शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

धोकादायक रूळ ओलांडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:53 IST

गॉगलला वाढली मागणी हिंगोली : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे रस्ता जागोजागी खोदण्यात आला ...

गॉगलला वाढली मागणी

हिंगोली : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे रस्ता जागोजागी खोदण्यात आला असून, अनेक ठिकाणी वळण रस्ता काढून देण्यात आला आहे. यावरून वाहने जाताच धुळीचे लोट उठत आहेत. त्यामुळे ही धूळ वाहनचालकांच्या डोळ्यात जाऊन डोळ्यांचे आजार वाढत आहेत. त्यामुळे अनेक दुचाकीचालक गॉगलला पसंती देत आहेत.

मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा

आखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर शहरात मोकाट जनावरे वाढली आहेत. मोकाट जनावरे रस्त्यावर ठाण मांडून बसत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

खिळखिळ्या बसेसने प्रवास

हिंगोली: येथील आगारातून ग्रामीण भागात खिळखिळ्या बसेस सोडल्या जात आहेत. अगोदरच ग्रामीण रस्त्यांची दुरवस्था झाली असून, खिळखिळ्या बसेसमुळे त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ज्येष्ठ नागिरकांना तर बसमधून प्रवास करावा की नाही, असा प्रश्न पडत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात चांगल्या बसेस सोडाव्यात, अशी मागणी होत आहे.

रेल्वेस्थानकावर शुकशुकाट

हिंगोली : अकोला ते पूर्णा मार्गावरून प्रवासी वाहतूक करणाऱ्या रेल्वेगाड्यांची संख्या कमी झाली आहे. मोजक्याच रेल्वे धावत असल्या तरी रेल्वे गेल्यानंतर स्थानकावर शुकशुकाट जाणवत आहे. शुकशुकाट जाणवत असला तरी स्थानक चकाचक दिसून येत आहे.

सौरदिव्यांच्या बॅटऱ्या गायब

हिंगोली : येथील जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या वतीने अनेक गावांत सौरदिवे बसविण्यात आले आहेत. मात्र, सौरदिवे बसविल्यानंतर काही दिवसातच सौरदिव्यांच्या बॅटऱ्या गायब होण्यास सुरुवात झाली आहे. आता बहुतांश ठिकाणी सौरदिव्यांचे बल्ब व खांब तेवढे शिल्लक राहिले असल्याचे दिसून येत आहे.

बिबट्याच्या भीतीने शेतकरी भयभीत

आखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्यातील कांडली शिवारात बिबट्या असल्याची चर्चा आहे. मात्र, तो हिंस्त्र प्राणी बिबट्याच आहे की नाही, हे अद्याप समजले नाही. दोन दिवसांपूर्वी एका शेतकऱ्याची शेळी लचके तोडल्याच्या अवस्थेत आढळून आली. त्यामुळे या भागातील शेतकरी भयभीत झाले असून, हिंस्त्र प्राणी कोणता आहे ते शोधावे, अशी मागणी होत आहे.

बस सोडण्याची मागणी

हिंगोली : जिल्ह्यातील पाचवी ते आठवीच्या शाळा २७ जानेवारीपासून सुरू होत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात मानव विकास मिशनच्या बसेस सोडाव्यात, अशी मागणी विद्यार्थिनींमधून होत आहे. बसेस सुरू झाल्यास विद्यार्थिनींना शाळेत जाण्यासाठी मदत होणार आहे.