शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीत कृषी अधिकारी कार्यालयासमोर आंदोलकांनी उधळल्या नोटा

By रमेश वाबळे | Updated: May 22, 2023 16:25 IST

हिंगोलीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन; कीटकनाशक कंपन्यांवर कारवाईची मागणी

हिंगोली : अतिवृष्टी, अवकाळी, गारपीट अशा एकापाठोपाठ येणाऱ्या संकटांना तोंड देताना शेतकरी हैराण झाला आहे. असे असताना खरिपाच्या तोंडावर बोगस कीटकनाशक विक्रेत्या कंपन्यांचा शिरकाव झाला असून, ही कीटकनाशके फवारताना शेतकऱ्यांना विषबाधा होत आहे; परंतु त्या कंपन्यांवर कृषी विभाग कारवाई करीत नसल्याचा आरोप करीत २२ मे रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासमोर नोटा उधळल्या. पैसे घ्या; पण बोगस कंपन्यांवर कारवाई करा, अशी मागणी केली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी दुपारी १२ च्या सुमारास हिंगोली येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय गाठले. बोगस कीटकनाशक कंपन्यांची चौकशी करून कारवाई का केली जात नाही? असे विचारण्यात आले. जवळपास सातशेहून अधिक बोगस कंपन्या पिकांवर फवारणीसाठी कीटकनाशक विक्री करीत असल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला. ही कीटकनाशके फवारताना शेतकऱ्यांना विषबाधा होत आहे. त्यामुळे त्या कंपन्यांवर कारवाई करावी यासाठी वारंवार निवेदने देऊनही अभय का? देण्यात येते असा जाब विचारला. पैसे हवे असतील तर शेतकरी देतील; पण त्या कंपन्यांवर कारवाई करा असे म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे, गजानन कावरखे यांनी पैसे उधळले. या प्रकारामुळे कृषी अधीक्षक कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी कक्ष सोडून बाहेर आले होते. तर शेतकरीही मोठ्या संख्येने जमले होते. दोन दिवसांत कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.

महिन्यापूर्वी दिले होते निवेदन...हिंगोली जिल्ह्यात आंध्र प्रदेशातून काही कंपन्यांचे बनावट कीटकनाशक बाजारात विक्रीसाठी आल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे. जिल्ह्यात आलेल्या कीटकनाशकांचे नमुने तपासणीसाठी घेऊन प्रयोगशाळेत पाठवावेत त्यानंतर अप्रमाणित नमुने असलेल्या कंपन्यांकडे कारवाई करावी अशी मागणी केली. यासंदर्भात सुमारे एक महिन्यापूर्वी निवेदन दिले होते.

दागिने मोडून पैसे आणले...जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात नोटा उधळताना हे पैसे दागिने मोडून आणल्याचे आंदोलकांनी सांगितले. अतिवृष्टी, अवकाळीमुळे पिके हातची गेली आहेत. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे; परंतु कृषी विभागाकडून कारवाईसाठी वेळकाढू धोरण अवलंबिले जात असल्याचा आरोप केला.

माझोड येथील शेतकऱ्याला झाली होती विषबाधा...सेनगाव तालुक्यातील माझोड येथील शेतकरी दशरथ गजानन मुळे यांनी १६ मे रोजी फवारणी करताना सर्व सुरक्षा कवच वापरले; परंतु त्यांना विषबाधा झाली होती. मळमळ, भोवळ येत असल्याने त्यांच्यावर गोरेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात व हिंगोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात आले. यासंदर्भात त्यांनी १८ मे रोजी गोरेगाव पोलिस ठाण्यात संबंधित कंपनी व कीटकनाशक विक्रेत्यावर कारवाईची मागणी केली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीHingoliहिंगोली