शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

चोरीच्या दहशतीमुळे फेरीवाल्यांना बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 00:02 IST

परिसरात मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटना वाढल्या आहेत. यामुळे ग्रामस्थांची झोप उडाली आहे. यातच परप्रांतीय फेरीवाले सामान विक्रीसाठी गावात येत असल्याने त्यांच्यावर संशय घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले जातआहे. त्यामुळे या गावांत फेरीवाल्यांना अघोषित बंदीच घातल्याचे चित्र आहे. अशा संशयित चौघांवर पोलिसांनी कारवाई केली.

लोकमत न्यूज नेटवर्कआखाडा बाळापूर : परिसरात मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटना वाढल्या आहेत. यामुळे ग्रामस्थांची झोप उडाली आहे. यातच परप्रांतीय फेरीवाले सामान विक्रीसाठी गावात येत असल्याने त्यांच्यावर संशय घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले जातआहे. त्यामुळे या गावांत फेरीवाल्यांना अघोषित बंदीच घातल्याचे चित्र आहे. अशा संशयित चौघांवर पोलिसांनी कारवाई केली.आखाडा बाळापूर परिसरात मागील काही दिवसांपासून सतत्याने चोरीच्या घटना घडत आहेत. बाळापूर पोलिसांना चोरट्यांचा माग लागत नाही. चोरट्यांच्या सक्रियतेमुळे ग्रामस्थ भयभीत आहेत. दरम्यान, कांडली, आडा गावात झालेल्या चोरीच्या घटना बाळापुरात भरदिवसाची घरफोडी याचा संबंध केस विकत घेणाºयांशी जोडला जात आहे.आंध्र प्रदेशची पासिंग असलेल्या तीन दुचाकीस्वारांशी याचा संबंध असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला. त्यामुळे गावागावात विविध साहित्य विक्रीसाठी येणारे परप्रांतीय विक्रेते ग्रामस्थांच्या हिट लिस्टवर आहेत.८ जानेवारी २0१८ रोजी भोसी येथे साडी विक्रीसाठी आलेल्या उत्तर प्रदेशातील दोन तरुणांना ग्रामस्थांनी संशयावरून मारहाण केली. तसेच पोलिसांच्या स्वाधिन केले. तर दुसºयाच दिवशी दाती येथे चादर विक्रीसाठी आलेल्या दोघांना ग्रामस्थांनी पोलिसांच्या हवाली गेले. या चारही जणांवर बाळापूर पोलिसांनी कारवाई केली आहे. एकंदरीत यामुळे फेरीवाल्यांना अघोषित गावबंदी झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.वारंग्यात फोडले देशी दारुचे दुकानवारंगा फाटा : कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा येथील देशी दारूचे दुकान फोडून ३२ हजार ४४८ रुपयांच्या तेरा पेट्या दारूची चोरी केल्याची घटना घडली आहे. बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या घटना एकापाठोपाठ सुरूच आहेत. २१ नोव्हेंबरलाच डोंगरकडा येथे देशी दारूचे दुकान फोडले होते. दारूसह इतर साहित्य असा एक लाखाचा ऐवज चोरीला गेला होता. आता पुन्हा वारंगा फाटा येथे दुकानावरील टीनपत्रे काढून देशी दारूच्या तेरा पेट्या पळविल्या. या दारूची किंमत ३२ हजार ४४८ रुपये एवढी आहे. चंदू केशवराव कदम यांच्या तक्रारीवरून आखाडा बाळापूर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. अनेक खेड्यांमध्ये चोरीच्या घटना रोखण्यासाठी रात्रीची गस्त सुरू झाली असताना राष्ट्रीय महामार्गावरील गावात होत असलेल्या या प्रकारामुळे पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे.