शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

coronavirus : हिंगोलीत कोरोनाने आणखी दोन दगावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 17:48 IST

. कोरोनाची आजपर्यंतची रुग्णसंख्या ४४0 एवढी आहे.

ठळक मुद्देआज दगावलेले दोन्ही रुग्ण हिंगोली शहरातील आहेत. तीनच दिवसांत जिल्ह्याचे चित्रच पालटले आहे.

हिंगोली : जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढला असून आज पुन्हा दोघांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. आता एकूण मृत्यू पाच झाले आहेत. तर पाच जणांचा जिल्ह्याबाहेर उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तीनच दिवसांत जिल्ह्याचे चित्रच पालटले आहे. कोरोनाची आजपर्यंतची रुग्णसंख्या ४४0 एवढी आहे. तर यापैकी ३२३ जण बरे झाले आहेत.

हिंगोली जिल्ह्यात सुरुवातीच्या दोन महिन्यांत परजिल्ह्यातून अथवा राज्यातून आलेल्यांनाच कोरोनाचा संसर्ग होत असल्याचे समोर येत होते. मात्र टाळेबंदी उठल्यानंतर इतर जिल्ह्यात जावून येण्याचे प्रमाण वाढल्यानंतर विविध भागात रुग्ण आढळले. त्यांच्या संपर्कातील लोकांमुळे मागील दीड महिन्यांत दोनशे रुग्ण वाढल्याचे दिसून येत आहे. तर मागील तीन दिवसांत तब्बल पाच जण कोरोनाने दगावले आहेत. 

आज दगावलेले दोन्ही रुग्ण हिंगोली शहरातील आहेत. यातील एक ३५ वर्षीय युवकास सारीच्या आजाराने चिंताजनक प्रकृती असताना भरती केले होते. तो कोरोनाबाधित आढळून आल्यानंतर दुसऱ्या दिवशीच त्याचा मृत्यू झाला. तर मंगळवारा येथील ५५ वर्षीय वृद्धालाही सारीसदृश्य लक्षणे असल्याने दाखल केल्यानंतर काल कोरोना असल्याचे स्पष्ट झाले होते. आज या रुग्णाचाही मृत्यू झाला आहे.

हिंगोलीत आतापर्यंत आढळलेल्या ४४0 पैकी ३२३ रुग्ण बरे झाले असून ११४ जणांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात कोरोनाने मृत्यू झालेल्यांचा आकडा १० वर पोहोचला असला तरीही यातील पाच जण परजिल्ह्यात उपचारार्थ गेल्यावर दगावले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHingoliहिंगोली