शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

धोकादायक रूळ ओलांडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:53 IST

गॉगलला वाढली मागणी हिंगोली : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे रस्ता जागोजागी खोदण्यात आला ...

गॉगलला वाढली मागणी

हिंगोली : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे रस्ता जागोजागी खोदण्यात आला असून, अनेक ठिकाणी वळण रस्ता काढून देण्यात आला आहे. यावरून वाहने जाताच धुळीचे लोट उठत आहेत. त्यामुळे ही धूळ वाहनचालकांच्या डोळ्यात जाऊन डोळ्यांचे आजार वाढत आहेत. त्यामुळे अनेक दुचाकीचालक गॉगलला पसंती देत आहेत.

मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा

आखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर शहरात मोकाट जनावरे वाढली आहेत. मोकाट जनावरे रस्त्यावर ठाण मांडून बसत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

खिळखिळ्या बसेसने प्रवास

हिंगोली: येथील आगारातून ग्रामीण भागात खिळखिळ्या बसेस सोडल्या जात आहेत. अगोदरच ग्रामीण रस्त्यांची दुरवस्था झाली असून, खिळखिळ्या बसेसमुळे त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ज्येष्ठ नागिरकांना तर बसमधून प्रवास करावा की नाही, असा प्रश्न पडत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात चांगल्या बसेस सोडाव्यात, अशी मागणी होत आहे.

रेल्वेस्थानकावर शुकशुकाट

हिंगोली : अकोला ते पूर्णा मार्गावरून प्रवासी वाहतूक करणाऱ्या रेल्वेगाड्यांची संख्या कमी झाली आहे. मोजक्याच रेल्वे धावत असल्या तरी रेल्वे गेल्यानंतर स्थानकावर शुकशुकाट जाणवत आहे. शुकशुकाट जाणवत असला तरी स्थानक चकाचक दिसून येत आहे.

सौरदिव्यांच्या बॅटऱ्या गायब

हिंगोली : येथील जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या वतीने अनेक गावांत सौरदिवे बसविण्यात आले आहेत. मात्र, सौरदिवे बसविल्यानंतर काही दिवसातच सौरदिव्यांच्या बॅटऱ्या गायब होण्यास सुरुवात झाली आहे. आता बहुतांश ठिकाणी सौरदिव्यांचे बल्ब व खांब तेवढे शिल्लक राहिले असल्याचे दिसून येत आहे.

बिबट्याच्या भीतीने शेतकरी भयभीत

आखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्यातील कांडली शिवारात बिबट्या असल्याची चर्चा आहे. मात्र, तो हिंस्त्र प्राणी बिबट्याच आहे की नाही, हे अद्याप समजले नाही. दोन दिवसांपूर्वी एका शेतकऱ्याची शेळी लचके तोडल्याच्या अवस्थेत आढळून आली. त्यामुळे या भागातील शेतकरी भयभीत झाले असून, हिंस्त्र प्राणी कोणता आहे ते शोधावे, अशी मागणी होत आहे.

बस सोडण्याची मागणी

हिंगोली : जिल्ह्यातील पाचवी ते आठवीच्या शाळा २७ जानेवारीपासून सुरू होत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात मानव विकास मिशनच्या बसेस सोडाव्यात, अशी मागणी विद्यार्थिनींमधून होत आहे. बसेस सुरू झाल्यास विद्यार्थिनींना शाळेत जाण्यासाठी मदत होणार आहे.