शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
2
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
3
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
4
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
5
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
6
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
7
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
8
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
10
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
11
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
12
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
13
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
14
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
15
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
16
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
17
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
18
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
19
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
20
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली

काँग्रेस शांत, सेनेत लाथाळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 23:33 IST

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर काँग्रेसमध्ये निरव शांतता असताना सेनेत मात्र लाथाळ्या सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. बाहेरचा नको, ठरावीक भागातीलच उमेदवार द्या, अमक्या समाजाचाच द्या अशा भानगडी समोर येत आहेत. त्यामुळे लोकसभेच्या तोंडावर राजकीय वातावरण ढवळून निघण्याऐवजी चाचपणीचा हंगाम सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर काँग्रेसमध्ये निरव शांतता असताना सेनेत मात्र लाथाळ्या सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. बाहेरचा नको, ठरावीक भागातीलच उमेदवार द्या, अमक्या समाजाचाच द्या अशा भानगडी समोर येत आहेत. त्यामुळे लोकसभेच्या तोंडावर राजकीय वातावरण ढवळून निघण्याऐवजी चाचपणीचा हंगाम सुरू आहे.हिंगोली लोकसभा मतदारसंघात विद्यमान खा.राजीव सातव यांची उमेदवारी अंतिम मानली जात असतानाच आ.संतोष टारफे यांनी काही भागात दौरे केले अन् काँग्रेसमध्ये हलचल सुरू झाली. मात्र इतर कोणी पुढे येणे तसेही शक्यच नाही. परंतु खा.सातव इच्छुक नसतील तर या जागी आपल्याला संधी मिळेल काय? याची चाचपणी काही जणांनी केली. यात कुणाच्याच हाती काही लागले नाही. काँग्रेस व राष्ट्रवादीची युती गृहित धरूनच या सगळ्या बाबी होत गेल्याने राष्ट्रवादीतून कोणी इच्छुक नव्हता, ही एक जमेची बाजू. दुसरीकडे भाजप व शिवसेना मात्र स्वतंत्रपणे लढण्याची घोषणा वारंवार करून पुढाऱ्यांना चेतविण्याचे काम करीत होती. यात भाजपकडे तर इच्छुकांचा इतका भरणा झाला की, ही जागा शिवसेनेपेक्षाही ताकदीने हीच मंडळी लढविणार की काय? असे चित्र निर्माण झाले होते. अ‍ॅड. शिवाजी माने, सुभाष वानखेडे, सूर्यकांता पाटील या तीन माजी खासदारांसह अ‍ॅड.शिवाजी जाधव, के.के.शिंदे, आ.तान्हाजी मुटकुळे, बाबाराव बांगर व शेवटच्या टप्प्यात तर माजी आ.गजानन घुगे हेही दावेदारी करण्याच्या तयारीत होते. मात्र त्याच काळात युतीची घोषणा झाली अन् भाजपवाल्यांना या जागेवर पाणी सोडावे लागेल, याची जाणीवही झाली. मात्र दुसरीकडे शिवसेनेत याचदरम्यान आ.जयप्रकाश मुंदडा यांच्याऐवजी आ.हेमंत पाटील, माजी खा.सुभाष वानखेडे यांच्या नावाचा काहींनी आग्रह चालविला होता. यात पाटील व मुंदडा यांचे शिष्टमंडळ पार मातोश्रीपर्यंत धडकले होते. युतीमुळे इतरही अनेकांच्या अपेक्षांना धुमारे फुटले आहेत. जिल्हा परिषदला जागा निवडून न आणणारेही आमच्या हिंगोलीवर कायम अन्यायाची भाषा करू लागले. तसा विचार करता सेनेची हिंगोली विधानसभेतही स्थानिक स्वराज्य संस्थांतील संख्याबळाची परिस्थिती चांगली आहे. त्यामुळे येथेही पत्रकार परिषद घेवून दावेदारी करणाऱ्यांचा उत आला आहे.सेनेच्या इच्छुकांची रांग हनुमानाच्या शेपटीसारखी वाढत चालली आहे. आ.मुंदडा, आ.पाटील यांच्यासह प्रकाश देवसरकर, बी.डी.चव्हाण, रामेश्वर शिंदे, पंडित शिंदे, नागेश पाटील, बाबूराव कदम कोहळीकर अशी अनेक नावे समोर येत आहेत. शिवसेनेत मात्र उमेदवार ठरण्यासाठी जेवढा वेळ लागेल तेवढ्या लाथाळ्या वाढणार आहेत. त्यामुळे पक्षाने एकदाचा सोक्षमोक्ष लावणे गरजेचे आहे.या राजकीय खेळात दोन वकील हैराण आहेत. अ‍ॅड.शिवाजी जाधव यांच्या नावाची आधी काँग्रेसकडून तर आता सेनेकडून चर्चा होत आहे. एवढेच काय तर ते मातोश्रीवर जावून आले. सेना मराठा कार्ड वापरणार असल्याच्या वावड्या उठत आहेत. तर अ‍ॅड.शिवाजी माने हे वंचित अथवा बसपाची उमेदवारी मिळवितील, अशा कंड्या पिकत आहेत. मात्र या दोघांनीही आम्ही भाजपमध्येच आहोत. ही जागा भाजपला मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहोत, असे सांगितले. तर अ‍ॅड.जाधव यांनी अपक्ष म्हणून चाचपणी करतोय, असे सांगितले.इच्छुकांमध्ये पुढे असलेल्यांत वकील व डॉक्टरच दिसत आहेत. काँग्रेसचे विद्यमान खा.सातव तर दुसरे इच्छुक संतोष टारफे डॉक्टर आहेत. भाजपमध्ये शिवाजी माने व शिवाजी जाधव हे वकील आहेत. शिवसेनेचे जयप्रकाश मुंदडा व बी.डी. चव्हाण हेही डॉक्टर आहेत.

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेस