शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा निकाल लागताच राज ठाकरे वर्षा निवासस्थानी; CM देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
4
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
5
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
7
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
8
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
9
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
10
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
11
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
12
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
13
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
14
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
15
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
16
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
17
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
18
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
19
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
20
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...

गतिरोधक बसविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:33 IST

‘पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी’ हिंगोली : येथील बसस्थानकात मागील काही महिन्यांपासून प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली नाही. प्रवाशांना ...

‘पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी’

हिंगोली : येथील बसस्थानकात मागील काही महिन्यांपासून प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली नाही. प्रवाशांना पाणी बाजूच्या हॉटेलमधून विकत आणावे लागत आहे. पिण्याचे पाणी बसस्थानकात उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आगार प्रमुखांकडे करण्यात आली; परंतु अजून तरी पाण्याची सोय उपलब्ध करून दिली नाही. उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन प्रवाशांसाठी पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

खंडित वीजपुरवठ्यामुळे शेतकरी त्रस्त

कळमनुरी : तालुक्यातील ग्रामीण भागात वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढत आहे. शेतात पाणी असूनही वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे पिकांना देता येत नाही. परिणामी पिके वाळून जात आहेत. महावितरण कंपनीने याची दखल घेऊन ग्रामीण भागातील वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

कळमनुरी शहरात अनियमित पाणीपुरवठा

कळमनुरी : शहरातील रेणुकानगर, गणेशनगर, भोई गल्ली, ब्राह्मणगल्ली, सहयोगनगर आदी नगरांमध्ये पंधरा-वीस दिवसांपासून पाणीपुरवठा अनियमित होत आहे, तसेच पाणी कमी प्रमाणात येत आहे. वेळेवर पाणी सोडण्याबाबत नगर परिषदेच्या संंबंधित विभागाला सांगण्यात आले; परंतु अद्यापतरी लक्ष दिले नाही. उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन शहरात पाणीपुरवठा वेळेवर करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

बसस्थानकात कचऱ्याचे ढीग

कळमनुरी : येथील बसस्थानकात मागील काही दिवसांपासून कचऱ्याचे ढीग साचलेले पाहायला मिळत आहेत. जागोजागी साचलेला कचरा उडून प्रवाशांच्या अंगावर येत आहे. कचऱ्यामुळे डासांचे प्रमाणही वाढले आहे. प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन आगार प्रमुखांनी बसस्थानकात स्वच्छता मोहीम राबविणे गरजेचे आहे.

नव्याने गतिरोधक टाकण्याची मागणी

हिंगोली : शहरातील खटकाळी भागातील गतिरोधक

थोडे उंच झाले आहे. काही दुचाकीचालक गतिरोधकाच्या बाजूने ये-जा करीत आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना दुचाकी अंगावर येण्याची भीती वाटत आहे. संबंधित विभागाने याची दखल घेऊन गतिरोधक नव्याने टाकावे, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.

अस्ताव्यस्त वाहनामुळे वाहतुकीचा खोळंबा

हिंगोली : शहरातील कापड गल्ली भागात वाहने अस्ताव्यस्त उभी केली जात आहेत. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे. वाहने उभी करण्यावरून बहुतांश वेळा वादही निर्माणही होत आहेत. शहर वाहतूक शाखेने याची दखल घेऊन वाहतूक व्यवस्था सुरळीत करावी, अशी मागणी या भागातील व्यापाऱ्यांनी केली आहे.