शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

‘तो’ जीवघेणा खड्डा बनला धोबीघाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 00:31 IST

जिल्हा रुग्णालयात पाणी नसल्याने तेथील बाळंतणीसह इतर अनेक रुग्णांचे कपडे धुण्यासाठी चक्क जिवघेण्या खड्ड्यातील साचलेल्या पाण्यात महिला उतरत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. त्याहून धक्कादायक म्हणजे याच खड्ड्यात पडून दोन महिन्यांपूर्वी एका बालकाचा मृत्यू झाला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा रुग्णालयात पाणी नसल्याने तेथील बाळंतणीसह इतर अनेक रुग्णांचे कपडे धुण्यासाठी चक्क जिवघेण्या खड्ड्यातील साचलेल्या पाण्यात महिला उतरत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. त्याहून धक्कादायक म्हणजे याच खड्ड्यात पडून दोन महिन्यांपूर्वी एका बालकाचा मृत्यू झाला होता.हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालय असुविधांचे माहेरघर आहे. केवळ नाईलाज म्हणून रुग्ण तेथे येतात. गोरगरिबांना तर खिशात पैसे नसल्याने या रुग्णालयाशिवाय पर्याय नाही. येथे पिण्याच्या पाण्यासह स्वच्छतागृहातही पाण्याची सोय नाही. गेल्या अनेक वर्षांपासूनचा हा प्रश्न आहे. केवळ मलमपट्टी करून प्रशासन दिवस काढते.डॉक्टरांसाठीच्या स्वच्छतागृहातही पाणी नसते. विशेष म्हणजे वैद्यकीय अधिकारीही कधी याबाबत कुरबूर करीत नाहीत. पाण्यासाठी टाक्या आहेत. स्वच्छतागृहे आहेत. पाईपलाईन आहे, दुष्काळी चित्र नाही. मात्र तरीही रुग्णालयात पाणीप्रश्न असेल तर हे कोडे ब्रह्मदेवही सोडवू शकणार नाही. अधिकाऱ्यांनाच ही बाब मनावर घ्यावी लागणार आहे.रुग्णालयासमोरील रस्त्यावर भूमिगत गटार योजनेसाठी खोदलेला खड्डा २५ ते ३0 फूट खोल आहे. यात एक बालक पडून मृत्यू पावल्यानंतर दोन्ही बाजूंनी पत्रा लावून हा रस्ता बंद केला. मात्र तरीही त्यात जावून रुग्णालयात आलेल्या ग्रामीण भागातील महिलांनी बाळ व बाळंतणीचे कपडे धुण्यासाठी या पाण्याचा उपयोग सुरू केला आहे. येथे इतरही रुग्णांच्या नातेवाईकांच्या रांगा लागतात. वाळू घातलेल्या कपड्यांवरून ते लक्षात येते. मात्र त्यांना कुणीच अडवत नाही. या खड्ड्याच्या खोलीबाबतही त्यांना काहीच कल्पना नाही. रुग्णालयात पाणी नाही व येथे चांगले पाणी दिसते म्हणून आम्ही येथे आल्याचे या महिला सांगतात.रुग्णालयात पाणी नाही, हा प्रश्न गेल्या अनेक वर्षांचा आहे. तो सुटत नाही याला जबाबदार कोण? या साध्या व सोप्या प्रश्नाचे उत्तर मिळाले तर हा पाणीप्रश्न नक्कीच सुटू शकेल. मात्र हे विचारायची जबाबदारीच स्वीकारणारा खांदा या संपूर्ण जिल्ह्यात कुणाचाच नसल्याने हा प्रश्न खितपत पडला आहे.एका बालकाचा बळी गेल्यानंतर त्यावरून मोठे काहूर माजले होते. कंत्राटदार, जीवन प्राधिकरण व नगरपालिका यापैकी कुणीही त्यातून बोध घेतला नाही. पत्रे ठोकून रस्ता बंद केला. मात्र तेथे धुणे धुणाºयांच्या लागणाºया रांगा का दिसत नसतील?इमारतीचे मजले जसे वाढताहेत तशा गैरसोयीही वाढत आहेत. पाण्यासारखा पायाभूत प्रश्न सुटत नसेल तर हे मजले आणि वाढलेल्या खाटांचा उपयोग काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 

टॅग्स :HingoliहिंगोलीHealth Tipsहेल्थ टिप्स