यातून बोध घेतला नाही. पत्रे ठोकून रस्ता बंद केला. मात्र तेथे धुणे धुणाºयांच्या लागणाºया रांगा का दिसत नसतील?इमारतीचे मजले जसे वाढताहेत तशा गैरसोयीही वाढत आहेत. पाण्यासारखा पायाभूत प्रश्न सुटत नसेल तर हे मजले आणि वाढलेल्या खाटांचा उपयोग काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 

टॅग्स :HingoliहिंगोलीHealth Tipsहेल्थ टिप्स