शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

ई-पंचायतची पंचाईत कायमच; कुठे आॅपरेटर तर कुठे साधनसामुग्री मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 19:41 IST

जिल्ह्यात ई-पंचायत प्रकल्पांतर्गत ५६३ ग्रामपंचायतीअंतर्गत मंजूर ३७८ पैकी ३७६ केंद्र सुरू असल्याचे सांगितले जात आहे. मात्र प्रत्यक्षात अनेक गावांत वेगळेच चित्र आहे.

हिंगोली : जिल्ह्यात ई-पंचायत प्रकल्पांतर्गत ५६३ ग्रामपंचायतीअंतर्गत मंजूर ३७८ पैकी ३७६ केंद्र सुरू असल्याचे सांगितले जात आहे. मात्र प्रत्यक्षात अनेक गावांत वेगळेच चित्र आहे. कुठे आॅपरेटर नाही तर कुठे यंत्रसामुग्री. तरीही ग्रामपंचायतच्या वित्त आयोगाच्या निधीतून खर्च देण्याची वेळ येत असल्याची बोंब आहे.

हिंगोली जिल्ह्यात शासनाने ग्रामपंचायतीच विविध प्रकारचे दाखले, व्यावसायिक, बँकींग सेवा तसेच ग्रामपंचायतीचेही आॅनलाईन कामकाज करता यावे, यासाठी आपले सरकार सेवा केंद्र सुरू केले आहे. यासाठी त्या गावांना राज्य स्तरावरील एका एजन्सीकडून मनुष्यबळ व साहित्य पुरवठा करण्याचे कंत्राट दिलेले आहे. यात अनेक गावांत केवळ नावालाच ही यंत्रणा उभी राहिलेली आहे. तर काही गावांमध्येच यात चांगले काम होत आहे. त्यातही आॅपरेटरची नेमणूक करताना तो कितपत कामाचा आहे, याची चाचपणी न करता केवळ वेळ मारून नेण्यासाठी या कंपनीने माणसे ठेवलीत की काय, अशी बोंब अनेक ठिकाणचे सरपंच ठोकत आहेत.

काही दिवसांपूर्वी सरपंच संघटनेने तर याबाबत लेखी तक्रारही पंचायत विभागाकडे केली होती. मात्र तरीही यात फारशी सुधारणा झाली नसल्याचे सांगितले जात आहे. स्टेशनरी व इतर खर्चांवर होणारी कपात तर निव्वळ संबंधित कंपन्याच्या तुंबड्या भरण्यासाठीच आहे की काय, असाही सवाल सरपंचांच्या संघटने कडून केला जात आहे. गावाच्या विकासासाठी आधीच निधी मिळत नाही. त्यात मिळालेल्या निधीत या अनाठायी बाबींवर खर्च होत असून त्याचा काही फायदाही नसल्याने सरपंचांची ओरड रास्त वाटते. मात्र प्रशासनाने बंधन घातल्याने ते निरुपाय होत आहेत.

टॅग्स :digitalडिजिटलState Governmentराज्य सरकारHingoli z pहिंगोली जिल्हा परिषद