शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
3
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
4
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
5
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
6
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
7
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
8
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
9
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
10
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
11
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
12
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
13
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
14
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?
15
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
16
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
17
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
18
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
19
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
20
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह

coronavirus : हिंगोली @ १५१; दिवसभरात ५० बाधित रुग्णांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 00:14 IST

सध्या उपचार सुरू असलेल्यांची संख्या ६२ आहे

हिंगोली : जिल्ह्यात आधी एसआरपीएफच्या जवानांमुळे एकदाच मोठी रुग्णसंख्या वाढली होती. त्यानंतर अशी एकदाच रुग्णवाढ होईल, असे वाटत नसतानाच आज एकाच दिवशी तब्बल ५० जणांचे थ्रोट स्वॅब अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने हिंगोलीकरांच्या चिंतेत भर पडली आहे. आता एकूण रुग्णसंख्या १५१ वर गेली असून बरे झालेल्यांची संख्या ८९ आहे. सध्या उपचार सुरू असलेल्यांची संख्या ६२ आहे.

हिंगोलीत शनिवारी सकाळीच ६ जण कोरोना बाधित आढळले होते. त्यामुळे यापूर्वीच्या १0१ वरून आकडा १0७ वर पोहोचला होता. नव्याने बाधित आढळलेल्यांमध्ये यापूर्वी हट्टा येथे आढळलेल्या एका रुग्णाच्या संपर्कातील तिघे होते. तर वसमत येथील दोघे नव्याने पॉझिटिव्ह आढळले आहेत. यापूर्वीचे दोनजण बरे झाल्यानंतर आता पुन्हा एकदाच दोन जण आढळल्याचे दिसून येत आहे. वसमत तालुक्यातील वापटी येथील सात जणही आधीच उपचार घेत आहेत. याशिवाय औंढा तालुक्यातील देवाळा येथील एकजण पॉझिटिव्ह आढळला आहे. यापूर्वीच हिंगोली तालुक्यातील भिरडा, औंढ्यातील पोटा शेळके येथील एकजण पॉझिटिव्ह आला आहे. हे सर्व मुंबई रिटर्न आहेत. तर सर्वच जण आधीच क्वारंटाईन केले होते. तरीही काहींनी गावात जावून परत रुग्णालय गाठलेले असल्याने प्रवासी हिस्ट्री तपासण्यात येत आहे. 

सायंकाळी पुन्हा एकदा काही जणांचे थ्रोट स्वॅब अहवाल आले. यामध्ये सेनगाव येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवलेल्या १३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. रुग्णसंख्या १२0 वर पोहोचली आहे. या तालुक्यात आधी फक्त जांभरुण रोडगे येथे दोघे आढळले होते. ते बरे होवून घरी सोडले आहेत. आता नव्याने मुंबईहून परतलेले खुडज येथील ९ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर बरडा येथे दिल्लीहून परतलेले ३ जण पॉझिटिव्ह आहेत. याशिवाय गोरेगाव येथील क्वारंटाईनमधील सुरजखेडा येथील एकजणही पॉझिटिव्ह आढळला आहे. तोही मुंबईहून परतलेलाच असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास  हिंगोली येथील  लिंबाळा  विलगीकरण कक्षात  असलेल्या  31 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये  मुंबईहून  परतलेले  22, औरंगाबाद येथून परतलेले  चार, रायगड येथून परतलेला एक, कर्नाटकातील बिदरहून  आलेला एक, तर भिरडा येथील रुग्णाच्या संपर्कातील  दोघांसह एका  डॉक्टरलासुद्धा  कोरोनाची बाधा झाली आहे.

कळमनुरीत निरंकआता हिंगोली जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये किमान एक तरी रुग्ण आढळलेला आहे. मात्र कळमनुरी हा एकमेव तालुका आहे, जेथे आतापर्यंत एकही कोरोनाबाधित आढळून आला नाही. विशेष म्हणजे या तालुक्यात सर्वाधिक १0 हजार ३४७ जण परजिल्ह्यातून परतलेले आहेत. मुळात स्थलांतरित मजुरांची संख्या जास्त असलेला हा तालुका आहे. त्यामुळे ही कोरोनामुक्तीची परिस्थिती कायम राहण्यासाठी या तालुक्याला आणखी सतर्क राहावे लागणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHingoliहिंगोली