शहरं
Join us  
Trending Stories
1
ISRO आणखी एक विक्रम रचणार! २०३५ पर्यंत भारतीय अंतराळ स्टेशन बनवणार, पाहा कसं दिसतं मॉडेल?
2
भाजपाला कधी मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष?; अचानक घडलेल्या घडामोडींमुळे झाला विलंब, काय आहे कारण?
3
Video: फटाक्यांच्या आवाजानं बैल उधळला, सगळीकडे गोंधळ; गावकऱ्यांची झाली पळापळ, १ जण जखमी
4
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
5
टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
6
Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
7
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
8
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
9
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
10
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
11
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
12
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
13
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
14
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
15
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
16
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
17
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
18
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
19
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
20
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर

धोकादायक रूळ ओलांडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:53 IST

गॉगलला वाढली मागणी हिंगोली : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे रस्ता जागोजागी खोदण्यात आला ...

गॉगलला वाढली मागणी

हिंगोली : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे रस्ता जागोजागी खोदण्यात आला असून, अनेक ठिकाणी वळण रस्ता काढून देण्यात आला आहे. यावरून वाहने जाताच धुळीचे लोट उठत आहेत. त्यामुळे ही धूळ वाहनचालकांच्या डोळ्यात जाऊन डोळ्यांचे आजार वाढत आहेत. त्यामुळे अनेक दुचाकीचालक गॉगलला पसंती देत आहेत.

मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा

आखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर शहरात मोकाट जनावरे वाढली आहेत. मोकाट जनावरे रस्त्यावर ठाण मांडून बसत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

खिळखिळ्या बसेसने प्रवास

हिंगोली: येथील आगारातून ग्रामीण भागात खिळखिळ्या बसेस सोडल्या जात आहेत. अगोदरच ग्रामीण रस्त्यांची दुरवस्था झाली असून, खिळखिळ्या बसेसमुळे त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ज्येष्ठ नागिरकांना तर बसमधून प्रवास करावा की नाही, असा प्रश्न पडत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात चांगल्या बसेस सोडाव्यात, अशी मागणी होत आहे.

रेल्वेस्थानकावर शुकशुकाट

हिंगोली : अकोला ते पूर्णा मार्गावरून प्रवासी वाहतूक करणाऱ्या रेल्वेगाड्यांची संख्या कमी झाली आहे. मोजक्याच रेल्वे धावत असल्या तरी रेल्वे गेल्यानंतर स्थानकावर शुकशुकाट जाणवत आहे. शुकशुकाट जाणवत असला तरी स्थानक चकाचक दिसून येत आहे.

सौरदिव्यांच्या बॅटऱ्या गायब

हिंगोली : येथील जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या वतीने अनेक गावांत सौरदिवे बसविण्यात आले आहेत. मात्र, सौरदिवे बसविल्यानंतर काही दिवसातच सौरदिव्यांच्या बॅटऱ्या गायब होण्यास सुरुवात झाली आहे. आता बहुतांश ठिकाणी सौरदिव्यांचे बल्ब व खांब तेवढे शिल्लक राहिले असल्याचे दिसून येत आहे.

बिबट्याच्या भीतीने शेतकरी भयभीत

आखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्यातील कांडली शिवारात बिबट्या असल्याची चर्चा आहे. मात्र, तो हिंस्त्र प्राणी बिबट्याच आहे की नाही, हे अद्याप समजले नाही. दोन दिवसांपूर्वी एका शेतकऱ्याची शेळी लचके तोडल्याच्या अवस्थेत आढळून आली. त्यामुळे या भागातील शेतकरी भयभीत झाले असून, हिंस्त्र प्राणी कोणता आहे ते शोधावे, अशी मागणी होत आहे.

बस सोडण्याची मागणी

हिंगोली : जिल्ह्यातील पाचवी ते आठवीच्या शाळा २७ जानेवारीपासून सुरू होत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात मानव विकास मिशनच्या बसेस सोडाव्यात, अशी मागणी विद्यार्थिनींमधून होत आहे. बसेस सुरू झाल्यास विद्यार्थिनींना शाळेत जाण्यासाठी मदत होणार आहे.