शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

मुख्य भाजीमंडईचे विकेंद्रीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:26 IST

हिंगोली : शहरातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शहरातील मुख्य भाजीमंडईचे विकेंद्रीकरण करण्याचा निर्णय नगरपालिकेने घेतला आहे. ...

हिंगोली : शहरातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शहरातील मुख्य भाजीमंडईचे विकेंद्रीकरण करण्याचा निर्णय नगरपालिकेने घेतला आहे. त्यानुसार गर्दी टाळण्यासाठी शहरात फळ भाजीविक्रेत्यांसह शेतकऱ्यांना आठ ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली आहे. संचारबंदी शिथिल झाल्यानंतर येथून व्यवहार चालणार असून, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पथकांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांनी दिली.

जिल्ह्यासह हिंगोली शहरातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले होते. ४ एप्रिल रोजी संचारबंदीची मुदत संपली असून, संचारबंदी शिथिल झाल्यानंतर मुख्य बाजारपेठेत गर्दी होऊन कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरातील मुख्य भाजीमंडईमध्येही होणारी गर्दी टाळण्यासाठी नगरपालिकेने उपाययोजना आखल्या आहेत. शहरात आठ ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली असून, यात सहा ठिकाणी फळ-भाजीविक्रेत्यांना, तर दोन ठिकाणी विकेल ते पिकेल या योजनेंतर्गत शेतकऱ्यांसाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. या ठिकाणी विक्रेत्यांना बसण्यासाठी तसेच ग्राहकांना उभे राहण्यासाठी वर्तुळे आखण्यात आली आहेत. विक्रेते व ग्राहकांची गर्दी होणार नाही, नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घेण्यासाठी सहा पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मुख्य भाजीमंडईमधील स्थायी दुकाने वगळता इतर फळ-भाजीविक्रेते, फेरीवाले हे भाजीमंडईमधील रोडवर किंवा रोडलगत व्यवसाय करणार नाही, याबाबत दैनंदिन पाहणी करण्यासाठी एका पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

फळ-भाजीविक्रेत्यांसाठी जागा

-जिल्हा परिषद बहुविध प्रशाला मैदान

-खटकाळी बायपास परिसर रोडलगत

-रेल्वे स्टेशन मैदान

-नवीन नगर पालिका इमारत ते बिरसा मुंडा चौकापर्यंत डाव्या बाजूच्या रोडलगत

-जिल्हा परिषद गणेशवाडी शाळेलगतचा रोड

-स्व. गोपीनाथराव मुंडे शेतकरी सभागृहाच्या संरक्षण भिंतीलगत, मंगळवारा

विकेल ते पिकेल योजनेंतर्गत शेतकऱ्यांसाठी जागा

-अग्रसेन चौक ते एमजेपी टँकरोड डाव्या बाजूला रस्त्याच्या लगत

-तहसील कार्यालय सुरक्षा भिंतीलगत

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर होणार दंडात्मक कारवाई

संचारबंदी शिथिल झाल्यानंतरही नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नगरपालिकेच्या वतीने दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. या काळातही व्यावसायिक, ग्राहकांना नियमित मास्कचा वापर, सुरक्षित अंतर आदी नियमांचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्याना व्यापारी, ग्राहकांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचेही नगरपालिकेने स्पष्ट केले आहे.

फोटो: