शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
3
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
4
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
5
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
6
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
7
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
8
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
9
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
10
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
11
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
12
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
13
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
14
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
15
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
16
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
17
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
18
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
19
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
20
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय

प्रवासी निवारे उभारण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:55 IST

तीळ पेरणीकडे शेतकऱ्यांचा कल हिंगोली : जिल्हाभरात खरीप हंगामात पुरेशा प्रमाणावर पाऊस झाला. त्यामुळे बहुतांश जलसाठे भरले होते. आता ...

तीळ पेरणीकडे शेतकऱ्यांचा कल

हिंगोली : जिल्हाभरात खरीप हंगामात पुरेशा प्रमाणावर पाऊस झाला. त्यामुळे बहुतांश जलसाठे भरले होते. आता पाणीसाठा कमी झाला असला तरी यात बऱ्यापैकी पाणी उपलब्ध आहे. तसेच अनेकांच्या बोअर, विहिरींना पाणी आहे. आता कापूस वेचणी संपल्याने शेतकरी आता तीळ पीक घेत असल्याचे चित्र आहे. अनेकांनी तिळाचा पेरा केला असून पाणी देणे सुरू आहे.

ढगाळ वातावरणाचा आंबा पिकास फटका

हिंगोली : जिल्हाभरात मागील तीन ते चार दिवसांपासून ढगाळ वातावरण राहत आहे. १८ व १९ फेब्रुवारी रोजी अनेक ठिकाणी पाऊसही झाला आहे. यामुळे हरभरा, गहू पिकांचे मोठे नुकसान झाले असले तरी ढगाळ वातावरणाचा फटका आंबा या फळ पिकासही बसला आहे. यामुळे फूल मोहर गळत असून उत्पादनात घट होण्याची भीती आंबा उत्पादक शेतकरी व्यक्त करीत आहेत.

माळरानावर बहरली रोपटे

हिंगोली: कळमनुरी तालुक्यातील जरोडा, येलकी परिसरात उभारण्यात आलेल्या सशस्त्र सीमा बल परीसरातील माळरानावर वन विभागाच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले होते. आता ही रोपटे चांगल्या स्थितीत आहेत. वन विभागाच्या वतीने या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमले असून रोपट्यांची देखभाल केली जात आहे.

गतिरोधक बनले धोकादायक

हिंगोली: शहरातील अकोला बायपासजवळ गतिरोधक टाकण्यात आले आहेत. मात्र गतिरोधकांची उंची मोठी असल्याने अनेक दुचाकी वाहनचालक गतिरोधकाला वळण घालून वाहने नेत आहेत. गतिरोधकाला कट मारण्याच्या नादात अपघात होण्याची शक्यता बळावत आहे. अपघात टाळण्यासाठी गतिरोधक बसविण्यात आले उंची जास्त असल्याने ही गतिरोधक गैरसोयीचे ठरत आहे.

खिळखिळ्या वाहनांतून गौण खनिजाची वाहतूक

हिंगोली: जिल्ह्यात ग्रामीण भागात अनेक ठिकाणी अवैध गौण खनिजाची वाहतूक हेात आहे. यामुळे शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. त्यात गौण खनिजाची खिळखिळ्या वाहनातून वाहतूक होत असल्याने इतर वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहेत. कधी अपघात होईल, याचा नेम नसल्याने अशा वाहनांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

बस सुरू करण्याची मागणी

कळमनुरी: कळमनुरी तालुक्याचा विस्तार मोठा आहे. ग्रामीण भागातील बहुतांश ग्रामस्थ कळमनुरी येथे विविध कार्यालयात येतात. कळमनुरी येथे येण्यासाठी प्रवासी वाहने असली तरी जाताना सायंकाळी परत जाताना प्रवासी वाहने मोजकीच आहेत. रात्री उशिर झाल्यास एकही प्रवासी वाहन नाही. त्यामुळे ग्रामीण भागात बसेस सोडण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे.