हिंगोली: जिल्ह्यात मागील दोन-तीन दिवसांपासून ऊन वाढू लागले आहे. त्यामुळे पत्र्याच्या शेडमध्ये बांधलेल्या जनावरांना त्रास होऊ लागला आहे. उन्हापासून जनावरांची काळजी घ्यावी, असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने केले आहे.
जनावरे ज्या ठिकाणी बांधली जातात. त्या पत्र्याच्या खोलीवर तुराट्या किंवा गवत टाकावे. ज्यामुळे पत्रे तापणार नाहीत. वाढत्या उन्हाचा जनावरांना त्रास होतो. जनावरांना चारा टाकतेवेळेस तो व्यवस्थित पहावा. कारण कधी-कधी साप या चारामध्ये दडू बसलेला असतो. दडून बसलेला साप जनावरांना दंश करण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
दुसरीकडे जिल्ह्यात काही ठिकाणी हळदीची काढणी करणे सुरु आहे. हळद उकडणे, वाळविणे, पॉलीश करणे आदी कामे शेतकरी जोमाने करीत आहेत. बहुतांश ठिकाणी हळद बाजारपेठेतही आणली गेली आहे. पाण्याची तीव्र टंचाई लक्षात घेता फुल शेतीला ताण बसणार नाही, याकडेही शेतकऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. उन्हाळी पिकांमध्ये लागवड केलेल्या चारा पिकांमध्ये सूक्ष्म सिंचन पद्धतीने पाणी व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.