शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
2
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
3
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
4
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
5
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
6
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
7
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
8
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
9
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
10
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
11
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
12
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
13
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
14
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
15
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
16
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
17
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
18
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
19
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
20
भाई, बाळासाहेबांबद्दल नेमके काय झाले होते, सांगता का..?

पावसाने दडी मारल्यामुळे दुबार पेरणीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:36 IST

या वर्षी मृग नक्षत्रात पानकनेरगावसह सावरखेडा, कहाकर खुर्द, शिनगीखांबा, खैरखेडा, शेगाव खोडके, म्हाळसी, वाढोना, सुंदली खुर्द, वटकळी, कोंडवाडा, जयपूर ...

या वर्षी मृग नक्षत्रात पानकनेरगावसह सावरखेडा, कहाकर खुर्द, शिनगीखांबा, खैरखेडा, शेगाव खोडके, म्हाळसी, वाढोना, सुंदली खुर्द, वटकळी, कोंडवाडा, जयपूर आदी गावांतील शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग, हळद, आदी पिकांची पेरणी केली; परंतु, १० दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. महागाईने कळस गाठला असून उधारीवर काही शेतकऱ्यांनी बियाणे विकत घेतले. अजून उधारीही फिटली नाही. त्यातच पावसाने दडी मारली आहे. येत्या दोन-तीन दिवसांत पाऊस पडला नाही तर दुबार पेरणीशिवाय शेतकऱ्यांसमोर पर्याय उरणार नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

मृग नक्षत्रावर जवळपास सर्वच शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. आजमितीस पिके उगवली असून दिवसराच्या कडक उन्हामुळे पिके पावसाअभावी करपून जात आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय आहे ते पिकांना पाणी देतील. पण जे शेतकरी कोरडवाहू आहेत अशा शेतकऱ्यांनी काय करावे? असा प्रश्न पडला आहे.

.... तर शासनाने मदत करावी

गतवर्षी पानकनेरगावसह अनेक गावात अतिवृष्टी झाली. अनेकांच्या शेतातील सोयाबीन, कापूस, उडीद, तूर आदी पिकांचे नुकसान झाले. यावेळेस खरीप हंगाम साथ देईल, असे वाटले होते. परंतु, दहा दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे महागामोलाचे बियाणे वाजा जातात की काय, अशी भीती वाटू लागली आहे. दुबार पेरणी करण्याची वेळ आल्यास शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी गजानन देशमुख, श्यामराव देशमुख, संतोष मरडे, संतोष देवकर यांनी केली आहे.