शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
3
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
4
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
5
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
6
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
7
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
8
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
9
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास
10
'बिग बॉस १९' मध्ये काही आठवड्यांसाठीच दिसणार सलमान खान? चाहत्यांमध्ये निराशा
11
तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत, अलाहाबाद प्रकरणी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अखेर केला हस्तक्षेप
12
हरितालिका २०२५: हरितालिकेचे व्रत कुणी करू नये? पाहा, महती, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता
13
SBI केवळ या नंबर्सवरुन करतं ग्राहकांना फोन; अन्य कोणत्याही क्रमांवरुन कॉल आल्यास व्हा सावध, काय आहे प्रकरण?
14
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
15
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
16
'किंग कोहली' परत येतोय... ऑस्ट्रेलियाची धुलाई करण्यासाठी विराटची 'लॉर्ड्स'वर नेट प्रॅक्टिस
17
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
18
२ शेअर्सवर मिळणार २५ मोफत! 'या' ८ कंपन्या देणार बोनस शेअर्स, वाचा रेकॉर्ड डेटची माहिती
19
Share Market Opening 25 August, 2025: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; मोठ्या तेजीसह उघडले 'या' कंपन्यांचे शेअर्स
20
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा

प्रवासी निवारे उभारण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:55 IST

तीळ पेरणीकडे शेतकऱ्यांचा कल हिंगोली : जिल्हाभरात खरीप हंगामात पुरेशा प्रमाणावर पाऊस झाला. त्यामुळे बहुतांश जलसाठे भरले होते. आता ...

तीळ पेरणीकडे शेतकऱ्यांचा कल

हिंगोली : जिल्हाभरात खरीप हंगामात पुरेशा प्रमाणावर पाऊस झाला. त्यामुळे बहुतांश जलसाठे भरले होते. आता पाणीसाठा कमी झाला असला तरी यात बऱ्यापैकी पाणी उपलब्ध आहे. तसेच अनेकांच्या बोअर, विहिरींना पाणी आहे. आता कापूस वेचणी संपल्याने शेतकरी आता तीळ पीक घेत असल्याचे चित्र आहे. अनेकांनी तिळाचा पेरा केला असून पाणी देणे सुरू आहे.

ढगाळ वातावरणाचा आंबा पिकास फटका

हिंगोली : जिल्हाभरात मागील तीन ते चार दिवसांपासून ढगाळ वातावरण राहत आहे. १८ व १९ फेब्रुवारी रोजी अनेक ठिकाणी पाऊसही झाला आहे. यामुळे हरभरा, गहू पिकांचे मोठे नुकसान झाले असले तरी ढगाळ वातावरणाचा फटका आंबा या फळ पिकासही बसला आहे. यामुळे फूल मोहर गळत असून उत्पादनात घट होण्याची भीती आंबा उत्पादक शेतकरी व्यक्त करीत आहेत.

माळरानावर बहरली रोपटे

हिंगोली: कळमनुरी तालुक्यातील जरोडा, येलकी परिसरात उभारण्यात आलेल्या सशस्त्र सीमा बल परीसरातील माळरानावर वन विभागाच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले होते. आता ही रोपटे चांगल्या स्थितीत आहेत. वन विभागाच्या वतीने या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमले असून रोपट्यांची देखभाल केली जात आहे.

गतिरोधक बनले धोकादायक

हिंगोली: शहरातील अकोला बायपासजवळ गतिरोधक टाकण्यात आले आहेत. मात्र गतिरोधकांची उंची मोठी असल्याने अनेक दुचाकी वाहनचालक गतिरोधकाला वळण घालून वाहने नेत आहेत. गतिरोधकाला कट मारण्याच्या नादात अपघात होण्याची शक्यता बळावत आहे. अपघात टाळण्यासाठी गतिरोधक बसविण्यात आले उंची जास्त असल्याने ही गतिरोधक गैरसोयीचे ठरत आहे.

खिळखिळ्या वाहनांतून गौण खनिजाची वाहतूक

हिंगोली: जिल्ह्यात ग्रामीण भागात अनेक ठिकाणी अवैध गौण खनिजाची वाहतूक हेात आहे. यामुळे शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. त्यात गौण खनिजाची खिळखिळ्या वाहनातून वाहतूक होत असल्याने इतर वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहेत. कधी अपघात होईल, याचा नेम नसल्याने अशा वाहनांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

बस सुरू करण्याची मागणी

कळमनुरी: कळमनुरी तालुक्याचा विस्तार मोठा आहे. ग्रामीण भागातील बहुतांश ग्रामस्थ कळमनुरी येथे विविध कार्यालयात येतात. कळमनुरी येथे येण्यासाठी प्रवासी वाहने असली तरी जाताना सायंकाळी परत जाताना प्रवासी वाहने मोजकीच आहेत. रात्री उशिर झाल्यास एकही प्रवासी वाहन नाही. त्यामुळे ग्रामीण भागात बसेस सोडण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे.