शहरं
Join us  
Trending Stories
1
Investment Tips by Robert Kiyosaki : 'महामंदी' येणार? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा इशारा! म्हणाले फक्त 'या' गोष्टीच तुमची संपत्ती वाचवतील
2
"सुप्रिया सुळेंची केंद्रात मंत्री होण्याची तीव्र इच्छा, शरद पवार दुसऱ्या पक्षात जाताना दिसतील"; संजय शिरसाटांचं मोठं भाकित
3
आठवडाभराने करणार होता प्रपोज, पण..., इस्राइली दूतावासातील कर्मचाऱ्यांची प्रेमकहाणी राहिली अधुरी 
4
IPL 2025: पाकिस्तानला रडवणाऱ्या तगड्या बॅट्समनची RCB मध्ये 'एन्ट्री'; किती मिळाले पैसे?
5
"माझी आई फुकट आणायची"; परदेशात ४ हजारांना विकली जाणारी बॅग पाहताच नेटकरी सुसाट
6
असले नालायक लोक माझ्या पक्षात नको; पळून पळून जाणार कुठं? दोषींवर कारवाई होणार - अजित पवार
7
बापरे! ७ महिन्यांत २५ लग्न केली, नवरीने सुहागरात्रीनंतर प्रत्येकाला लुटले; कारनामे ऐकून सर्वांनाच धक्का बसला
8
MI vs DC: मुंबईनं सामना जिंकला अन् मालकीण निता अंबानी यांनी प्रेक्षकांचे मन! पाहा फोटो
9
'संघराज्य रचनेचा अनादर, ED ने सर्व मर्यादा ओलांडल्या...', सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
10
दानिश निघाला ISI एजंट, दिल्लीत बसून करायचा हेरगिरी; ज्योती मल्होत्रा प्रकरणात मोठा खुलासा
11
Video - घरातून बाहेर पडला अन् चालतानाच खाली कोसळला; २५ वर्षीय तरुणाचा अचानक मृत्यू
12
नका हो, तीन मुलांच्या आईसोबत माझे लग्न लावू नका, मी तर...; गावकऱ्यांनी काही ऐकले नाही, पठ्ठ्या लिव्ह इनमध्ये राहत होता... 
13
Video : घरात लाईट नाही म्हणून एटीएममध्येच थाटला संसार; सोशल मीडियावर व्हायरल होतोय व्हिडीओ
14
Vaishnavi Hagwane : वैष्णवीचा नवरा शशांककडून वहिनीलाही मारहाण; मयूरीच्या भावाने CCTV फुटेज दाखवले
15
Jyoti Malhotra : पहलगाम हल्ल्यादरम्यान कोणाच्या संपर्कात होती? ज्योती मल्होत्राबद्दल खळबळजनक खुलासा
16
"सिंदूर स्फोटक बनतं तेव्हा...’’ पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाकिस्तानला पुन्हा इशारा 
17
IPL संपताच वैभव सूर्यवंशीला मिळाले 'मुंबईकर' कोच; नव्या प्रशिक्षकांना किती मिळणार पगार?
18
"एका मुर्ख महिलेसाठी तो...", मराठी अभिनेत्रीसोबत गोविंदाच्या अफेअरच्या चर्चा, पत्नीने सोडलं मौन
19
३०,००० क्षमतेचे हॉस्टेल, ३००० कोटींची गुंतवणूक! ट्रम्प बघतच राहिले, टीम कुक 'मेक इन इंडिया'वर फिदा
20
माझ्या नसांमध्ये रक्त नाही, गरम सिंदूर...आता फक्त PoK..; पीएम मोदींचा पाकिस्तानला थेट इशारा

गणित, भौतिकशास्त्राला वगळण्याचा निर्णय चुकीचा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:30 IST

हिंगोली : ऑल इंडिया कौन्सिल फाॅर टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई) ने अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी भौतिकशास्त्र व गणित हे विषय वगळले ...

हिंगोली : ऑल इंडिया कौन्सिल फाॅर टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई) ने अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी भौतिकशास्त्र व गणित हे विषय वगळले आहेत. मात्र अभियांत्रिकीचा पायाच असणारे विषय वगळले तर अभियांत्रिकीचे शिक्षण घ्यायचे कसे? असा सवाल जाणकार व्यक्त करीत आहेत. तर विद्यार्थ्यांमधून मात्र संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. भौतिकशास्त्र, गणित, रसायनशास्त्र (पीसीएम) विषय घेऊन बारावी उत्तीर्ण झालेला विद्यार्थी अभियांत्रिकीसाठी प्रवेश घेऊ शकत होता. आता अभियांत्रिकीला प्रवेश घेण्यासाठी गणित व भौतिकशास्त्र हे विषय एआयसीटीईने वगळले आहेत. गणित हा विषय अभियांत्रिकीचा पाया आहे. अभियांत्रिकीच्या जागा भरावयाच्या म्हणून घेतलेला हा निर्णय धोकादायक असून एक ते दोन बॅचेस पूर्ण झाल्यानंतर हा अभ्यासक्रम उपयुक्त आहे की नाही हे समजेल, असे जाणकार मत व्यक्त करीत आहेत. शिक्षण क्षेत्रातील जाणकार नाराजी व्यक्त करीत असले तरी विद्यार्थ्यांमधून मात्र संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. हा निर्णय चुकीचा असल्याचे काही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. तर मेडिकल प्रवेशाची संधी हुकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय योग्यच असल्याचे काही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

अभियांत्रिकीसाठी गणित व भौतिकशास्त्र हे विषय महत्त्वाचे आहेत. गणित विषयाशिवाय अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण होऊच शकत नाही. त्यामुळे अभियांत्रिकीला प्रवेश मिळाल्यानंतर गणित विषयाचे जादा वर्ग घेणार आहेत का? बारावी बोर्डाकडूनही तशी तयारी केली जाणार आहे का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. गणित हा विषय वगळण्याचा निर्णय सध्या तरी चुकीचा वाटतोय.

-प्रा. एस.आर. उपरे,

अभियांत्रिकीसाठी गणित व भौतिकशास्त्र हे विषय महत्त्वाचे आहेत. एआयसीटीई ने घेतलेला निर्णय चुकीचा असून भविष्यात गणित विषयालाही फटका बसू शकतो. अशा निर्णयामुळे दहावीचे विद्यार्थीही गणित विषयच नको, अशी मागणी करतील. त्यामुळे अभियांत्रिकीसाठी गणित व भौतिकशास्त्र हे विषय कायम ठेवावेत.

-प्रा. आर. ए. गायकवाड

गणित व भौतिकशास्त्राशिवाय अभियांत्रिकेचे शिक्षण पूर्ण होऊच शकत नाही. त्यामुळे हा निर्णय बदलून अभियांत्रिकीसाठी हे विषय कायम ठेवावेत. ज्या विद्यार्थ्यांना गणित व भौतिकशास्त्र हे विषय अवघड वाटतात त्यांना इतरही शाखेत प्रवेश घेऊन शिक्षण पूर्ण करता येऊ शकते.

-तेजस्वीनी सितापराव, विद्यार्थीनी

मेडिकलकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांची मेडिकलची संधी हुकली तर अशा विद्यार्थ्यांचा कल अभियांत्रिकीकडे असतो. पूर्वी मेडिकलची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीची संधी मिळत नव्हती. आता या निर्णयामुळे मेडिकलची संधी हुकलेल्या विद्यार्थ्यांनाही अभियांत्रिकीसाठी प्रवेश मिळण्यास मदत होणार आहे.

-शुभम सावके, अभियांत्रिकी विद्यार्थी

जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची अभियांत्रिकीला पसंती

जिल्ह्यात एकमेव अभियांत्रिकी कॉलेज होते. मात्र यामध्ये आता प्रवेश दिले जात नसल्याचे माहिती विद्यार्थ्यांमधून मिळत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थी अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्यासाठी दुसऱ्या जिल्ह्यात जात आहेत. जिल्ह्यातही अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे.