शहरं
Join us  
Trending Stories
1
योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा...; उद्धवसेना आक्रमक, अनिल परबांचे गंभीर आरोप
2
Conversion Law: राजस्थानात धर्मांतरण कायदा लागू, राज्यपाल हरीभाऊ बागडे यांची मंजुरी, उल्लंघन केल्यास किती शिक्षा होणार? जाणून घ्या
3
टाटा कॅपिटलच्या आयपीओचे शेअर्स मिळाले की नाही? कसं चेक कराल स्टेटस, जीएमपीची स्थिती काय? जाणून घ्या
4
रोहित शर्माने विकत घेतली नवीन आलिशान Tesla Model Y कार, त्याची खासियत काय आणि किंमत किती?
5
श्रीमंतांच्या यादीत मोठी उलथापालथ! एअरटेलचे मित्तल यांची मोठी झेप, शिव नादरांची घसरण, पहिलं कोण?
6
"चाकू हल्ल्यात जेह झालेला जखमी..."; ८ महिन्यांनी सैफने सांगितलं 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?
7
"अजित आगरकरसाठी शेवट खूप विचित्र असेल", रोहित शर्मा वादावर इंग्लंडच्या माजी खेळाडूचं विधान
8
“योगेश कदमांनी अधिकाराचा गैरवापर करत गुंडाला अभय दिले, राजीनामा द्यावा”; ठाकरे गटाची मागणी
9
“शेतकऱ्यांना भरीव मदतीची दानत नाही, तीन आठवड्यांचे अधिवेशन घ्यावे”; शरद पवार गटाची मागणी
10
या एका कारणामुळे 'कांतारा चॅप्टर १' बनला ब्लॉकबस्टर; ऋषभ शेट्टीने सांगितलं सिनेमाच्या यशामागचं सीक्रेट
11
इराण युद्ध अमेरिकाच नाही, तर 'या' देशानेही इस्रायलला दिला होता मोठा पाठिंबा!४ महिन्यांनंतर झाला खुलासा
12
संकष्ट चतुर्थी: भारतातील एकमेव १८ हातांच्या गणपतीचे मंदिर पाहिले का? आपल्या महाराष्ट्रातच आहे!
13
भारत-तालिबान मैत्रीनं पाकिस्तानचं टेन्शन वाढणार; अफगाणिस्तान भारतासाठी इतकं महत्त्वाचं का?
14
Cough Syrup : "पप्पा, मला मोबाईल द्या ना...", वेदांशचे शेवटचे शब्द; १२ लाख खर्च करूनही वाचला नाही जीव
15
मृत सासूला चितेवर ठेवताना शरीरावर दिसल्या जखमा; संशय येताच तपास झाला अन् समोर आलं विदारक सत्य!
16
"WhatsApp वर नोट आणि वरिष्ठांची नाव..."; IAS पत्नीने केले १५ कॉल, लेकीलाही पाठवलं पण...
17
Ratan Tata Death Anniversary: असे होते रतन टाटा... ज्या व्यवसायात हात घातला सोनं केलं, १० पॉईंट्समध्ये पाहा त्यांचा प्रवास
18
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: गणपतीसह लक्ष्मी देवीचेही करा पूजन, मंत्राचे जप ठरतील उपयुक्त!
19
शून्य बँक शिल्लक असतानाही होईल UPI पेमेंट? 'भीम ॲप'चं 'हे' खास फीचर जाणून घ्या!
20
भ्रष्टाचारामध्ये महाराष्ट्र आघाडीवर; ७८५ शासकीय कर्मचारी, खासगी व्यक्तींना अटक; देशभरात २,८७५ ठिकाणी कारवाई

कोरोनाने हिरावले २१ बालकांचे पालक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:31 IST

हिंगोली : जिल्ह्यात कोरोनाने धुमाकूळ घातला असून, आतापर्यंत ३३८ जणांचा मृत्यू झाला आहे. यात सर्वाधिक नुकसान पालक गमावलेल्या २१ ...

हिंगोली : जिल्ह्यात कोरोनाने धुमाकूळ घातला असून, आतापर्यंत ३३८ जणांचा मृत्यू झाला आहे. यात सर्वाधिक नुकसान पालक गमावलेल्या २१ बालकांचे झाले आहे. अशा बालकांना मदत व्हावी, यासाठी शासनाने मदतीचा हात पुढे केला असून, अशा बालकांचा शोध घेतला जात आहे.

जिल्ह्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. २५ मे पर्यंत जिल्ह्यात १५ हजार ३७८ रुग्ण आढळून आले आहेत. यातील १४ हजार ६४० रुग्ण बरे झाले असले तरी ३३८ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. घरातील कर्ता व्यक्ती कोरोनाने हिरावल्याने कुटुंबीयांवर संकट कोसळले आहे. यात सर्वाधिक नुकसान पालक गमावलेल्या बालकांचे झाले आहे. अशा बालकांची काळजी घेणारे कोणीही नसल्याने ही बालके शोषणास बळी पडण्याची, तसेच बालकामगार किंवा मुलांची तस्करीसारख्या गुन्ह्यामध्ये ओढली जाण्याची शक्यता आहे. आतापर्यंत कोरोनामुळे पालक गमावलेली २१ बालके आढळून आली आहेत. या बालकांना शासनाने मदतीचा हात पुढे केला असून, यासाठी जिल्हास्तरावर कृतिदल स्थापन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी अध्यक्ष असणार असून, पोलीस अधीक्षक, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव, जिल्हा बालकल्याण समितीचे अध्यक्ष, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी हे सदस्य म्हणून काम पाहणार आहेत. तसेच जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी टास्क फोर्सचे सदस्य सचिव आहेत. या संदर्भात जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी कृती दल समितीची बैठक घेऊन कोरोनामुळे पालक गमावलेल्या मुलांचा शोध घेण्याच्या सूचना केल्या आहेत.

आई किंवा वडिलांचा मृत्यू झाला असल्यास ११०० रुपयांची मदत

- कोरोनामुळे आई किंवा वडील यापैकी एका पालकाचा मृत्यू झाल्यास अशा बालकांच्या संगोपनासाठी प्रती महिना ११०० रुपये देण्यात येणार आहेत.

- जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या वतीने ही रक्कम थेट एकल पालकाच्या बँक खात्यात जमा होणार आहे.

- जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे २१ बालकांनी आई किंवा वडील यापैकी एका पालकाला गमावले आहे.

अनाथ मुलांचे सरकार काय करणार ...

१) कोरोनामुळे आई-वडील दोन्ही गमावलेल्या ० ते १८ वयोगटांतील बालकांना बाल संगोपन योजनेअंतर्गत लाभ देणे, बालकाचा ताबा नातेवाइकांकडे देण्याच्या शक्यतेबाबत पडताळणी करणे.

२) टास्क फोर्सच्या माध्यमातून बालकांना सर्वतोपरी संरक्षण उपलब्ध करून देणे, अशी बालके शोषणास बळी पडणार नाहीत याची दक्षता घेणे, त्याचे कायदेशीर हक्क मिळवून देणे.

३) आवश्यकता असल्यास बालकांचे समुपदेशन करणे, तसेच बालगृहामध्ये दाखल करणे.

प्रतिक्रिया ...

कोरोनामुळे आई-बाबा गमावलेल्या बालकांना टास्क फोर्सच्या माध्यमातून मदत देण्यासंदर्भात जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी बैठक घेऊन सूचना दिल्या आहेत. आई किंवा बाबा यापैकी एक पालक गमावलेले २१ बालके आढळली आहेत. अशी आणखी बालके आहेत का याचा शोधही घेतला जात आहे.

- विठ्ठल शिंदे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी

कोरोनाने आई किंवा बाबा हिरावलेल्याची संख्या - २१

मुले - ९

मुली - १२