शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

कर्णकर्कश आवाज बंद करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:16 IST

फळगाड्यामुळे वाहतुकीस अडथळा हिंगोली : शहरातील बसस्थानक ते गांधी चौक दरम्यान काही ठिकाणी रस्त्याच्या मधोमध फळगाडे लावून फळांची विक्री ...

फळगाड्यामुळे वाहतुकीस अडथळा

हिंगोली : शहरातील बसस्थानक ते गांधी चौक दरम्यान काही ठिकाणी रस्त्याच्या मधोमध फळगाडे लावून फळांची विक्री केली जात आहे. या फळगाड्यामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. इतर वाहनांना रस्ता काढताना त्रास होत आहे. नगरपरिषदेच्या संबंधित विभागाने दखल घेऊन फळगाडीचालकांना इतरत्र जागा द्यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

तुरीवर अळीचा प्रादुर्भाव; शेतकरी चिंतातूर

कळमनुरी: तालुक्यातील अनेक गावांमध्ये तुरीवर अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतातूर झाला आहे. मागील आठ दिवसांपासून थंडी तसेच ढगाळ वातावरण पडत असल्यामुळे तूर पीक धोक्यात आले आहे. कृषी विभागाने तूर उत्पादक शेतकऱ्यांना पिकावर पडत असलेल्या रोगाबाबत मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढिगारे

हिंगोली : शहरातील तोफखाना, शास्त्रीनगर, इंदिरानगर आदी भागामध्ये रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढीग साचलेले पहायला मिळत आहेत. साचलेला कचरा घंटागाडी घेऊन जात नाही, अशी नागरिकांची तक्रार आहे. नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाने याची दखल घेऊन घंटागाडी या भागामध्ये पाठवावी व कचरा उचलून न्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

डिग्रस फाटा येथे गतिरोधक बसविण्याची मागणी

डिग्रस कऱ्हाळे: हिंगोली तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे फाटा येथे वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी वाहने वेगाने चालविली जात आहेत. गतिरोधक नसल्यामुळे अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. संबंधित विभागाने वाहनांची संख्या लक्षात घेऊन डिग्रस कऱ्हाळे फाटा येथे गतिरोधक बसवावे, अशी मागणी वाहनचालकांतून होत आहे.

विजेच्या लपंडावाला शेतकरी वैतागले

कळमनुरी: मागील पंधरा दिवसांपासून तालुक्यातील ग्रामीण भागात विजेचा लपंडाव नित्याचाच झाला आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण चांगले राहिल्याने विहीर व तलावांना पाणी भरपूर प्रमाणात आहे. परंतु, वीज खंडित होत असल्यामुळे पाणी पिकांना देता येत नाही. त्यामुळे पिके कोमेजून जात आहेत. महावितरण कंपनीच्या वरिष्ठांनी याची दखल घेऊन ग्रामीण भागात वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

बंदी असतानाही जड वाहने शहरात

हिंगोली : जड वाहनांना शहरात बंदी असतानाही काही वाहनचालक नियमांचा भंग करीत जड वाहने शहरात घेऊन येत आहेत. यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे. शहर वाहतूक शाखेने याची दखल घेऊन जड वाहनांना शहरात येण्यास बंदी घालावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे.

रस्त्यावर खड्डे; वाहनचालक त्रस्त

कळमनुरी : कळमनुरी ते आखाडा बाळापूर मुख्य रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे वाहनचालकांचे अतोनात नुकसान होत आहे. विशेष म्हणजे खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाणही वाढत आहे. वेळोवेळी संबंधित विभागाला सांगूनही अद्याप कोणीही लक्ष दिले नाही. वेळीच लक्ष देऊन वाहनचालकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.