शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
2
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
3
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
4
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
5
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
6
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
7
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
8
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
9
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
10
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
11
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
12
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
13
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
14
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
15
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
16
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
17
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
18
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
19
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
20
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक

वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:51 IST

मुख्य रस्त्यावरील नाला बनला धोकादाायक कळमनुरी: शहरातील उपजिल्हा रुग्णालयाजवळ असलेला नाला गत काही दिवसांपासून धोकादायक बनला आहे. या नाल्याचे ...

मुख्य रस्त्यावरील नाला बनला धोकादाायक

कळमनुरी: शहरातील उपजिल्हा रुग्णालयाजवळ असलेला नाला गत काही दिवसांपासून धोकादायक बनला आहे. या नाल्याचे लोखंडी रॉडही निघून गेले आहेत. या भागातील नागिरक व वाहनचालकांनी संबंधित विभागाला वेळोवेळी सांगूनही नाल्याची दुरुस्ती केली नाही. मुख्य मार्गाच्या वरिष्ठांनी याची दखल घेऊन नाल्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

कळमनुरी तालुक्यात अवैध वाहतूक वाढली

कळमनुरी: तालुक्यातील आ. बाळापूर, डोंगरकडा, वारंगाफाटा, बोल्डा, सिंदगी, वाकोडी, मसोड, सालेगाव आदी मार्गावर अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाहनचालक क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेत आहेत. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. दुसरीकडे एस. टी. महामंडळाच्या उत्पन्नात घट होत आहे. संबंधित विभागाने याची दखल घेऊन तालुक्यातील अवैध वाहतूक बंद करावी, अशी मागणी सर्वसामान्यातून होत आहे.

नालीचे पाणी रस्त्यावर

वाहनचालक त्रस्त

औंढा नागनाथ: शहरातील प्रभाग १६ मधील सोनार गल्ली येथे रस्त्याच्या दोन्ही बाजूला नाल्या बांधल्या आहेत. परंतु, पाण्याचा मार्ग बरोबर काढला गेला नाही. त्यामुळे पाणी रस्त्यावर येत आहे. यामुळे या ठिकाणावरुन ये-जा करणाऱ्या नागिरका तसेच वाहनचालकांना पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे. नगरपरिषदेच्या संबंधित विभागाने याची दखल घाण पाण्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

बसस्थानक परिसरात वाहतुकीची कोंडी

औंढा नागनाथ: शहरातील बसस्थानक परिसरातील हॉटेल, पानटपऱ्या, दुकानांसमोर ग्रामीण भागातील तसेच शहरातील वाहनचालक वाहने अस्ताव्यस्तपणे उभी करीत आहेत. त्यामुळे बसस्थानक परिसरात वाहतुकीची कोंडी होत आहे. वाहतुकीच्या कोंडीमुळे रस्त्यावरुन ये-जा करण्यास अवघड होऊन बसत आहे. शहर वाहतूक शाखेने याची दखल घेऊन वाहतूक व्यवस्था सुरळीत करावी, अशी मागणी होत आहे.

शिरडशहापूर येथे दिवसाही दिवसे सुरु

शिरडशहापूर: औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर येथील जामा मस्जिद, झोपडपट्टी परिसरात दिवसाही दिवे सुरु आहेत. ग्रामपंचायतच्या संबंधित विभागाने याची दखल घेऊन दिवसा सुरु असलेले दिवे बंद करुन ज्या भागात दिवे नाहीत तेथे दिवे बसवावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

‘नव्याने गतिरोधक बसवावे’

हिंगोली: कयाधू नदी पुलाजवळील गतिरोधक हे उंच झाले असल्यामुळे बहुतांश वाहनचालक गतिरोधकाच्या बाजूने वाहने चालवित आहेत. यामुळे अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठांनी याची दखल घेऊन गतिरोधक नव्याने बसवावे, अशी मागणी होत आहे.