शहरं
Join us  
Trending Stories
1
योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा...; उद्धवसेना आक्रमक, अनिल परबांचे गंभीर आरोप
2
Conversion Law: राजस्थानात धर्मांतरण कायदा लागू, राज्यपाल हरीभाऊ बागडे यांची मंजुरी, उल्लंघन केल्यास किती शिक्षा होणार? जाणून घ्या
3
टाटा कॅपिटलच्या आयपीओचे शेअर्स मिळाले की नाही? कसं चेक कराल स्टेटस, जीएमपीची स्थिती काय? जाणून घ्या
4
रोहित शर्माने विकत घेतली नवीन आलिशान Tesla Model Y कार, त्याची खासियत काय आणि किंमत किती?
5
श्रीमंतांच्या यादीत मोठी उलथापालथ! एअरटेलचे मित्तल यांची मोठी झेप, शिव नादरांची घसरण, पहिलं कोण?
6
"चाकू हल्ल्यात जेह झालेला जखमी..."; ८ महिन्यांनी सैफने सांगितलं 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?
7
"अजित आगरकरसाठी शेवट खूप विचित्र असेल", रोहित शर्मा वादावर इंग्लंडच्या माजी खेळाडूचं विधान
8
“योगेश कदमांनी अधिकाराचा गैरवापर करत गुंडाला अभय दिले, राजीनामा द्यावा”; ठाकरे गटाची मागणी
9
“शेतकऱ्यांना भरीव मदतीची दानत नाही, तीन आठवड्यांचे अधिवेशन घ्यावे”; शरद पवार गटाची मागणी
10
या एका कारणामुळे 'कांतारा चॅप्टर १' बनला ब्लॉकबस्टर; ऋषभ शेट्टीने सांगितलं सिनेमाच्या यशामागचं सीक्रेट
11
इराण युद्ध अमेरिकाच नाही, तर 'या' देशानेही इस्रायलला दिला होता मोठा पाठिंबा!४ महिन्यांनंतर झाला खुलासा
12
संकष्ट चतुर्थी: भारतातील एकमेव १८ हातांच्या गणपतीचे मंदिर पाहिले का? आपल्या महाराष्ट्रातच आहे!
13
भारत-तालिबान मैत्रीनं पाकिस्तानचं टेन्शन वाढणार; अफगाणिस्तान भारतासाठी इतकं महत्त्वाचं का?
14
Cough Syrup : "पप्पा, मला मोबाईल द्या ना...", वेदांशचे शेवटचे शब्द; १२ लाख खर्च करूनही वाचला नाही जीव
15
मृत सासूला चितेवर ठेवताना शरीरावर दिसल्या जखमा; संशय येताच तपास झाला अन् समोर आलं विदारक सत्य!
16
"WhatsApp वर नोट आणि वरिष्ठांची नाव..."; IAS पत्नीने केले १५ कॉल, लेकीलाही पाठवलं पण...
17
Ratan Tata Death Anniversary: असे होते रतन टाटा... ज्या व्यवसायात हात घातला सोनं केलं, १० पॉईंट्समध्ये पाहा त्यांचा प्रवास
18
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: गणपतीसह लक्ष्मी देवीचेही करा पूजन, मंत्राचे जप ठरतील उपयुक्त!
19
शून्य बँक शिल्लक असतानाही होईल UPI पेमेंट? 'भीम ॲप'चं 'हे' खास फीचर जाणून घ्या!
20
भ्रष्टाचारामध्ये महाराष्ट्र आघाडीवर; ७८५ शासकीय कर्मचारी, खासगी व्यक्तींना अटक; देशभरात २,८७५ ठिकाणी कारवाई

भाजीपाल्यांची आवक असूनही भाजीपाला महागला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:28 IST

हिंगोली: जिल्ह्यात पाण्याची मुबलता भरपूर प्रमाणात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी भाजीपाल्यांचे उत्पादनही घेतले आहे. सद्य:स्थितीत भाजीपाला आवक चांगली असली तरी ...

हिंगोली: जिल्ह्यात पाण्याची मुबलता भरपूर प्रमाणात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी भाजीपाल्यांचे उत्पादनही घेतले आहे. सद्य:स्थितीत भाजीपाला आवक चांगली असली तरी मंडईतील काही विक्रेत्यांनी भाज्यांचा ढिग केलेला पहायला मिळत आहे. परिणामी भाज्या महाग झाल्याचे पहायला मिळाले.

जिल्ह्यात कोरोना महामारीचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे शासनाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन सुरु केले आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या वेळेतच भाजीपाला व इतर किराणा दुकान चालू ठेवावे, असे आदेशित केले आहे. परंतु, भाजीपाला विकण्यासाठी वेळ कमी पडत आहे, असे भाजीपाला विक्रेत्यांचे म्हणणे आहे. जिल्हा प्रशासनाने लागू केलेली वेळ कमी असून ती वाढवून देवून गल्लोगल्ली भाजीपाला विकण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणीही काही व्यापाऱ्यांनी केली आहे. कांदा,लिंबू,कोथिंबीर,कद्दू, पालक सोडले मंडईत काकडी ३० रुपये किलो, टोमॅटो ४०, वांगे ३० रुपये, आद्रक ४० रुपये, भेंडी ४०, दोडके ३० तर कद्दू १० रुपये किलो दराने विकले गेले.

विक्रीअभावी भाज्यांचा ढिग

भाजी मंडईत सकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान बीट होते. सर्व छोटे-मोठे व्यापारी येथे शेतकऱ्यांनी आणलेल्या भाज्या खरेदीसाठी येतात. ठोक विक्रेते आधी भाज्या खरेदी करतात नंतर छोट्या व्यापाऱ्यांना भाज्या विक्री केल्या जातात. परंतु, २५ एप्रिलपासून मंडईतील व्यापाऱ्यांना भाजी विकण्यासाठी ११ वाजेची वेळ दिल्यामुळे भाज्यांचा ढिग साचत आहे. काही ठोक विक्रेते भाज्यांचा स्टॉक करुन ठेवतात. त्यामुळे छोट्या विक्रेत्यांना भाज्या वेळेवर मिळत नाहीत. आलेल्या पाऊली त्यांना परत जावे लागत आहे. शेतकऱ्यांनी आणलेला भाजीपाला सर्वच व्यापाऱ्यांना मिळावा यासाठी ठोक विक्रेत्यांनी पुढाकार घ्यावा, अशीही मागणी काहींनी केली.

प्रतिक्रिया

भाज्यांची आवक चांगली असली

आम्ही छोटे व्यापारी ठोक विक्रेत्यांकडून खरेदी करतो. या आठवड्यात भाजीपाला महाग मिळाला आहे. त्यामुळे नाईलाजास्तव आम्हालाही महागच विकावा लागत आहे. जिल्हा प्रशासनाने छोट्या विक्रेत्यांनाही जास्तीचा वेळ द्यावा.-शेख इरफान, भाजी विक्रेता

जिल्ह्यात फळांची आवक मोठ्या प्रमाणात आहे. परंतु, विकण्यासाठी वेळ व जागा नाही. कोरोनामुळे सकाळी ११ वाजेपर्यतच फळे विकावे लागत आहेत. कोणत्याही वेळी फळे विकल्यास दंड भरावा लागत आहे. सद्य:स्थितीत चिकू ६० रुपये किलो, अंगूर १२० रुपये, सफरचंद २२०, पपई, डाळिंब २०० रुपये किलो तर नारळ ६० रुपयास एक या प्रमाणे विक्री झाले.

- शेख अब्दुल बागवान, फळ विक्रेता