शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : हिंगोली @ १५१; दिवसभरात ५० बाधित रुग्णांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 00:14 IST

सध्या उपचार सुरू असलेल्यांची संख्या ६२ आहे

हिंगोली : जिल्ह्यात आधी एसआरपीएफच्या जवानांमुळे एकदाच मोठी रुग्णसंख्या वाढली होती. त्यानंतर अशी एकदाच रुग्णवाढ होईल, असे वाटत नसतानाच आज एकाच दिवशी तब्बल ५० जणांचे थ्रोट स्वॅब अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने हिंगोलीकरांच्या चिंतेत भर पडली आहे. आता एकूण रुग्णसंख्या १५१ वर गेली असून बरे झालेल्यांची संख्या ८९ आहे. सध्या उपचार सुरू असलेल्यांची संख्या ६२ आहे.

हिंगोलीत शनिवारी सकाळीच ६ जण कोरोना बाधित आढळले होते. त्यामुळे यापूर्वीच्या १0१ वरून आकडा १0७ वर पोहोचला होता. नव्याने बाधित आढळलेल्यांमध्ये यापूर्वी हट्टा येथे आढळलेल्या एका रुग्णाच्या संपर्कातील तिघे होते. तर वसमत येथील दोघे नव्याने पॉझिटिव्ह आढळले आहेत. यापूर्वीचे दोनजण बरे झाल्यानंतर आता पुन्हा एकदाच दोन जण आढळल्याचे दिसून येत आहे. वसमत तालुक्यातील वापटी येथील सात जणही आधीच उपचार घेत आहेत. याशिवाय औंढा तालुक्यातील देवाळा येथील एकजण पॉझिटिव्ह आढळला आहे. यापूर्वीच हिंगोली तालुक्यातील भिरडा, औंढ्यातील पोटा शेळके येथील एकजण पॉझिटिव्ह आला आहे. हे सर्व मुंबई रिटर्न आहेत. तर सर्वच जण आधीच क्वारंटाईन केले होते. तरीही काहींनी गावात जावून परत रुग्णालय गाठलेले असल्याने प्रवासी हिस्ट्री तपासण्यात येत आहे. 

सायंकाळी पुन्हा एकदा काही जणांचे थ्रोट स्वॅब अहवाल आले. यामध्ये सेनगाव येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवलेल्या १३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. रुग्णसंख्या १२0 वर पोहोचली आहे. या तालुक्यात आधी फक्त जांभरुण रोडगे येथे दोघे आढळले होते. ते बरे होवून घरी सोडले आहेत. आता नव्याने मुंबईहून परतलेले खुडज येथील ९ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर बरडा येथे दिल्लीहून परतलेले ३ जण पॉझिटिव्ह आहेत. याशिवाय गोरेगाव येथील क्वारंटाईनमधील सुरजखेडा येथील एकजणही पॉझिटिव्ह आढळला आहे. तोही मुंबईहून परतलेलाच असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास  हिंगोली येथील  लिंबाळा  विलगीकरण कक्षात  असलेल्या  31 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये  मुंबईहून  परतलेले  22, औरंगाबाद येथून परतलेले  चार, रायगड येथून परतलेला एक, कर्नाटकातील बिदरहून  आलेला एक, तर भिरडा येथील रुग्णाच्या संपर्कातील  दोघांसह एका  डॉक्टरलासुद्धा  कोरोनाची बाधा झाली आहे.

कळमनुरीत निरंकआता हिंगोली जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये किमान एक तरी रुग्ण आढळलेला आहे. मात्र कळमनुरी हा एकमेव तालुका आहे, जेथे आतापर्यंत एकही कोरोनाबाधित आढळून आला नाही. विशेष म्हणजे या तालुक्यात सर्वाधिक १0 हजार ३४७ जण परजिल्ह्यातून परतलेले आहेत. मुळात स्थलांतरित मजुरांची संख्या जास्त असलेला हा तालुका आहे. त्यामुळे ही कोरोनामुक्तीची परिस्थिती कायम राहण्यासाठी या तालुक्याला आणखी सतर्क राहावे लागणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHingoliहिंगोली