शहरं
Join us  
Trending Stories
1
झोपेत बायकोने नवऱ्याच्या अंगावर टाकलं उकळतं पाणी; जीव वाचवण्यासाठी पळताच अ‍ॅसिड टाकून जाळले
2
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
3
WI vs BAN Super Over : ९ चेंडूंची सुपर ओव्हर! ३ फुकटच्या धावा; तरी वेस्ट इंडिजसमोर बांगलादेशची फजिती
4
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
5
Womens World Cup : लाजिरवाण्या पराभवासह पाक संघ OUT; सेमीसह फायनल भारतात खेळवण्याचा मार्ग मोकळा!
6
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार
7
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
8
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
9
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
10
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
11
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
12
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
13
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
14
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
15
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
16
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
17
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
18
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
19
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
20
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!

CoronaVirus : हिंगोलीत सोशल डिस्टनसिंगला तिलांजली; वाढत्या गर्दी पुढे प्रशासन हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 18:20 IST

नागरिकांकडून प्रशासनाच्या योजनांचा बोजवारा

ठळक मुद्देभाजीपाला आणि इतर खरेदीसाठी नागरिक रस्त्यावर

हिंगोली : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी आणि प्रसार होऊ नये यासाठी प्रशासकीय यंत्रणा नियोजन करीत असून विविध उपाययोजना करत आहे. सध्या लॉकडाऊनमुळे जिल्हाधिका-यांच्या आदेशानुसार ठरवून दिलेल्या वेळेत भाजीपाला, व फळविक्री तसेच किराणा साहित्य खरेदीसाठी १० एप्रिल रोजी मुभा देण्यात आली होती. परंतु यावेळी सोशल डिस्टन्स पाळले गेले नाही. त्यामुळे नागरिकांनी हम नही सुधरेंगे जणू असा काही संदेश दिल्याचे चित्र शुक्रवारी दिसून आले. लोकांची गर्दी अन् नागरिकांनी सोशल डिस्टन्सला तिलांजली यामुळे मात्र प्रशासकीय यंत्रणा हतबल झाली आहे. 

जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांच्या आदेशानुसार १० एप्रिल रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत जिल्ह्यात किराणा, भाजीपाला, फळविक्रीसाठी मुभा देण्यात आली होती. यावेळी सोशल डिस्टन्स ठेवूनच खरेदी करावी असा संदेशही जिल्हा प्रशासनाने दिला होता. विशेष म्हणजे हिंगोली शहरातील मुख्य पाच ठिकाणी यासाठी व्यवस्था करण्यात आली होती. या पाचही ठिकाणी जिल्हाधिका-यांच्या आदेशानुसार न. प. चे मुख्याधिकारी रामदास पाटील आणि हिंगोली शहर ठाण्याचे पोनि अखिल सय्यद यांनी नियोजन करून आखणीही केली होती. तसेच भाजी-फळ विक्रेते, किराणा मेडिकल आदींनी ग्राहकांमध्ये सुरक्षित अंतर ठेवावे, विक्रेत्यांनी स्वत: मास्क, तोंडाला बांधवा अन्यथा दंड ठोठावला जाईल असा कडक इशाराही दिला होता. परंतु अनेक ठिकाणी आदेशाची पायमल्ली होताना दिसून आली.

नागरिकांनी सोशल डिस्टन्स तर पाळले नव्हतेच, शिवाय अनेकांच्या तोंडांना रूमाल किंवा मास्कही दिसून आले नाहीत. त्यामुळे नागरिक कोरोना सारख्या आजाराला गंभीरतेने का घेत नसावे असा प्रश्न निर्माण होत असून प्रशासकीय यंत्रणाही हतबल झाल्याचे दिसून येत आहे. १० एप्रिलला जिल्हाभरात ठिकठिकाणी भाजीपाला, किराणा साहित्य खरेदी करण्साठी सर्वत्र गर्दी जमली होती. यावेळी अनेकांनी नियम पाळल्याचेही दिसून आले. परंतु काही नागरिकांनी कुठलीच दक्षता घेतली नव्हती.

जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूशी लढा देण्यासाठी प्रयत्न केले जात असताना दुसरीकडे जिल्हाधिकाºयांच्या आदेशाचीच पायमल्ली होताना दिसून येत आहे. ही गंभीर बाब असून यामुळे अनेक प्रशासकीय अधिकाºयांनी खंत व्यक्त केली आहे. हिंगोली शहरातील मोकळ्या जागेत पाच ठिकाणी भाजीपाला विक्रीसाठी आला होता. परंतु यापूर्वीच भाजीविक्रेत्यांना नियमावली घालून देण्यात आली होती. सोशल डिस्टन्सचे नियम प्रत्येकांनीच पाळावे असे आवाहनही करण्यात आले होते.

विशेष म्हणजे भाजीपाला खरेदीसाठी येताना नागरिकांनी कुठलेच वाहन घेऊन येऊ नये, खरेदीसाठी पायीच यावे असे सांगूनही शहरात मात्र वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहने घेऊन येणाºयांवर थेट गुन्हे दाखल केले जातील तसेच वाहन जप्त करून दंड ठोठाण्याचे आदेश होते. परंतु शहरातील पाचही ठिकाणी मात्र ठिकठिकाणी वाहनांची वर्दळ दिसून आली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHingoliहिंगोली