शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
2
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
3
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
4
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
5
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
6
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
7
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
8
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
9
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
10
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
11
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
12
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
13
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
14
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
15
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
16
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
17
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान
18
भारत-पाक तणावादरम्यान सोन्या-चांदीचे दर आपटले; झाली मोठी घसरण, काय आहेत नवे दर?
19
Sanjay Singh : “पाकिस्तानने अमृतसर, होशियारपूरमध्ये क्षेपणास्त्रे डागण्याचा प्रयत्न केला, जो सैन्याने हाणून पाडला”

वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:51 IST

मुख्य रस्त्यावरील नाला बनला धोकादाायक कळमनुरी: शहरातील उपजिल्हा रुग्णालयाजवळ असलेला नाला गत काही दिवसांपासून धोकादायक बनला आहे. या नाल्याचे ...

मुख्य रस्त्यावरील नाला बनला धोकादाायक

कळमनुरी: शहरातील उपजिल्हा रुग्णालयाजवळ असलेला नाला गत काही दिवसांपासून धोकादायक बनला आहे. या नाल्याचे लोखंडी रॉडही निघून गेले आहेत. या भागातील नागिरक व वाहनचालकांनी संबंधित विभागाला वेळोवेळी सांगूनही नाल्याची दुरुस्ती केली नाही. मुख्य मार्गाच्या वरिष्ठांनी याची दखल घेऊन नाल्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

कळमनुरी तालुक्यात अवैध वाहतूक वाढली

कळमनुरी: तालुक्यातील आ. बाळापूर, डोंगरकडा, वारंगाफाटा, बोल्डा, सिंदगी, वाकोडी, मसोड, सालेगाव आदी मार्गावर अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाहनचालक क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेत आहेत. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. दुसरीकडे एस. टी. महामंडळाच्या उत्पन्नात घट होत आहे. संबंधित विभागाने याची दखल घेऊन तालुक्यातील अवैध वाहतूक बंद करावी, अशी मागणी सर्वसामान्यातून होत आहे.

नालीचे पाणी रस्त्यावर

वाहनचालक त्रस्त

औंढा नागनाथ: शहरातील प्रभाग १६ मधील सोनार गल्ली येथे रस्त्याच्या दोन्ही बाजूला नाल्या बांधल्या आहेत. परंतु, पाण्याचा मार्ग बरोबर काढला गेला नाही. त्यामुळे पाणी रस्त्यावर येत आहे. यामुळे या ठिकाणावरुन ये-जा करणाऱ्या नागिरका तसेच वाहनचालकांना पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे. नगरपरिषदेच्या संबंधित विभागाने याची दखल घाण पाण्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

बसस्थानक परिसरात वाहतुकीची कोंडी

औंढा नागनाथ: शहरातील बसस्थानक परिसरातील हॉटेल, पानटपऱ्या, दुकानांसमोर ग्रामीण भागातील तसेच शहरातील वाहनचालक वाहने अस्ताव्यस्तपणे उभी करीत आहेत. त्यामुळे बसस्थानक परिसरात वाहतुकीची कोंडी होत आहे. वाहतुकीच्या कोंडीमुळे रस्त्यावरुन ये-जा करण्यास अवघड होऊन बसत आहे. शहर वाहतूक शाखेने याची दखल घेऊन वाहतूक व्यवस्था सुरळीत करावी, अशी मागणी होत आहे.

शिरडशहापूर येथे दिवसाही दिवसे सुरु

शिरडशहापूर: औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर येथील जामा मस्जिद, झोपडपट्टी परिसरात दिवसाही दिवे सुरु आहेत. ग्रामपंचायतच्या संबंधित विभागाने याची दखल घेऊन दिवसा सुरु असलेले दिवे बंद करुन ज्या भागात दिवे नाहीत तेथे दिवे बसवावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

‘नव्याने गतिरोधक बसवावे’

हिंगोली: कयाधू नदी पुलाजवळील गतिरोधक हे उंच झाले असल्यामुळे बहुतांश वाहनचालक गतिरोधकाच्या बाजूने वाहने चालवित आहेत. यामुळे अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठांनी याची दखल घेऊन गतिरोधक नव्याने बसवावे, अशी मागणी होत आहे.