शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

पूर्ण करू शौचालयाचे बांधकाम, वाढवू हिंगोली जिल्ह्याचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 00:00 IST

जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन (ग्रा.)अंतर्गत ‘पूर्ण करू शौचालयाचे बांधकाम, वाढवू जिल्ह्याचा सन्मान’ हा उपक्रम २५ ते ३१ डिसेंबरदरम्यान राबविण्यात येणार आहे. यासाठी २२ रोजी तालुकास्तरावर सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, मुख्याध्यापकांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन (ग्रा.)अंतर्गत ‘पूर्ण करू शौचालयाचे बांधकाम, वाढवू जिल्ह्याचा सन्मान’ हा उपक्रम २५ ते ३१ डिसेंबरदरम्यान राबविण्यात येणार आहे. यासाठी २२ रोजी तालुकास्तरावर सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, मुख्याध्यापकांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.३१ डिसेंबरपर्यंत जिल्हा १00 टक्के हागणदारीमुक्त करायचा आहे. त्यामुळे मिशन म्हणून हे काम करण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी.तुम्मोड यांनी केले आहे. जिल्ह्याला ८५ हजार ३१८ एवढे शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट आहे. यात औंढ्याने १२ हजार ७३३ पैकी १0 हजार १११, वसमतने १८ हजार ६६८ पैकी १२ हजार ४0६, हिंगोलीने १३ हजार ३८६ पैकी १0 हजार ५९0, कळमनुरीत २0 हजार १0 पैकी ९८९0, सेनगावात २0 हजार ५२२ पैकी १0 हजार ४७४ एवढ्या शौचालयांचे काम पूर्ण झाले आहे.यात औंढ्या तालुक्याला शंभर टक्के उद्दिष्टपूर्तीसाठी अवघे २६२२, वसमतला ६२६२ तर हिंगोलीला २७९६ शौचालयांचे बांधकाम करावे लागणार आहे. कळमनुरीला १0 हजार १२0 तर सेनगावला १0 हजार ४७४ असे मोठे उद्दिष्ट गाठावे लागणार आहे. जे आवाक्याबाहेर दिसून येत आहे. या दोन्ही तालुक्यांत सुरुवातीपासूनच ही कामे संथगतीने होत होती. त्यामुळे ज्या ग्रामपंचायतीत कामे रखडलेली आहेत, अशा ठिकाणच्या सरपंचांना या कार्यशाळेद्वारे प्रोत्साहित करण्यात येणार आहे.यात ग्रामसेवक व सरपंचांनी काय करायचे याबाबत माहिती दिली जाणार आहे. त्यांनी अधिकारी, पदाधिकारी व कर्मचाºयांची पूर्वतयारी बैठक घ्यावी, यातून निवडलेल्यांना लाभार्थी दत्तक द्यावे, जिल्हास्तरीय कार्यशाळेत दिलेल्या सूचना ग्रा.पं.स्तरावरील पदाधिकारी व कर्मचाºयांना द्याव्यात, लाभार्थी दत्तक देताना कर्मचारी व पदाधिकाºयांना सुलभपणे काम करता येईल, असाच लाभार्थी दत्तक द्यावा असे सुचित केले आहे. या पदाधिकारी, कर्मचारी मंडळीने लाभार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घेवून शौचालय बांधकामाचे महत्त्व पटवून द्यावे, तर ३१ डिसेंबरपर्यंत त्यांचे काम पूर्ण करून घेण्याची जबाबदारी स्वीकारावी, तांत्रिक अडचण असल्यास संबंधित कक्षाशी समन्वय साधण्याचे आवाहन केले.