शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:51 IST

मुख्य रस्त्यावरील नाला बनला धोकादाायक कळमनुरी: शहरातील उपजिल्हा रुग्णालयाजवळ असलेला नाला गत काही दिवसांपासून धोकादायक बनला आहे. या नाल्याचे ...

मुख्य रस्त्यावरील नाला बनला धोकादाायक

कळमनुरी: शहरातील उपजिल्हा रुग्णालयाजवळ असलेला नाला गत काही दिवसांपासून धोकादायक बनला आहे. या नाल्याचे लोखंडी रॉडही निघून गेले आहेत. या भागातील नागिरक व वाहनचालकांनी संबंधित विभागाला वेळोवेळी सांगूनही नाल्याची दुरुस्ती केली नाही. मुख्य मार्गाच्या वरिष्ठांनी याची दखल घेऊन नाल्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

कळमनुरी तालुक्यात अवैध वाहतूक वाढली

कळमनुरी: तालुक्यातील आ. बाळापूर, डोंगरकडा, वारंगाफाटा, बोल्डा, सिंदगी, वाकोडी, मसोड, सालेगाव आदी मार्गावर अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाहनचालक क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेत आहेत. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. दुसरीकडे एस. टी. महामंडळाच्या उत्पन्नात घट होत आहे. संबंधित विभागाने याची दखल घेऊन तालुक्यातील अवैध वाहतूक बंद करावी, अशी मागणी सर्वसामान्यातून होत आहे.

नालीचे पाणी रस्त्यावर

वाहनचालक त्रस्त

औंढा नागनाथ: शहरातील प्रभाग १६ मधील सोनार गल्ली येथे रस्त्याच्या दोन्ही बाजूला नाल्या बांधल्या आहेत. परंतु, पाण्याचा मार्ग बरोबर काढला गेला नाही. त्यामुळे पाणी रस्त्यावर येत आहे. यामुळे या ठिकाणावरुन ये-जा करणाऱ्या नागिरका तसेच वाहनचालकांना पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे. नगरपरिषदेच्या संबंधित विभागाने याची दखल घाण पाण्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

बसस्थानक परिसरात वाहतुकीची कोंडी

औंढा नागनाथ: शहरातील बसस्थानक परिसरातील हॉटेल, पानटपऱ्या, दुकानांसमोर ग्रामीण भागातील तसेच शहरातील वाहनचालक वाहने अस्ताव्यस्तपणे उभी करीत आहेत. त्यामुळे बसस्थानक परिसरात वाहतुकीची कोंडी होत आहे. वाहतुकीच्या कोंडीमुळे रस्त्यावरुन ये-जा करण्यास अवघड होऊन बसत आहे. शहर वाहतूक शाखेने याची दखल घेऊन वाहतूक व्यवस्था सुरळीत करावी, अशी मागणी होत आहे.

शिरडशहापूर येथे दिवसाही दिवसे सुरु

शिरडशहापूर: औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर येथील जामा मस्जिद, झोपडपट्टी परिसरात दिवसाही दिवे सुरु आहेत. ग्रामपंचायतच्या संबंधित विभागाने याची दखल घेऊन दिवसा सुरु असलेले दिवे बंद करुन ज्या भागात दिवे नाहीत तेथे दिवे बसवावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

‘नव्याने गतिरोधक बसवावे’

हिंगोली: कयाधू नदी पुलाजवळील गतिरोधक हे उंच झाले असल्यामुळे बहुतांश वाहनचालक गतिरोधकाच्या बाजूने वाहने चालवित आहेत. यामुळे अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठांनी याची दखल घेऊन गतिरोधक नव्याने बसवावे, अशी मागणी होत आहे.