शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

शिवशंकराच्या विवाहाला भक्तांची मांदियाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 00:21 IST

देशातील १२ ज्योतिर्लिंगपैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री नागेश्वराचे महाशिवरात्र उत्सव म्हणजेच विवाह सोहळा आहे. हा सोहळा नेमका प्रदोश व महाशिवरात्र असा द्विपुष्कर योग असल्याने दर्शन घेतल्यास पुण्य मिळत असल्याने येथे भाविकांची मोठी गर्दी उसळणार आहे. श्री नागनाथ संस्थान व पोलीस प्रशासनाच्या वतीने भाविकांना दर्शनासाठी उपाययोजना केल्या आहेत.

गजानन वाखरकर ।लोकमत न्यूज नेटवर्कऔंढा नागनाथ : देशातील १२ ज्योतिर्लिंगपैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री नागेश्वराचे महाशिवरात्र उत्सव म्हणजेच विवाह सोहळा आहे. हा सोहळा नेमका प्रदोश व महाशिवरात्र असा द्विपुष्कर योग असल्याने दर्शन घेतल्यास पुण्य मिळत असल्याने येथे भाविकांची मोठी गर्दी उसळणार आहे. श्री नागनाथ संस्थान व पोलीस प्रशासनाच्या वतीने भाविकांना दर्शनासाठी उपाययोजना केल्या आहेत.देशामध्ये १२ ज्योतिर्लिंगापैकी औंढा हे आठवे ज्योतिर्लिंग आहे. यामध्ये रामेश्वर व औंढ्यातील नागेश्वर येथील दोन्ही शिवलिंंग वाळूने अच्छादलेले आहे. पांडव काळात या ज्योतिर्लिंगाचे दर्शन झाले असून हे शिवलिंग स्वयंभू आहे. या दोन्ही ठिकाणी शिवलिंग स्पर्श करून दर्शन घेण्याची प्रथा आहे. तशी व्यवस्था अन्य ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी आढळून येत नाही. पांडव काळात विशाल मंदिर ज्योतिर्लिंगाचे मंदिर बांधल्याची अख्यायिका आहे. आर्धे मंदिर हेमांडपंथी बांधकामात असून, पाच दिवसाचा असतो. शनिवारी या उत्सवाची सांगता शिवशंकर व पार्वती यांना रथामध्ये बसवून मंदिराला पाच प्रदक्षिणा घातल्यानंतर होते. यालाच रथोत्सव म्हणतात.मंदिरात जाण्या व येण्याचा एकच मार्ग असल्याने संस्थानच्या वतीने बॅरेकेटेस बांधली आहेत. दर्शन गाभाºयात जाऊन घ्यावे लागत असल्याने दर्शनाला २ ते ३ तास लागतात. अशा वेळी दिव्यांग, आजारी व वृद्ध भाविकांना शिखर दर्शन घेऊनच समाधान मानावे लागेल. मध्यरात्रीपासूनच भाविकांसाठी दर्शन व्यवस्था खुली केली जाणार आहे. महाशिवरात्रीचे दर्शन घेण्यासाठी गुजरात, राजस्थान, आंधप्रदेश, मध्यप्रदेश, दिल्ली येथून भाविक दाखल होतात. रांगेत दर्शन घेतलेल्या पहिल्या भाविकांचा सन्मान करण्याची प्रथा आहे.अधिकाºयांसह ४०० पोलीस कर्मचारी तैनातयात्रा काळात कायदा सुव्यवस्था राहावी म्हणून पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी यंदा उत्सव काळात जादा बंदोबस्त ठेवला आहे. तसेच मंदिर परिसर व मंदिराची चावरिया यांनी सोमवारी दुपारी पाहणी केली आहे. यात्रा महोत्सवात गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर भोरे, पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांच्यासह हिंगोली, वसमत, कळमनुरी, हट्टा, कुरूंदा तसेच नांदेड जिल्ह्यातील २५ पोलीस अधिकारी यांचे नियंत्रण असणार आहे. शिवाय २२० पोलीस कर्मचारी, १२५ होमगार्ड तसेच दंगानियंत्रण पथकासह बॉम्बशोधक व नाशक पथक, एटीएस चे अधिकारी तैनात करण्यात आले आहेत.शिवाय मंदिर व मंदिर परिसरात जागो- जागी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. मंदिर परिसरात धार्मिक साहित्यांच्या दुकानासह पेढे व प्रसादाची दुकाने मोठ्या प्रमाणात थाटली आहेत. त्यांवरही खरेदीसाठी भाविकांची दिवसभर गर्दी राहते.मंदिरात दर्शनाला वेळ लागत असल्याने येथे रांगेत अनेक भाविकांना औषधोपचाराची गरज भासते. त्यामुळे आरोग्य विभागाच्या वतीने संत नामदेव मंदिर सभामंडपात कक्षा उभारण्यात आला असून, अपातकालीन दोन रूग्णवाहिका ही राखीव ठेवण्यात आल्या आहेत.येथे दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. येथे दर्शनासाठी स्वतंत्र दर्शन रांग बनविलेली असून, भाविकांना शांततेत दर्शन करता येईल यासाठी जागो- जागी पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. शिवाय वाहन तळाचीही व्यवस्था केली.या ठिकाणी पर राज्यातून व जिल्ह्याबाहेरुन दर्शनासाठी येणाºया भक्तांची गर्दी असते. दिवसभर येथे भक्तांची वर्दळ असल्याने दर्शनासाठी आलेल्या भक्तांनी शांततेत दर्शन घेण्याचे आवाहन संस्थानतर्फे केले आहे.