शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाल्यांची आवक असूनही भाजीपाला महागला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:28 IST

हिंगोली: जिल्ह्यात पाण्याची मुबलता भरपूर प्रमाणात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी भाजीपाल्यांचे उत्पादनही घेतले आहे. सद्य:स्थितीत भाजीपाला आवक चांगली असली तरी ...

हिंगोली: जिल्ह्यात पाण्याची मुबलता भरपूर प्रमाणात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी भाजीपाल्यांचे उत्पादनही घेतले आहे. सद्य:स्थितीत भाजीपाला आवक चांगली असली तरी मंडईतील काही विक्रेत्यांनी भाज्यांचा ढिग केलेला पहायला मिळत आहे. परिणामी भाज्या महाग झाल्याचे पहायला मिळाले.

जिल्ह्यात कोरोना महामारीचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे शासनाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन सुरु केले आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या वेळेतच भाजीपाला व इतर किराणा दुकान चालू ठेवावे, असे आदेशित केले आहे. परंतु, भाजीपाला विकण्यासाठी वेळ कमी पडत आहे, असे भाजीपाला विक्रेत्यांचे म्हणणे आहे. जिल्हा प्रशासनाने लागू केलेली वेळ कमी असून ती वाढवून देवून गल्लोगल्ली भाजीपाला विकण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणीही काही व्यापाऱ्यांनी केली आहे. कांदा,लिंबू,कोथिंबीर,कद्दू, पालक सोडले मंडईत काकडी ३० रुपये किलो, टोमॅटो ४०, वांगे ३० रुपये, आद्रक ४० रुपये, भेंडी ४०, दोडके ३० तर कद्दू १० रुपये किलो दराने विकले गेले.

विक्रीअभावी भाज्यांचा ढिग

भाजी मंडईत सकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान बीट होते. सर्व छोटे-मोठे व्यापारी येथे शेतकऱ्यांनी आणलेल्या भाज्या खरेदीसाठी येतात. ठोक विक्रेते आधी भाज्या खरेदी करतात नंतर छोट्या व्यापाऱ्यांना भाज्या विक्री केल्या जातात. परंतु, २५ एप्रिलपासून मंडईतील व्यापाऱ्यांना भाजी विकण्यासाठी ११ वाजेची वेळ दिल्यामुळे भाज्यांचा ढिग साचत आहे. काही ठोक विक्रेते भाज्यांचा स्टॉक करुन ठेवतात. त्यामुळे छोट्या विक्रेत्यांना भाज्या वेळेवर मिळत नाहीत. आलेल्या पाऊली त्यांना परत जावे लागत आहे. शेतकऱ्यांनी आणलेला भाजीपाला सर्वच व्यापाऱ्यांना मिळावा यासाठी ठोक विक्रेत्यांनी पुढाकार घ्यावा, अशीही मागणी काहींनी केली.

प्रतिक्रिया

भाज्यांची आवक चांगली असली

आम्ही छोटे व्यापारी ठोक विक्रेत्यांकडून खरेदी करतो. या आठवड्यात भाजीपाला महाग मिळाला आहे. त्यामुळे नाईलाजास्तव आम्हालाही महागच विकावा लागत आहे. जिल्हा प्रशासनाने छोट्या विक्रेत्यांनाही जास्तीचा वेळ द्यावा.-शेख इरफान, भाजी विक्रेता

जिल्ह्यात फळांची आवक मोठ्या प्रमाणात आहे. परंतु, विकण्यासाठी वेळ व जागा नाही. कोरोनामुळे सकाळी ११ वाजेपर्यतच फळे विकावे लागत आहेत. कोणत्याही वेळी फळे विकल्यास दंड भरावा लागत आहे. सद्य:स्थितीत चिकू ६० रुपये किलो, अंगूर १२० रुपये, सफरचंद २२०, पपई, डाळिंब २०० रुपये किलो तर नारळ ६० रुपयास एक या प्रमाणे विक्री झाले.

- शेख अब्दुल बागवान, फळ विक्रेता