शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

पूर्ण करू शौचालयाचे बांधकाम, वाढवू हिंगोली जिल्ह्याचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 00:00 IST

जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन (ग्रा.)अंतर्गत ‘पूर्ण करू शौचालयाचे बांधकाम, वाढवू जिल्ह्याचा सन्मान’ हा उपक्रम २५ ते ३१ डिसेंबरदरम्यान राबविण्यात येणार आहे. यासाठी २२ रोजी तालुकास्तरावर सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, मुख्याध्यापकांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन (ग्रा.)अंतर्गत ‘पूर्ण करू शौचालयाचे बांधकाम, वाढवू जिल्ह्याचा सन्मान’ हा उपक्रम २५ ते ३१ डिसेंबरदरम्यान राबविण्यात येणार आहे. यासाठी २२ रोजी तालुकास्तरावर सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, मुख्याध्यापकांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.३१ डिसेंबरपर्यंत जिल्हा १00 टक्के हागणदारीमुक्त करायचा आहे. त्यामुळे मिशन म्हणून हे काम करण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी.तुम्मोड यांनी केले आहे. जिल्ह्याला ८५ हजार ३१८ एवढे शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट आहे. यात औंढ्याने १२ हजार ७३३ पैकी १0 हजार १११, वसमतने १८ हजार ६६८ पैकी १२ हजार ४0६, हिंगोलीने १३ हजार ३८६ पैकी १0 हजार ५९0, कळमनुरीत २0 हजार १0 पैकी ९८९0, सेनगावात २0 हजार ५२२ पैकी १0 हजार ४७४ एवढ्या शौचालयांचे काम पूर्ण झाले आहे.यात औंढ्या तालुक्याला शंभर टक्के उद्दिष्टपूर्तीसाठी अवघे २६२२, वसमतला ६२६२ तर हिंगोलीला २७९६ शौचालयांचे बांधकाम करावे लागणार आहे. कळमनुरीला १0 हजार १२0 तर सेनगावला १0 हजार ४७४ असे मोठे उद्दिष्ट गाठावे लागणार आहे. जे आवाक्याबाहेर दिसून येत आहे. या दोन्ही तालुक्यांत सुरुवातीपासूनच ही कामे संथगतीने होत होती. त्यामुळे ज्या ग्रामपंचायतीत कामे रखडलेली आहेत, अशा ठिकाणच्या सरपंचांना या कार्यशाळेद्वारे प्रोत्साहित करण्यात येणार आहे.यात ग्रामसेवक व सरपंचांनी काय करायचे याबाबत माहिती दिली जाणार आहे. त्यांनी अधिकारी, पदाधिकारी व कर्मचाºयांची पूर्वतयारी बैठक घ्यावी, यातून निवडलेल्यांना लाभार्थी दत्तक द्यावे, जिल्हास्तरीय कार्यशाळेत दिलेल्या सूचना ग्रा.पं.स्तरावरील पदाधिकारी व कर्मचाºयांना द्याव्यात, लाभार्थी दत्तक देताना कर्मचारी व पदाधिकाºयांना सुलभपणे काम करता येईल, असाच लाभार्थी दत्तक द्यावा असे सुचित केले आहे. या पदाधिकारी, कर्मचारी मंडळीने लाभार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घेवून शौचालय बांधकामाचे महत्त्व पटवून द्यावे, तर ३१ डिसेंबरपर्यंत त्यांचे काम पूर्ण करून घेण्याची जबाबदारी स्वीकारावी, तांत्रिक अडचण असल्यास संबंधित कक्षाशी समन्वय साधण्याचे आवाहन केले.