शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

हिंगोली जिल्ह्यात ५७0 कोटींपर्यंत जाणार शेतकरी कर्जमुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 20:59 IST

आता ४८१६ जणांचेच बँक खाते आधारशी लिंक करणे बाकी आहे.

ठळक मुद्दे९५ टक्के बँक खाते लिंक साडेचार हजार बँकखाते शिल्लक

हिंगोली : जिल्ह्यात म.ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेत पात्र ठरलेल्या १ लाख ९ हजार ४0४ खातेदार शेतकऱ्यांपैकी १ लाख ४ हजार शेतकऱ्यांनी आधार लिकींग केले आहे. आता केवळ ४ हजार ८१६ शेतकऱ्यांचेच बँक खाते आधार लिंक होणे बाकी आहे. या खातेदारांना ५७0 कोटी रुपयांपर्यंतची कर्जमाफी मिळण्याचा अंदाज आहे. 

हिंगोली जिल्ह्यात म.ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेत २ लाखांपर्यंत कर्जमुक्तीसाठी बँकांनी दिलेल्या माहितीनुसार १.0९ लाख खातेदार शेतकरी पात्र ठरले होते. तर यापैकी १ लाख ४ हजार ५८८ शेतकऱ्यांनी आपले बँक खाते आधारशी संलग्न केले आहे. आता ४८१६ जणांचेच बँक खाते आधारशी लिंक करणे बाकी आहे.या पुढील टप्प्यांत आधार लिंक झालेल्या शेतकऱ्यांची माहिती संबंधित वेबसाईटवर २८ रकान्यांत अपलोड केली जाणार आहे. ही माहिती संबंधित यंत्रणेने जमा करून पोर्टलवर अपलोड करायची आहे. यात संबंधित खातेदाराची रक्कम, आधार क्रमांक, पीककर्जाशी संबंधित किती खाते, त्यांची रक्कम किती आदी माहिती असणार आहे. जर ही माहिती व्यवस्थित असेल तर संबंधित शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्रावर ती तपासल्यानंतर हाताचे थम्ब देवून ओके करायची आहे.

आक्षेप असल्यास ती त्रुटी दुरुस्त करण्यासाठीचा पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर हे प्रकरण जिल्हा तक्रार निवारण समितीकडे येणार आहे. त्यानंतर ही समिती याची पडताळणी करून यावर निर्णय घेणार आहे. यात नेमका काय बदल करायचा  की करायचा नाही, याचे अधिकार या समितीलाच राहणार आहेत. अजून या कार्यक्रमाला प्रत्यक्ष प्रारंभ झाला नाही. मात्र त्याची तारीख लवकरच जाहीर होणार आहे. सध्या असा डाटा अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हिंगोली जिल्ह्यातील ७९ हजार ४0९ खातेदारांची माहिती २८ रकान्यात भरून पोर्टलवर अपलोड केली आहे. आपले सेवा केंद्रावर याची माहिती घेता येणार आहे.

ही यादी तपासल्यानंतर ज्या शेतकऱ्यांना २ लाखांच्या मर्यादेत कर्जमुक्तीचा लाभ मिळू शकतो, मात्र त्यांचे नाव आले नाही, अशांनाही आॅफलाईन तक्रार तहसीलदारांकडे करता येणार आहे. तहसीलकडून ही तक्रार जिल्हा तक्रार निवारण समितीसमोर येणार आहे. पडताळणीनंतर समिती हे प्रकरण बँकेमार्फत १ ते २८ रकान्यातील माहिती भरून पोर्टलवर अपलोड करणार आहे. जर तथ्य आढळले नाही तर प्रकरण फेटाळले जाणार आहे.

समितीला नियमित काम करावे लागणारया योजनेत बँकेशी संबंधित रक्कम व इतर त्रुटी आढळल्यास त्या तक्रारी रोजच जिल्हा तक्रार निवारण समितीला प्राप्त होणार आहेत. त्यामुळे अशा मनुष्यबळाची व्यवस्था करून नियमित काम चालेल, अशी व्यवस्था करावी लागणार आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीCrop Loanपीक कर्जHingoliहिंगोली