शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

CoronaVirus : हिंगोलीत सोशल डिस्टनसिंगला तिलांजली; वाढत्या गर्दी पुढे प्रशासन हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 18:20 IST

नागरिकांकडून प्रशासनाच्या योजनांचा बोजवारा

ठळक मुद्देभाजीपाला आणि इतर खरेदीसाठी नागरिक रस्त्यावर

हिंगोली : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी आणि प्रसार होऊ नये यासाठी प्रशासकीय यंत्रणा नियोजन करीत असून विविध उपाययोजना करत आहे. सध्या लॉकडाऊनमुळे जिल्हाधिका-यांच्या आदेशानुसार ठरवून दिलेल्या वेळेत भाजीपाला, व फळविक्री तसेच किराणा साहित्य खरेदीसाठी १० एप्रिल रोजी मुभा देण्यात आली होती. परंतु यावेळी सोशल डिस्टन्स पाळले गेले नाही. त्यामुळे नागरिकांनी हम नही सुधरेंगे जणू असा काही संदेश दिल्याचे चित्र शुक्रवारी दिसून आले. लोकांची गर्दी अन् नागरिकांनी सोशल डिस्टन्सला तिलांजली यामुळे मात्र प्रशासकीय यंत्रणा हतबल झाली आहे. 

जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांच्या आदेशानुसार १० एप्रिल रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत जिल्ह्यात किराणा, भाजीपाला, फळविक्रीसाठी मुभा देण्यात आली होती. यावेळी सोशल डिस्टन्स ठेवूनच खरेदी करावी असा संदेशही जिल्हा प्रशासनाने दिला होता. विशेष म्हणजे हिंगोली शहरातील मुख्य पाच ठिकाणी यासाठी व्यवस्था करण्यात आली होती. या पाचही ठिकाणी जिल्हाधिका-यांच्या आदेशानुसार न. प. चे मुख्याधिकारी रामदास पाटील आणि हिंगोली शहर ठाण्याचे पोनि अखिल सय्यद यांनी नियोजन करून आखणीही केली होती. तसेच भाजी-फळ विक्रेते, किराणा मेडिकल आदींनी ग्राहकांमध्ये सुरक्षित अंतर ठेवावे, विक्रेत्यांनी स्वत: मास्क, तोंडाला बांधवा अन्यथा दंड ठोठावला जाईल असा कडक इशाराही दिला होता. परंतु अनेक ठिकाणी आदेशाची पायमल्ली होताना दिसून आली.

नागरिकांनी सोशल डिस्टन्स तर पाळले नव्हतेच, शिवाय अनेकांच्या तोंडांना रूमाल किंवा मास्कही दिसून आले नाहीत. त्यामुळे नागरिक कोरोना सारख्या आजाराला गंभीरतेने का घेत नसावे असा प्रश्न निर्माण होत असून प्रशासकीय यंत्रणाही हतबल झाल्याचे दिसून येत आहे. १० एप्रिलला जिल्हाभरात ठिकठिकाणी भाजीपाला, किराणा साहित्य खरेदी करण्साठी सर्वत्र गर्दी जमली होती. यावेळी अनेकांनी नियम पाळल्याचेही दिसून आले. परंतु काही नागरिकांनी कुठलीच दक्षता घेतली नव्हती.

जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूशी लढा देण्यासाठी प्रयत्न केले जात असताना दुसरीकडे जिल्हाधिकाºयांच्या आदेशाचीच पायमल्ली होताना दिसून येत आहे. ही गंभीर बाब असून यामुळे अनेक प्रशासकीय अधिकाºयांनी खंत व्यक्त केली आहे. हिंगोली शहरातील मोकळ्या जागेत पाच ठिकाणी भाजीपाला विक्रीसाठी आला होता. परंतु यापूर्वीच भाजीविक्रेत्यांना नियमावली घालून देण्यात आली होती. सोशल डिस्टन्सचे नियम प्रत्येकांनीच पाळावे असे आवाहनही करण्यात आले होते.

विशेष म्हणजे भाजीपाला खरेदीसाठी येताना नागरिकांनी कुठलेच वाहन घेऊन येऊ नये, खरेदीसाठी पायीच यावे असे सांगूनही शहरात मात्र वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहने घेऊन येणाºयांवर थेट गुन्हे दाखल केले जातील तसेच वाहन जप्त करून दंड ठोठाण्याचे आदेश होते. परंतु शहरातील पाचही ठिकाणी मात्र ठिकठिकाणी वाहनांची वर्दळ दिसून आली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHingoliहिंगोली