शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
4
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
5
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
6
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
7
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
8
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
9
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
10
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
11
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
12
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
14
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
15
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
16
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
17
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
18
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
19
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
20
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग

पावसाने दडी मारल्यामुळे दुबार पेरणीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:36 IST

या वर्षी मृग नक्षत्रात पानकनेरगावसह सावरखेडा, कहाकर खुर्द, शिनगीखांबा, खैरखेडा, शेगाव खोडके, म्हाळसी, वाढोना, सुंदली खुर्द, वटकळी, कोंडवाडा, जयपूर ...

या वर्षी मृग नक्षत्रात पानकनेरगावसह सावरखेडा, कहाकर खुर्द, शिनगीखांबा, खैरखेडा, शेगाव खोडके, म्हाळसी, वाढोना, सुंदली खुर्द, वटकळी, कोंडवाडा, जयपूर आदी गावांतील शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग, हळद, आदी पिकांची पेरणी केली; परंतु, १० दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. महागाईने कळस गाठला असून उधारीवर काही शेतकऱ्यांनी बियाणे विकत घेतले. अजून उधारीही फिटली नाही. त्यातच पावसाने दडी मारली आहे. येत्या दोन-तीन दिवसांत पाऊस पडला नाही तर दुबार पेरणीशिवाय शेतकऱ्यांसमोर पर्याय उरणार नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

मृग नक्षत्रावर जवळपास सर्वच शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. आजमितीस पिके उगवली असून दिवसराच्या कडक उन्हामुळे पिके पावसाअभावी करपून जात आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय आहे ते पिकांना पाणी देतील. पण जे शेतकरी कोरडवाहू आहेत अशा शेतकऱ्यांनी काय करावे? असा प्रश्न पडला आहे.

.... तर शासनाने मदत करावी

गतवर्षी पानकनेरगावसह अनेक गावात अतिवृष्टी झाली. अनेकांच्या शेतातील सोयाबीन, कापूस, उडीद, तूर आदी पिकांचे नुकसान झाले. यावेळेस खरीप हंगाम साथ देईल, असे वाटले होते. परंतु, दहा दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे महागामोलाचे बियाणे वाजा जातात की काय, अशी भीती वाटू लागली आहे. दुबार पेरणी करण्याची वेळ आल्यास शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी गजानन देशमुख, श्यामराव देशमुख, संतोष मरडे, संतोष देवकर यांनी केली आहे.