शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
5
एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
6
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
7
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
8
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
9
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
10
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
11
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
12
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
13
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
14
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
15
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
16
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
17
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
18
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
19
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
20
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण

क्वॉरंटाईन होण्यास नकार देण्याऱ्या पाच जणांवर गुन्हा; एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 17:20 IST

हिंगोली तालुक्यातील हनवतखेडा येथील पाचजण ठाणे येथून परतले होते

ठळक मुद्देपाच जणांनी क्वॉरंटाईन होण्यास नकार दिला

हिंगोली :  तालुक्यातील हनवतखेडा येथे परत आलेल्या ५ जणांपैकी १ व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. ठाणे जिल्ह्यातून गावी परल्यानंतर या सर्वांना विलगीकरण कक्षात जाण्यासाठी सूचना दिल्या तरी त्यांनी नकार दिला. त्यामुळे वरील पाच जणांविरूद्ध नर्सी नामदेव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिंगोली तालुक्यातील हनवतखेडा येथील सुभाष मारुती जाधव (४८), पंचफुलाबाई सुभाष जाधव (४५), गणेश सुभाष जाधव (२०), गुरुदेव सुभाष जाधव (१८) आणि  दुसरा एक अल्पवयीन मुलगा हे सर्वजण कामानिमित्त ठाणे जिल्ह्यातील धारणा येथे गेले होते. २५ जून रोजी रात्रीच्या सुमारास हे सर्वजण आपल्या गावी हनवतखेडा येथे परतले. गावात आल्यानंतर ग्रामसमितीने या सर्वांनाच शासकीय रुग्णालयात जाऊन तपासणी करून घेण्याची सूचना केली. परंतु त्यांनी तपासणीसाठी न जाता गावातील शाळेतच मुक्काम ठोकला. 

वारंवार सूचना देऊनही ते संस्थात्मक विलगिकरणात गेले नाहीत. शिवाय ग्रामसेवक आणि ग्राम समितीतील सदस्यांना उलट आम्ही येथेच राहणार कुठे जाणार नाही असे सुनावले. त्यामुळे २९ जून रोजी हिंगोली येथील सामान्य रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेतून पोलीस बंदोबस्तात त्यांना सरकारी दवाखान्यात आणले. सर्वांचे स्वॅब नमुने घेऊन तपासासाठी पाठविण्यात आले. त्यामधील एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्यामुळे इतरांना साथ रोगाचा धोका निर्माण होवू शकतो हे माहिती असताना, आणि वेळोवेळी सूचना देऊनही शासकीय आदेशांचा भंग केल्याने याबाबत ग्रामसेविका मीनाक्षी पंडितकर यांनी नर्सी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून वरील पाच जणांविरूद्ध साथरोग नियंत्रण कायदा, आपत्ती व्यवस्थापन कायदा यासह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHingoliहिंगोली