शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

CoronaVirus : हिंगोलीत सोशल डिस्टनसिंगला तिलांजली; वाढत्या गर्दी पुढे प्रशासन हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 18:20 IST

नागरिकांकडून प्रशासनाच्या योजनांचा बोजवारा

ठळक मुद्देभाजीपाला आणि इतर खरेदीसाठी नागरिक रस्त्यावर

हिंगोली : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी आणि प्रसार होऊ नये यासाठी प्रशासकीय यंत्रणा नियोजन करीत असून विविध उपाययोजना करत आहे. सध्या लॉकडाऊनमुळे जिल्हाधिका-यांच्या आदेशानुसार ठरवून दिलेल्या वेळेत भाजीपाला, व फळविक्री तसेच किराणा साहित्य खरेदीसाठी १० एप्रिल रोजी मुभा देण्यात आली होती. परंतु यावेळी सोशल डिस्टन्स पाळले गेले नाही. त्यामुळे नागरिकांनी हम नही सुधरेंगे जणू असा काही संदेश दिल्याचे चित्र शुक्रवारी दिसून आले. लोकांची गर्दी अन् नागरिकांनी सोशल डिस्टन्सला तिलांजली यामुळे मात्र प्रशासकीय यंत्रणा हतबल झाली आहे. 

जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांच्या आदेशानुसार १० एप्रिल रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत जिल्ह्यात किराणा, भाजीपाला, फळविक्रीसाठी मुभा देण्यात आली होती. यावेळी सोशल डिस्टन्स ठेवूनच खरेदी करावी असा संदेशही जिल्हा प्रशासनाने दिला होता. विशेष म्हणजे हिंगोली शहरातील मुख्य पाच ठिकाणी यासाठी व्यवस्था करण्यात आली होती. या पाचही ठिकाणी जिल्हाधिका-यांच्या आदेशानुसार न. प. चे मुख्याधिकारी रामदास पाटील आणि हिंगोली शहर ठाण्याचे पोनि अखिल सय्यद यांनी नियोजन करून आखणीही केली होती. तसेच भाजी-फळ विक्रेते, किराणा मेडिकल आदींनी ग्राहकांमध्ये सुरक्षित अंतर ठेवावे, विक्रेत्यांनी स्वत: मास्क, तोंडाला बांधवा अन्यथा दंड ठोठावला जाईल असा कडक इशाराही दिला होता. परंतु अनेक ठिकाणी आदेशाची पायमल्ली होताना दिसून आली.

नागरिकांनी सोशल डिस्टन्स तर पाळले नव्हतेच, शिवाय अनेकांच्या तोंडांना रूमाल किंवा मास्कही दिसून आले नाहीत. त्यामुळे नागरिक कोरोना सारख्या आजाराला गंभीरतेने का घेत नसावे असा प्रश्न निर्माण होत असून प्रशासकीय यंत्रणाही हतबल झाल्याचे दिसून येत आहे. १० एप्रिलला जिल्हाभरात ठिकठिकाणी भाजीपाला, किराणा साहित्य खरेदी करण्साठी सर्वत्र गर्दी जमली होती. यावेळी अनेकांनी नियम पाळल्याचेही दिसून आले. परंतु काही नागरिकांनी कुठलीच दक्षता घेतली नव्हती.

जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूशी लढा देण्यासाठी प्रयत्न केले जात असताना दुसरीकडे जिल्हाधिकाºयांच्या आदेशाचीच पायमल्ली होताना दिसून येत आहे. ही गंभीर बाब असून यामुळे अनेक प्रशासकीय अधिकाºयांनी खंत व्यक्त केली आहे. हिंगोली शहरातील मोकळ्या जागेत पाच ठिकाणी भाजीपाला विक्रीसाठी आला होता. परंतु यापूर्वीच भाजीविक्रेत्यांना नियमावली घालून देण्यात आली होती. सोशल डिस्टन्सचे नियम प्रत्येकांनीच पाळावे असे आवाहनही करण्यात आले होते.

विशेष म्हणजे भाजीपाला खरेदीसाठी येताना नागरिकांनी कुठलेच वाहन घेऊन येऊ नये, खरेदीसाठी पायीच यावे असे सांगूनही शहरात मात्र वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहने घेऊन येणाºयांवर थेट गुन्हे दाखल केले जातील तसेच वाहन जप्त करून दंड ठोठाण्याचे आदेश होते. परंतु शहरातील पाचही ठिकाणी मात्र ठिकठिकाणी वाहनांची वर्दळ दिसून आली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHingoliहिंगोली