शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

कोरोनाने हिरावले २१ बालकांचे पालक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:31 IST

हिंगोली : जिल्ह्यात कोरोनाने धुमाकूळ घातला असून, आतापर्यंत ३३८ जणांचा मृत्यू झाला आहे. यात सर्वाधिक नुकसान पालक गमावलेल्या २१ ...

हिंगोली : जिल्ह्यात कोरोनाने धुमाकूळ घातला असून, आतापर्यंत ३३८ जणांचा मृत्यू झाला आहे. यात सर्वाधिक नुकसान पालक गमावलेल्या २१ बालकांचे झाले आहे. अशा बालकांना मदत व्हावी, यासाठी शासनाने मदतीचा हात पुढे केला असून, अशा बालकांचा शोध घेतला जात आहे.

जिल्ह्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. २५ मे पर्यंत जिल्ह्यात १५ हजार ३७८ रुग्ण आढळून आले आहेत. यातील १४ हजार ६४० रुग्ण बरे झाले असले तरी ३३८ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. घरातील कर्ता व्यक्ती कोरोनाने हिरावल्याने कुटुंबीयांवर संकट कोसळले आहे. यात सर्वाधिक नुकसान पालक गमावलेल्या बालकांचे झाले आहे. अशा बालकांची काळजी घेणारे कोणीही नसल्याने ही बालके शोषणास बळी पडण्याची, तसेच बालकामगार किंवा मुलांची तस्करीसारख्या गुन्ह्यामध्ये ओढली जाण्याची शक्यता आहे. आतापर्यंत कोरोनामुळे पालक गमावलेली २१ बालके आढळून आली आहेत. या बालकांना शासनाने मदतीचा हात पुढे केला असून, यासाठी जिल्हास्तरावर कृतिदल स्थापन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी अध्यक्ष असणार असून, पोलीस अधीक्षक, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव, जिल्हा बालकल्याण समितीचे अध्यक्ष, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी हे सदस्य म्हणून काम पाहणार आहेत. तसेच जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी टास्क फोर्सचे सदस्य सचिव आहेत. या संदर्भात जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी कृती दल समितीची बैठक घेऊन कोरोनामुळे पालक गमावलेल्या मुलांचा शोध घेण्याच्या सूचना केल्या आहेत.

आई किंवा वडिलांचा मृत्यू झाला असल्यास ११०० रुपयांची मदत

- कोरोनामुळे आई किंवा वडील यापैकी एका पालकाचा मृत्यू झाल्यास अशा बालकांच्या संगोपनासाठी प्रती महिना ११०० रुपये देण्यात येणार आहेत.

- जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या वतीने ही रक्कम थेट एकल पालकाच्या बँक खात्यात जमा होणार आहे.

- जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे २१ बालकांनी आई किंवा वडील यापैकी एका पालकाला गमावले आहे.

अनाथ मुलांचे सरकार काय करणार ...

१) कोरोनामुळे आई-वडील दोन्ही गमावलेल्या ० ते १८ वयोगटांतील बालकांना बाल संगोपन योजनेअंतर्गत लाभ देणे, बालकाचा ताबा नातेवाइकांकडे देण्याच्या शक्यतेबाबत पडताळणी करणे.

२) टास्क फोर्सच्या माध्यमातून बालकांना सर्वतोपरी संरक्षण उपलब्ध करून देणे, अशी बालके शोषणास बळी पडणार नाहीत याची दक्षता घेणे, त्याचे कायदेशीर हक्क मिळवून देणे.

३) आवश्यकता असल्यास बालकांचे समुपदेशन करणे, तसेच बालगृहामध्ये दाखल करणे.

प्रतिक्रिया ...

कोरोनामुळे आई-बाबा गमावलेल्या बालकांना टास्क फोर्सच्या माध्यमातून मदत देण्यासंदर्भात जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी बैठक घेऊन सूचना दिल्या आहेत. आई किंवा बाबा यापैकी एक पालक गमावलेले २१ बालके आढळली आहेत. अशी आणखी बालके आहेत का याचा शोधही घेतला जात आहे.

- विठ्ठल शिंदे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी

कोरोनाने आई किंवा बाबा हिरावलेल्याची संख्या - २१

मुले - ९

मुली - १२