शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

दलित वस्तीची कामे रोखली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 23:42 IST

दलित वस्ती सुधार योजनेची कामे तोंडी आदेशान्वये रोखण्यात आली आहेत. याबाबत आ.तान्हाजी मुटकुळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली असून त्यात एकाच वस्तीला दोन ते तीन ठिकाणी विभागून निधी दिल्याचा आरोप करून चौकशीची मागणी केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : दलित वस्ती सुधार योजनेची कामे तोंडी आदेशान्वये रोखण्यात आली आहेत. याबाबत आ.तान्हाजी मुटकुळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली असून त्यात एकाच वस्तीला दोन ते तीन ठिकाणी विभागून निधी दिल्याचा आरोप करून चौकशीची मागणी केली आहे.दलित वस्ती सुधार योजनेत जिल्हा परिषदेला तब्बल २६ कोटी रुपयांचा निधी मिळाला होता. यातून ४0१ वस्त्यांमध्ये ५८७ कामे करण्यास मंजुरी दिली होती. यासाठी २५.९८ कोटींच्या निधीचे वितरण केले. यात हिंगोली तालुक्यातील १0२ गावांत १४८ वस्त्यांमध्ये ५.८0 कोटी, कळमनुरी तालुक्यातील ७१ गावांतील १0३ वस्त्यांमध्ये ५.0१ कोटी, वसमत तालुक्यातील ९६ गावांतील १३८ वस्त्यांमध्ये ६.२१ कोटी, औंढा तालुक्यातील ५२ गावांत ८५ वस्त्यांमध्ये ३.३७ कोटी तर सेनगाव तालुक्यातील ८0 गावच्या ११३ वस्त्यांमध्ये ५.५६ कोटींचा निधी वितरित केला आहे.या निधीतील कामांची अंदाजपत्रके तयार करणे, तांत्रिक मान्यता घेणे आदी कामांना आता सुरुवात झाल्याचे पहायला मिळत आहे. हा निधी ऐन पावसाळ्याच्या तोंडावर मिळाल्याने सरपंच मंडळी या कामांना संथगतीने प्रारंभ करीत आहे. काही तुरळक ठिकाणीच ही कामे सुरूही झाली आहेत. तर काहींनी कार्यारंभ आदेशाची वाट न पाहताच हे काम सुरू केल्याने अशांची गोची होण्याची भीती आहे.या योजनेत अनेक गावांमध्ये एकाच दलित वस्तीला वेगवेगळी नावे देऊन निधी वाढविण्यासाठी शक्कल लढविल्याचा मुटकुळे यांचा आरोप आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराची योग्य ती चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे एका निवेदनाद्वारे केली होती. त्यात कारवाईचा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.मुख्यमंत्र्यांनी कारवाईचा आदेश दिल्याचे पत्र जि.प.ला मिळताच ही कामे थांबविण्याचे तोंडी आदेश निघाल्याचे सूत्रांनी सांगितले. लेखी आदेश येण्याची वाट न पाहताच हा आदेश देण्यात आला आहे. मात्र यामुळे सदस्यांतून नाराजीचा सूर उमटत आहे. वारंवार या योजनेला खीळ बसत असल्याने अनेकांनी हीयोजना म्हणजे वाटेल त्याने हस्तक्षेप करण्यासाठीच आहे की जि.प.लाही यात काही अधिकार आहेत? असा सवाल केला जात आहे. काहींनी मात्र विद्युतीकरणाची कामे घेतल्याने असा प्रकार घडल्याची टूम काढली आहे.गतवर्षीच्या २६ कोटी रुपयांचीच बोंब सुरू असताना यंदांच्या २0 कोटी रुपयांचे नियोजन करायचे कसे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मोठा आकडा असल्याने अनेकांची डोळे विस्फारत आहेत.

टॅग्स :HingoliहिंगोलीHingoli z pहिंगोली जिल्हा परिषद