शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
2
ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
3
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
4
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
5
महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
6
“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
7
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
8
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
10
चंद्रपुरात भीषण अपघात! चालकाला लागलेली एक डुलकी ठरली जीवघेणी; ४ मृत्यू, ५ जण जखमी
11
UPI 'ऑटो-पे'च्या कटकटीतून सुटका! १ जानेवारीपासून लागू होणार ८ मोठे बदल; ग्राहकांचे पूर्ण नियंत्रण
12
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
13
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
14
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
15
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
16
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
17
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
18
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
19
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
20
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या जिल्ह्याध्यक्षांनी गाव राखले; भाजपचे जिल्हाध्यक्षांना जनतेचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:31 IST

हिंगोली जिल्ह्यात आ. राजू नवघरे यांच्या गावात आधीच बिनविरोध निवड झाली, तर आ. तान्हाजी मुटकुळे यांच्या गावात निवडणूकच नव्हती. ...

हिंगोली जिल्ह्यात आ. राजू नवघरे यांच्या गावात आधीच बिनविरोध निवड झाली, तर आ. तान्हाजी मुटकुळे यांच्या गावात निवडणूकच नव्हती. आ. संतोष बांगर, तर हिंगोलीचे रहिवासी आहेत. मात्र, त्यांनी अनेक ग्रामपंचायतींत बिनविरोधच ताबा मिळविला. तेच सेनेचे जिल्हाप्रमुखही आहेत. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात सर्वाधिक ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. त्यांनी आपल्या विधानसभेत १३५ ग्रामपंचायतीत शिवसेना निवडून आल्याचे सांगितले.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असलेल्या संजय बोंढारे यांनी आखाडा बाळापूर ग्रामपंचायतीवरील आपले वर्चस्व पुन्हा सिद्ध केले. १७ पैकी १३ जागा जिंकल्या. नांदापुरात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्या राष्ट्रवादीच्या पॅनेलने बाजी मारली. माजी जि. प. सदस्य डॉ. वसंतराव देशमुख यांच्या पॅनेलला पराभवाची चव चाखावी लागली. सगळ्यात धक्कादायक म्हणजे भाजपचे जिल्हाध्यक्ष ॲड. शिवाजी जाधव यांना मतदारसंघात तर फारसे यश मिळालेच नाही. गाव असलेल्या किन्होळ्यातच ते दणकून आपटले. भाजपच्या जि. प. सदस्यांचे पती बालाजीराव जाधव यांच्या नेतृत्वात येथे पॅनेल होते. मात्र, सामान्यांनी भाजपच्या पॅनेलला झिडकारले. माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी जिल्ह्याचा दौरा करून सर्वाधिक ग्रामपंचायती भाजपच्या येतील, असा दावा ज्या जिल्हाध्यक्षांच्या भरवशावर केला, त्यांच्याच गावात कौल विरोधात गेला. त्यामुळे भाजपची जिल्ह्यात पुन्हा बिकट परिस्थितीकडे वाटचाल होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. आ. तान्हाजी मुटकुळे यांनी तरी आपल्या मतदारसंघात काही ग्रामपंचायतींत भाजपला यश मिळवून देण्यात वाटा उचलल्याचे दिसत आहे.