शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
4
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
5
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
6
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
7
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
8
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
9
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
10
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
11
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
12
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
13
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
14
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
15
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
16
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
17
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
18
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
19
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
20
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण

गतिरोधक बसविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:33 IST

‘पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी’ हिंगोली : येथील बसस्थानकात मागील काही महिन्यांपासून प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली नाही. प्रवाशांना ...

‘पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी’

हिंगोली : येथील बसस्थानकात मागील काही महिन्यांपासून प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली नाही. प्रवाशांना पाणी बाजूच्या हॉटेलमधून विकत आणावे लागत आहे. पिण्याचे पाणी बसस्थानकात उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आगार प्रमुखांकडे करण्यात आली; परंतु अजून तरी पाण्याची सोय उपलब्ध करून दिली नाही. उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन प्रवाशांसाठी पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

खंडित वीजपुरवठ्यामुळे शेतकरी त्रस्त

कळमनुरी : तालुक्यातील ग्रामीण भागात वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढत आहे. शेतात पाणी असूनही वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे पिकांना देता येत नाही. परिणामी पिके वाळून जात आहेत. महावितरण कंपनीने याची दखल घेऊन ग्रामीण भागातील वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

कळमनुरी शहरात अनियमित पाणीपुरवठा

कळमनुरी : शहरातील रेणुकानगर, गणेशनगर, भोई गल्ली, ब्राह्मणगल्ली, सहयोगनगर आदी नगरांमध्ये पंधरा-वीस दिवसांपासून पाणीपुरवठा अनियमित होत आहे, तसेच पाणी कमी प्रमाणात येत आहे. वेळेवर पाणी सोडण्याबाबत नगर परिषदेच्या संंबंधित विभागाला सांगण्यात आले; परंतु अद्यापतरी लक्ष दिले नाही. उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन शहरात पाणीपुरवठा वेळेवर करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

बसस्थानकात कचऱ्याचे ढीग

कळमनुरी : येथील बसस्थानकात मागील काही दिवसांपासून कचऱ्याचे ढीग साचलेले पाहायला मिळत आहेत. जागोजागी साचलेला कचरा उडून प्रवाशांच्या अंगावर येत आहे. कचऱ्यामुळे डासांचे प्रमाणही वाढले आहे. प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन आगार प्रमुखांनी बसस्थानकात स्वच्छता मोहीम राबविणे गरजेचे आहे.

नव्याने गतिरोधक टाकण्याची मागणी

हिंगोली : शहरातील खटकाळी भागातील गतिरोधक

थोडे उंच झाले आहे. काही दुचाकीचालक गतिरोधकाच्या बाजूने ये-जा करीत आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना दुचाकी अंगावर येण्याची भीती वाटत आहे. संबंधित विभागाने याची दखल घेऊन गतिरोधक नव्याने टाकावे, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.

अस्ताव्यस्त वाहनामुळे वाहतुकीचा खोळंबा

हिंगोली : शहरातील कापड गल्ली भागात वाहने अस्ताव्यस्त उभी केली जात आहेत. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे. वाहने उभी करण्यावरून बहुतांश वेळा वादही निर्माणही होत आहेत. शहर वाहतूक शाखेने याची दखल घेऊन वाहतूक व्यवस्था सुरळीत करावी, अशी मागणी या भागातील व्यापाऱ्यांनी केली आहे.