शहरं
Join us  
Trending Stories
1
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
2
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
3
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
4
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
5
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
6
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
7
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
8
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
9
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
10
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
11
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
12
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
13
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
14
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
15
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
16
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
17
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
18
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
19
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
20
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...

काँग्रेस शांत, सेनेत लाथाळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 23:33 IST

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर काँग्रेसमध्ये निरव शांतता असताना सेनेत मात्र लाथाळ्या सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. बाहेरचा नको, ठरावीक भागातीलच उमेदवार द्या, अमक्या समाजाचाच द्या अशा भानगडी समोर येत आहेत. त्यामुळे लोकसभेच्या तोंडावर राजकीय वातावरण ढवळून निघण्याऐवजी चाचपणीचा हंगाम सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर काँग्रेसमध्ये निरव शांतता असताना सेनेत मात्र लाथाळ्या सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. बाहेरचा नको, ठरावीक भागातीलच उमेदवार द्या, अमक्या समाजाचाच द्या अशा भानगडी समोर येत आहेत. त्यामुळे लोकसभेच्या तोंडावर राजकीय वातावरण ढवळून निघण्याऐवजी चाचपणीचा हंगाम सुरू आहे.हिंगोली लोकसभा मतदारसंघात विद्यमान खा.राजीव सातव यांची उमेदवारी अंतिम मानली जात असतानाच आ.संतोष टारफे यांनी काही भागात दौरे केले अन् काँग्रेसमध्ये हलचल सुरू झाली. मात्र इतर कोणी पुढे येणे तसेही शक्यच नाही. परंतु खा.सातव इच्छुक नसतील तर या जागी आपल्याला संधी मिळेल काय? याची चाचपणी काही जणांनी केली. यात कुणाच्याच हाती काही लागले नाही. काँग्रेस व राष्ट्रवादीची युती गृहित धरूनच या सगळ्या बाबी होत गेल्याने राष्ट्रवादीतून कोणी इच्छुक नव्हता, ही एक जमेची बाजू. दुसरीकडे भाजप व शिवसेना मात्र स्वतंत्रपणे लढण्याची घोषणा वारंवार करून पुढाऱ्यांना चेतविण्याचे काम करीत होती. यात भाजपकडे तर इच्छुकांचा इतका भरणा झाला की, ही जागा शिवसेनेपेक्षाही ताकदीने हीच मंडळी लढविणार की काय? असे चित्र निर्माण झाले होते. अ‍ॅड. शिवाजी माने, सुभाष वानखेडे, सूर्यकांता पाटील या तीन माजी खासदारांसह अ‍ॅड.शिवाजी जाधव, के.के.शिंदे, आ.तान्हाजी मुटकुळे, बाबाराव बांगर व शेवटच्या टप्प्यात तर माजी आ.गजानन घुगे हेही दावेदारी करण्याच्या तयारीत होते. मात्र त्याच काळात युतीची घोषणा झाली अन् भाजपवाल्यांना या जागेवर पाणी सोडावे लागेल, याची जाणीवही झाली. मात्र दुसरीकडे शिवसेनेत याचदरम्यान आ.जयप्रकाश मुंदडा यांच्याऐवजी आ.हेमंत पाटील, माजी खा.सुभाष वानखेडे यांच्या नावाचा काहींनी आग्रह चालविला होता. यात पाटील व मुंदडा यांचे शिष्टमंडळ पार मातोश्रीपर्यंत धडकले होते. युतीमुळे इतरही अनेकांच्या अपेक्षांना धुमारे फुटले आहेत. जिल्हा परिषदला जागा निवडून न आणणारेही आमच्या हिंगोलीवर कायम अन्यायाची भाषा करू लागले. तसा विचार करता सेनेची हिंगोली विधानसभेतही स्थानिक स्वराज्य संस्थांतील संख्याबळाची परिस्थिती चांगली आहे. त्यामुळे येथेही पत्रकार परिषद घेवून दावेदारी करणाऱ्यांचा उत आला आहे.सेनेच्या इच्छुकांची रांग हनुमानाच्या शेपटीसारखी वाढत चालली आहे. आ.मुंदडा, आ.पाटील यांच्यासह प्रकाश देवसरकर, बी.डी.चव्हाण, रामेश्वर शिंदे, पंडित शिंदे, नागेश पाटील, बाबूराव कदम कोहळीकर अशी अनेक नावे समोर येत आहेत. शिवसेनेत मात्र उमेदवार ठरण्यासाठी जेवढा वेळ लागेल तेवढ्या लाथाळ्या वाढणार आहेत. त्यामुळे पक्षाने एकदाचा सोक्षमोक्ष लावणे गरजेचे आहे.या राजकीय खेळात दोन वकील हैराण आहेत. अ‍ॅड.शिवाजी जाधव यांच्या नावाची आधी काँग्रेसकडून तर आता सेनेकडून चर्चा होत आहे. एवढेच काय तर ते मातोश्रीवर जावून आले. सेना मराठा कार्ड वापरणार असल्याच्या वावड्या उठत आहेत. तर अ‍ॅड.शिवाजी माने हे वंचित अथवा बसपाची उमेदवारी मिळवितील, अशा कंड्या पिकत आहेत. मात्र या दोघांनीही आम्ही भाजपमध्येच आहोत. ही जागा भाजपला मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहोत, असे सांगितले. तर अ‍ॅड.जाधव यांनी अपक्ष म्हणून चाचपणी करतोय, असे सांगितले.इच्छुकांमध्ये पुढे असलेल्यांत वकील व डॉक्टरच दिसत आहेत. काँग्रेसचे विद्यमान खा.सातव तर दुसरे इच्छुक संतोष टारफे डॉक्टर आहेत. भाजपमध्ये शिवाजी माने व शिवाजी जाधव हे वकील आहेत. शिवसेनेचे जयप्रकाश मुंदडा व बी.डी. चव्हाण हेही डॉक्टर आहेत.

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेस