शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

कयाधू पुनरूज्जीवनार्थ १५४ गावांत दिंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 23:35 IST

काही वर्षांपूर्वी बारमाही वाहणारी व जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेली कयाधू आता पावसाळ्यातही कोरडी पडत आहे. प्रदूषित झाली आहे. ती पुन्हा प्रवाही होण्यासाठी माथा ते पायथा जलसंधारणाची कामे व्हावीत, म्हणून उगम ग्रामीण विकास संस्थेमार्फत १५४ गावांत जागृती दिंडी जाणार आहे. या रॅलीला जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता हिरवी झेंडी दाखविली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : काही वर्षांपूर्वी बारमाही वाहणारी व जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेली कयाधू आता पावसाळ्यातही कोरडी पडत आहे. प्रदूषित झाली आहे. ती पुन्हा प्रवाही होण्यासाठी माथा ते पायथा जलसंधारणाची कामे व्हावीत, म्हणून उगम ग्रामीण विकास संस्थेमार्फत १५४ गावांत जागृती दिंडी जाणार आहे. या रॅलीला जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता हिरवी झेंडी दाखविली.यावेळी आ. तान्हाजी मुटकुळे, आ. रामराव वडकुते, जि. प. सीईओ डॉ. एच. पी. तुम्मोड, पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया, अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मनियार, ्जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आकाश कुलकर्णी, डॉ. किशन लखमावार, डॉ. संजय नाकाडे, डॉ. प्रेमेंद्र बोथरा आदींची उपस्थिती होती. दरम्यान, रॅलीसाठी मदत करणाऱ्यांचा आमदार व जिल्हाधिकारी, सीईओंच्या वतीने सत्कार करण्यात आला.हिंगोली जिल्ह्याची ओळख असलेली कयाधू नदी पासवाळ्यात कधी-कधी आक्राळ-विक्राळ रुप करु वाहते. ती जिल्ह्यात ८४ किलोमीटर क्षेत्रातून वाहते. मात्र पाऊस ओसरताच दुसºया दिवशी नदीचे पात्र कोरडे पडत असल्याने वर्षभर जिल्ह्यातील लोकांना पाण्याच्या एका -एका थेंबासाठी भटकण्याची वेळ येते. ती वेळ कायमची थांबावी म्हणून नदीच्या पुनरुज्जीवनासाठी प्रशासन स्तरावर प्रयत्न सुरु आहेत. राजस्थानमध्ये डॉ.राजेंद्रसिंग राणा यांनी आठ नद्यांचे पुन्नरुजीवन केले. त्यामुळे त्या भागातील लोकांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबण्यास मदत झाली आहे. त्यामुळे त्यांचा हाच उपक्रम महाराष्टÑभर राबविण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमिवर हिंगोलीत ही मोहीम हात घेतली. या नदीच्या काठावर जवळपास १५४ गावे, वाड्या, वस्त्या वसलेल्या आहेत. त्यामुळे त्या-त्या गावक्षेत्रात ही जलचळवळ राबविण्यात येणार आहे. सद्यस्थितीत नदीला जिल्ह्यातील ११७५ कि.मी. अंतरावरून लहान-मोठे ओढे, नाले आणि पाट येऊन मिळतात. कयाधू नदीची एकूण लांबी ८४ किलोमीटर असून, तिला येऊन मिळणाºया ओढ्यांची लांबी ११७५ कि.मी. एवढी आहे. सर्व काही व्यवस्थित असले तरीही नदी कोरडीठाक झाली आहे. त्यामुळे तिला जिवंत करणे अतिशय महत्त्वाचे आहे. यासाठी कळमनुरी, सेनगाव, हिंगोली येथे दहा दिवस जलदिंडी निघणार आहे. या दिंडीत जवळपास ५० महिला आणि ५० पुरुष सहभागी झाले असून, त्या- त्या गावातील ग्रामस्थ हे पाच किमी अंतरापर्यंत सहभागी होणार आहेत. असे एकूण दीड हजाराच्या जवळपास ग्रामस्थ सहभागी होणार असल्याचे संस्थाध्यक्ष जयाजी पाईकराव यांनी सांगितले. तर रॅलीत महिला लेझीम पथक सर्वांचे आकर्षण ठरले.जिल्हाधिकारी अनिल भंडारी, सीईओ डॉ. एच. पी. तुम्मोड यांनी जलयुक्त विभागासह विविध शासकीय कर्मचाºयांना रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन केले. तर जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया यांनी ही आप- आपल्या कर्मचाºयांना सूचना देणार असल्याचे सांगितले.पाणलोट क्षेत्रातील जुने पाण्याचे स्रोत पुनरुज्जीवित करणे, सीसीटी, लूझ बोल्डर, गॅबियन बंधारे बांधणे, बुडी, डोह पुनरुज्जीवित करणे, जुने सिमेंट बांध, मातीबांध यांची दुरुस्ती, खोलीकरण करणे, शेततळे घेणे, बोअर पुनर्भरण, विहीर पुनर्भरण करणे, ओढ्याचे खोलीकरण करणे ही कामे केली जाणार आहेत.डॉ. किशन लखमावार आणि डॉ. संजय नाकाडे यांच्यावतीने रॅलीतील सहभागी पैकी कोणाची प्रकृती बिघडल्यास प्रथमोउपचार पेटी दिली. तर सोर्सा कॉम्प्युटरच्या वतीने लिंबू पाण्याची दिलेली पाकिट जिल्हाधिकाºयांच्या हस्ते रॅलीतील सहभागींना वाटली.पूर्वी संत गाडगे महाराज गोपाल काल्यानंतर कीर्तनांतून लोकांना प्रबोधन करत असत, तसेच या जलदिंडीद्वारेही घरोघर भाकरी मागून एकत्र येत गोपालकाला केला जाणार आहे. गोपाल काल्यानंतर नदीच्या पुनरुजीवनासाठी जनजागृती केली जाणार आहे.रॅलीच्या मदतीसाठी अनेकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. तर आ. तान्हाजी मुटकुळे व आ. रामराव वडकुते म्हणाले, तेथे जेव्हा गरज भासेल तेव्हा मदत मागा आम्ही काही वेळातच मदतीसाठी धावून येऊ. तर त्या- त्या गावातील कार्यकर्त्यांना सूचनाही देतो.अशी केली जाईल जनजागृती४नदीच्या पुनरुज्जीवनासाठी प्रथम ग्रामस्थांना पुनरुज्जीवत केले जाईल. त्यांनी श्रमदान करून आपल्या परिसरातील डोंगरमाथ्यावर सीसीटी, डीपीसीसीटी, बांध बंदिस्ती करावी, यासाठी ते यातून पुढे येतील, असे उगमचे जयाजी पाईकराव यांनी सांगितले.

टॅग्स :Hingoliहिंगोलीriverनदी