शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाल्यांची आवक असूनही भाजीपाला महागला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:28 IST

हिंगोली: जिल्ह्यात पाण्याची मुबलता भरपूर प्रमाणात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी भाजीपाल्यांचे उत्पादनही घेतले आहे. सद्य:स्थितीत भाजीपाला आवक चांगली असली तरी ...

हिंगोली: जिल्ह्यात पाण्याची मुबलता भरपूर प्रमाणात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी भाजीपाल्यांचे उत्पादनही घेतले आहे. सद्य:स्थितीत भाजीपाला आवक चांगली असली तरी मंडईतील काही विक्रेत्यांनी भाज्यांचा ढिग केलेला पहायला मिळत आहे. परिणामी भाज्या महाग झाल्याचे पहायला मिळाले.

जिल्ह्यात कोरोना महामारीचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे शासनाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन सुरु केले आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या वेळेतच भाजीपाला व इतर किराणा दुकान चालू ठेवावे, असे आदेशित केले आहे. परंतु, भाजीपाला विकण्यासाठी वेळ कमी पडत आहे, असे भाजीपाला विक्रेत्यांचे म्हणणे आहे. जिल्हा प्रशासनाने लागू केलेली वेळ कमी असून ती वाढवून देवून गल्लोगल्ली भाजीपाला विकण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणीही काही व्यापाऱ्यांनी केली आहे. कांदा,लिंबू,कोथिंबीर,कद्दू, पालक सोडले मंडईत काकडी ३० रुपये किलो, टोमॅटो ४०, वांगे ३० रुपये, आद्रक ४० रुपये, भेंडी ४०, दोडके ३० तर कद्दू १० रुपये किलो दराने विकले गेले.

विक्रीअभावी भाज्यांचा ढिग

भाजी मंडईत सकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान बीट होते. सर्व छोटे-मोठे व्यापारी येथे शेतकऱ्यांनी आणलेल्या भाज्या खरेदीसाठी येतात. ठोक विक्रेते आधी भाज्या खरेदी करतात नंतर छोट्या व्यापाऱ्यांना भाज्या विक्री केल्या जातात. परंतु, २५ एप्रिलपासून मंडईतील व्यापाऱ्यांना भाजी विकण्यासाठी ११ वाजेची वेळ दिल्यामुळे भाज्यांचा ढिग साचत आहे. काही ठोक विक्रेते भाज्यांचा स्टॉक करुन ठेवतात. त्यामुळे छोट्या विक्रेत्यांना भाज्या वेळेवर मिळत नाहीत. आलेल्या पाऊली त्यांना परत जावे लागत आहे. शेतकऱ्यांनी आणलेला भाजीपाला सर्वच व्यापाऱ्यांना मिळावा यासाठी ठोक विक्रेत्यांनी पुढाकार घ्यावा, अशीही मागणी काहींनी केली.

प्रतिक्रिया

भाज्यांची आवक चांगली असली

आम्ही छोटे व्यापारी ठोक विक्रेत्यांकडून खरेदी करतो. या आठवड्यात भाजीपाला महाग मिळाला आहे. त्यामुळे नाईलाजास्तव आम्हालाही महागच विकावा लागत आहे. जिल्हा प्रशासनाने छोट्या विक्रेत्यांनाही जास्तीचा वेळ द्यावा.-शेख इरफान, भाजी विक्रेता

जिल्ह्यात फळांची आवक मोठ्या प्रमाणात आहे. परंतु, विकण्यासाठी वेळ व जागा नाही. कोरोनामुळे सकाळी ११ वाजेपर्यतच फळे विकावे लागत आहेत. कोणत्याही वेळी फळे विकल्यास दंड भरावा लागत आहे. सद्य:स्थितीत चिकू ६० रुपये किलो, अंगूर १२० रुपये, सफरचंद २२०, पपई, डाळिंब २०० रुपये किलो तर नारळ ६० रुपयास एक या प्रमाणे विक्री झाले.

- शेख अब्दुल बागवान, फळ विक्रेता